शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

माझेच ऐकून घ्या, मी थेट दिल्लीतून आलोय; कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षांनी राज्यातले प्रश्न टाळले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 12:38 IST

दिल्लीवारी करून आलोय, त्यामुळे राज्यातील प्रश्नांबाबत शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन तासभर बोलतो, असे सांगून त्यांनी गुरुवारी पत्रकारांना टाळले

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या प्रश्नांवर वारंवार आवाज मीच उठवितो, असा दावा करणारे पटेल पत्रकारांवर घसरण्याच्या मूडमध्ये होते.

औरंगाबाद : पीककर्जापायी शेतकरी मेटाकुलीला आला असून, सावकाराच्या दारात जाण्याची त्याच्यावर वेळ आली आहे. सध्या राज्यातील पीककर्जाची स्थिती काय आहे, या प्रश्नावर राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी काहीही उत्तर दिले नाही. दिल्लीवारी करून आलोय, त्यामुळे राज्यातील प्रश्नांबाबत शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन तासभर बोलतो, असे सांगून त्यांनी गुरुवारी पत्रकारांना टाळले. 

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर वारंवार आवाज मीच उठवितो, असा दावा करणारे पटेल पत्रकारांवर घसरण्याच्या मूडमध्ये होते. ‘मी काय म्हणतो, तेच ऐकून घ्या, असा सूर त्यांनी शेवटपर्यंत लावून धरला. शेतकऱ्यांच्या पीककर्जाच्या प्रश्नावर त्यांनी शेवटपर्यंत काहीही उत्तर दिले नाही.  दिल्ली येथे शेतमालाच्या अनुषंगाने केंद्रीय मंत्र्यासोबत पाशा पटेल यांची बैठक झाली. त्या बैठकीची माहिती देण्यासाठी उस्मानपुरा येथील भाजपच्या कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. तासभर त्यांनी दिल्ली दरबाराचे गोडवे गायले. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला सचिव गटासमोर मत मांडण्याची संधी मिळाली, हे सांगताना त्यांना आपण कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष असल्याचाही विसर पडला होता.

मी आजच दिल्लीहून महाराष्ट्रात आलोय

राज्यातील पीककर्जाची  स्थिती काय आहे, असा प्रश्न पत्रकारांनी केला. त्यावर मी आजच दिल्लीहून महाराष्ट्रात आलोय. मला केवळ अमरावती येथे जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांना ताळ्यावर आणल्याची माहिती आहे. कारण ते माझे मित्र आहेत. बाकीचे काहीही विचारू नका, असे सांगून त्यांनी हात झटकले. तुमचेच किती ऐकून घ्यायचे, आम्ही काही प्रश्न विचारायचेच नाही का? असे बोलून पत्रकारही संतापले. त्यावर पटेल म्हणाले, विचारा; परंतु त्यांनी शेवटपर्यंत ३५ ते ४० वर्षांपासून शेतकरी चळवळीत कसे काम केले, हे सांगण्यावरच भर दिला. 

टॅग्स :Pasha Patelपाशा पटेलagricultureशेतीFarmerशेतकरी