शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
2
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
3
बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीतच भाजपची मोठी कारवाई, चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; करण्यात आले गंभीर आरोप
4
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट
5
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
6
“महायुतीचे शेतकरी पॅकेज थोतांड, कर्जमाफी करावी; राज्य दिवाळखोरीत काढले”: हर्षवर्धन सपकाळ
7
EPF खातेधारकांना मोठी भेट! 'फ्री'मध्ये मिळतोय ₹७ लाखांपर्यंतचा जीवन विमा; कुटुंबाला मिळेल मोठा आधार
8
२० वर्षीय भारतीय तरुणीवर ब्रिटनमध्ये बलात्कार, आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद; वर्णद्वेषातून कृत्य
9
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा
10
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
11
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
12
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
13
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
14
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ!
15
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
16
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
17
विजय देवरकोंडा पोहोचला कोकणात, आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी 'या' गावात उभारला सेट
18
VIDEO: अनाया बांगर पुन्हा जुन्या दिवसांकडे परतणार, सर्जरीनंतर ३ महिन्यांत घेतला मोठा निर्णय
19
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
20
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट

‘साहित्य संमेलने साखरपुड्यासारखी नसावीत’; साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर मान्यवरांचे विचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2017 18:59 IST

मराठी साहित्य संमेलनांविषयी अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी, लेखक, प्रकाशक आणि सजग वाचकांचे मत जाणून घेण्यासाठी शनिवारी ‘लोकमत’तर्फे एक परिचर्चा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये समीक्षक डॉ. ऋषिकेश कांबळे, प्रकाशक श्याम देशपांडे, प्रा. कैलास अंभुरे, प्रा. प्रतिभा अहिरे, कवयित्री प्रिया धारूरकर आणि पुस्तक चावडीचे सारंग टाकळकर यांनी सहभाग घेतला.

- मयूर देवकर

औरंगाबाद : जगण्याचे सगळे संदर्भ बदलले असताना मराठी साहित्य संमेलनांचे वर्षानुवर्षे ठरलेले स्वरूप आज उपयुक्त आहे का? साहित्यातील नवीन साहित्यिक, प्रवाह, माहिती सामान्यांपर्यंत पोहोचावी, भाषेविषयी लोकांचे प्रेम वाढावे, भाषा अधिक समृद्ध व्हावी, यातून एक सजग वाचक निर्माण होऊन साहित्यिक चळवळ उभी राहावी या उद्देशाने सुरू झालेली संमेलने आजच्या परिक्षेपात किती गरजेची आहेत? नवलेखक व वाचकांना प्रेरित करण्यासाठी साहित्य संमेलनांच्या स्वरुपात काही बदल आवश्यक आहेत का? महादेव रानडे यांनी ज्या उद्देशाने १४० वर्षांपूर्वी या संमेलनाची सुरुवात केली तो उद्देश आज असफल होताना दिसतोय का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी, त्याविषयी लेखक, प्रकाशक आणि सजग वाचकांचे मत जाणून घेण्यासाठी शनिवारी ‘लोकमत’तर्फे एक परिचर्चा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये समीक्षक डॉ. ऋषिकेश कांबळे, प्रकाशक श्याम देशपांडे, प्रा. कैलास अंभुरे, प्रा. प्रतिभा अहिरे, कवयित्री प्रिया धारूरकर आणि पुस्तक चावडीचे सारंग टाकळकर यांनी सहभाग घेतला.

साहित्य संमेलने साखरपुड्यासारखी करू नयेतमहामंडळांच्या धुरिणांनी साहित्य संमेलने साखरपुड्यासारखी करू नयेत. केवळ तीन दिवसांचा सोहळा झाल्यानंतर त्यांना साहित्य विकासाचा विसर पडतो. परंतु वर्षभर त्यांचे काय कार्य चालते? अध्यक्षांनी केवळ भाषणे करीत राहायची का? त्यांनी नवलेखकांच्या कार्यशाळा घेऊन त्यांना तयार करायला हवे. त्यातूनच जीवनसापेक्ष, मानवी मूल्यांशी बांधिल असणाºया साहित्याची निर्मिती होईल. मराठी लेखक हा टुंड्रा प्रदेशातील खुरट्या झुडपांसारखा वाटतो. मराठीतील काही लेखकांचा अपवाद सोडला तर इतर सर्व अरबी समुद्रात बुडविण्यासारखेच आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष नंदीबैल असू नये, असे माझे प्रांजळ मत आहे. त्याने कणखर अशी भूमिका घेऊन नवसाहित्याच्या निर्मितीसाठी झपाटून काम केले पाहिजे. तरच संमेलनांचा उद्देश सफल होईल.- डॉ. ऋषिकेश कांबळे

