शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

पशुधन संकटात

By admin | Updated: April 21, 2016 00:37 IST

औरंगाबाद : दुष्काळामुळे पाणीटंचाईबरोबरच जिल्ह्यात चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. चारा टंचाईमुळे चाऱ्याचे आणि ढेपेचेही भाव कडाडले

औरंगाबाद : दुष्काळामुळे पाणीटंचाईबरोबरच जिल्ह्यात चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. चारा टंचाईमुळे चाऱ्याचे आणि ढेपेचेही भाव कडाडले आहेत. त्यामुळे जनावरांचा सांभाळ करणे अवघड झाले आहे. जनावरे विक्रीला नेली तरी बाजारात त्यांना खरेदीसाठी कोणी पुढे येत नसल्यामुळे पशुपालक धास्तावले आहेत. जिल्ह्यात सद्य:स्थितीत गाय, बैल, म्हैस संवर्गातील जनावरांची एकूण संख्या ६ लाख ८ हजार इतकी आहे. मात्र, गतवर्षी कमी पाऊस झाल्यामुळे रबीचे पीक झाले नाही. अनेक भागात खरिपाचे पीकही गेले. त्यामुळे चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाणीच नसल्यामुळे शेतीत चरण्यासाठी हिरवा चारा उपलब्ध नाही. दुसरीकडे कडब्याचे भावही वाढले आहेत. दोन तीन महिन्यांपूर्वी हजार रुपये शेकडा मिळणारा कडबा आता १६०० रुपयांपर्यंत गेला आहे. त्यासोबतच ढेपेचे भावही वाढले आहेत. सध्या पन्नास किलोचे ढेपेचे पोते १३०० रुपयांना मिळत आहे. यामुळे जनावरांचा सांभाळ करणे अवघड झाले आहे.शेतात चरण्यासाठी काही नाही. चारा मिळेनासा झाला आहे. त्यामुळे पशुपालक जनावरे विक्रीसाठी काढत आहेत. परंतु तेथेही गिऱ्हाईक मिळत नसल्याची परिस्थिती आहे. पूर्वी भाकड जनावरे कत्तलीसाठी खरेदी केली जात होती. मात्र आता गोवंश हत्याबंदी कायद्यामुळे कत्तलीसाठीची खरेदीही बंद झाली आहे. अशा सर्वांमुळे ग्रामीण भागातील पशुपालक हैराण झाला आहे. जनावरांना काय खाऊ घालावे, असा प्रश्न पशुपालकांपुढे निर्माण झाला आहे.