महामंडळांच्या पदाधिका-यांना प्रकाशकांचे वावडेअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या आयोजकांच्या लेखी प्रकाशकांची काहीच किंमत नाही. मुळात ते ग्रंथांना मानतच नाहीत. प्रकाशकांना तुच्छतेने वागणूक दिली जाते. प्रकाशक केवळ व्यवहारच करायला येतात असा त्यांचा समज झाला आहे. पूर्वी प्रकाशक संमेलनाच्या निमित्ताने वेगवेगळ्या लेखकांची पुस्तकं काढत असत, त्यांना पुढे आणत. आता मात्र तसा वाव राहिलेला नाही. प्रकाशक आले किंवा नाही आले तरी आम्हाला काही फरक पडत नाही, अशा वृत्तीचे लोक महामंडळामध्ये आलेले आहेत. त्यामुळे प्रकाशकही संमेलनांबाबत फारसे उत्साह किंवा स्वारस्य ठेवत नाहीत. विशेष म्हणजे नवीन लेखकांनाही संमेलनांविषयी काही वाटत नाही. संमेलनात केवळ टाळ्या मिळविणारे, वादग्रस्त विधान करणारे ‘परफॉर्मर’ वक्त्यांना बोलवले जाते. गंभीर साहित्याविषयी देणे-घेणेच नाही. - श्याम देशपांडे

स्वहितापेक्षा साहित्य हित महत्त्वाचेम. फुलेंनी त्या काळी रानडेंना पत्र लिहून आयोजकांना विचारले होते की, आमच्या प्रश्नांवरती या संमेलनांमध्ये चर्चा होणार नसेल तर आम्ही तेथे येऊन काय कराचे? आज १४० वर्षांनंतरही ही स्थिती बदललेली नाही. साहित्य आणि भाषा विकासाऐवजी संमेलनांचा वापर केवळ स्वहित जपण्यासाठीच केला जातोय, असे दिसते. परिसंवाद, कथाकथन, कविसंमेलन, ग्रंथदिंडी असे संमेलनाचे सगळे ठरलेले स्वरूप बदलण्याची अत्यावश्यकता आहे. विषयांमध्ये नावीन्यता नाही. जग किती झपाट्याने बदलत आहे, नवनवीन संदर्भ निर्माण होत आहेत. त्या अनुषंगाने चर्चा होण्याऐवजी कोणाला वक्ता म्हणून बोलवायचे यावरून विषय ठरतो. त्यामुळे नवीन लोकांना संधीच मिळत नाही. म्हणून एकदा सहभागी झाल्यानंतर किमान दोन वर्षे तरी त्यांना पुन्हा बोलवू नये. - डॉ. कैलास अंभुरे

आजचे संमेलन जीवनप्रवाहांशी विसंगतआजच्ी संमेलने जीवनप्रवाहांशी सुसंवादी नाहीत. काही ठराविक लोकांच्या हातात ते गेले आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांमध्ये समाजातील विविध घटकांना जे प्रतिनिधित्व मिळायला हवे ते मिळत नाही. त्यामुळेच अस्मितादर्श, दलित संमेलन, लेखिका संमेलन, ग्रामीण संमेलन, अशी विविध छोटी-छोटी संमेलने होऊ लागली. साहित्याच्या सर्वात मोठ्या व्यासपीठावर त्यांना स्थान मिळत नसल्यामुळे ती महामंडळापासून दूर जात आहेत. म्हणून तर जातनिहाय, प्रदेशनिहाय संमेलने होत आहेत. यातून एक गोष्ट तर प्रतिबिंबित होते की, लोकांना संमेलने हवी आहेत. महामंडळाला आरसा दाखविण्याचे काम त्यांचे सदस्य करीत नाहीत. कारण ते लाभार्थी आहेत. म्हणून सर्वसमावेशकता येऊन संमेलनाच्या स्वरुपात परिवर्तन होणे गरजेचे आहे.- डॉ. प्रतिभा अहिरे

सर्वसमावेशक व्यासपीठ मिळत नाहीसंमेलने जरूर व्हावीत; पण आजची तरुण पिढी संमेलनांना बांधील नाही. व्यक्त होण्यासाठी या संमेलनांशिवाय त्यांच्यासमोर तंत्रज्ञान आणि इंटरनेटच्या माध्यमातून अनेक पर्याय उपलब्ध आहेत. ब्लॉग्स, सोशल मीडियावर लिखाण करणाºयांना किंवा नव्या धाटणीच्या लेखकांना अ. भा. मराठी साहित्य संमेलनात स्थान नाही. सर्वसमावेशक व्यासपीठ देण्यात ते कमी पडतात. केवळ आपल्या मर्जीतील किंवा ‘अभय’ असणाºयांनाच येथे संधी मिळते. काही तरी वेगळे करू पाहणाºयांना, त्यांच्या विचार व कार्यशैलीला विरोध करणाºया अनेक लेखक-कवींना जाणूनबुजून बाजूला केले जाते. शिवाय ज्यांचा साहित्याशी दूरदूरचा संबंध नाही ते लोक मतदार म्हणून संमेलनाचा अध्यक्ष ठरवितात. त्यामुळे  नवी पिढी संमेलनांशी जोडण्यासाठी व्यवस्थेत आमूलाग्र बदल गरजेचे आहेत.- प्रिया धारूरकर

पदाधिकारी राजकीय कुरघोड्या करण्यात व्यग्र संमेलनांचे स्वरूप बदलावे, असे बंद खोलीत म्हणणारी मंडळी प्रस्थापिताना उघडपणे विरोध करताना दिसत नाही. महामंडळाच्या कार्यकारिणीत याविषयी प्रखर चर्चा का होत नाही? साहित्य संमेलन रिकामटेकड्या लोकांचा उद्योग आहे, या नेमाड्यांच्या विधानावर महामंडळाने गप्प राहून त्यांच्या म्हणण्याला मूक संमती दिली असे मानावे लागेल. यामुळे मराठी साहित्य क्षेत्रात संमेलनाकडे न फिरकणारे व महामंडळाचे लाभार्थी, असे दोन प्रवाह निर्माण झाले आहेत. कोणीही भाषेचा प्रसार व्हावा, विकास व्हावा म्हणून प्रयत्न करीत नाही. संमेलनाला उत्सवी स्वरूप देऊन ती ‘इव्हेंट’ म्हणूनच गाजविली जातात. वर्षानुवर्षे ठाण मांडून बसणारे पदाधिकारी केवळ राजकीय कुरघोड्या करण्यात व्यग्र आहेत. काही ठोस उपाययोजना हाती घेण्यात त्यांना स्वारस्य वाटत नाही.- सारंग टाकळकर

हे असावेत बदल- घटक संस्थांच्या सर्व आजीवन सभासदांना मतदानाचा अधिकार द्यावा, मतदारांची संख्या वाढवावी.- गट, वर्तुळ, धर्म, प्रदेश, विचारधारा, लिंग यापलीकडे जाऊन लेखकांना सामावून घेणे.- परिसंवादातील कालबाह्य झालेले विषय बदलून समकालीन विषयांवर चर्चा घडवून आणावी.- सोशल मीडियावर लिखाण करणाºयांना नव लेखकांना संमेलनात सामावून घेणे.- संमेलनाला उत्सवी रूप नाही तर सामाजिक-सांस्कृतिक चळवळीचे स्वरूप देणे.- अध्यक्षांवर अधिकाधिक जबाबदाºया टाकून त्यांनी वर्षभर नवलेखकांच्या कार्यशाळा व तत्सम साहित्यिक उपक्रम हाती घ्यावेत.- अध्यक्षांना मिळणाºया रकमेचा आवर्जून हिशोब द्यावा. पारित केलेल्या ठरावांचा पाठपुरावा करून पूर्णत्वास न्यावेत.

टॅग्स :literatureसाहित्यAurangabadऔरंगाबाद