शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

माझेच ऐकून घ्या, मी थेट दिल्लीतून आलोय; कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षांनी राज्यातले प्रश्न टाळले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 12:38 IST

दिल्लीवारी करून आलोय, त्यामुळे राज्यातील प्रश्नांबाबत शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन तासभर बोलतो, असे सांगून त्यांनी गुरुवारी पत्रकारांना टाळले

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या प्रश्नांवर वारंवार आवाज मीच उठवितो, असा दावा करणारे पटेल पत्रकारांवर घसरण्याच्या मूडमध्ये होते.

औरंगाबाद : पीककर्जापायी शेतकरी मेटाकुलीला आला असून, सावकाराच्या दारात जाण्याची त्याच्यावर वेळ आली आहे. सध्या राज्यातील पीककर्जाची स्थिती काय आहे, या प्रश्नावर राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी काहीही उत्तर दिले नाही. दिल्लीवारी करून आलोय, त्यामुळे राज्यातील प्रश्नांबाबत शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन तासभर बोलतो, असे सांगून त्यांनी गुरुवारी पत्रकारांना टाळले. 

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर वारंवार आवाज मीच उठवितो, असा दावा करणारे पटेल पत्रकारांवर घसरण्याच्या मूडमध्ये होते. ‘मी काय म्हणतो, तेच ऐकून घ्या, असा सूर त्यांनी शेवटपर्यंत लावून धरला. शेतकऱ्यांच्या पीककर्जाच्या प्रश्नावर त्यांनी शेवटपर्यंत काहीही उत्तर दिले नाही.  दिल्ली येथे शेतमालाच्या अनुषंगाने केंद्रीय मंत्र्यासोबत पाशा पटेल यांची बैठक झाली. त्या बैठकीची माहिती देण्यासाठी उस्मानपुरा येथील भाजपच्या कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. तासभर त्यांनी दिल्ली दरबाराचे गोडवे गायले. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला सचिव गटासमोर मत मांडण्याची संधी मिळाली, हे सांगताना त्यांना आपण कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष असल्याचाही विसर पडला होता.

मी आजच दिल्लीहून महाराष्ट्रात आलोय

राज्यातील पीककर्जाची  स्थिती काय आहे, असा प्रश्न पत्रकारांनी केला. त्यावर मी आजच दिल्लीहून महाराष्ट्रात आलोय. मला केवळ अमरावती येथे जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांना ताळ्यावर आणल्याची माहिती आहे. कारण ते माझे मित्र आहेत. बाकीचे काहीही विचारू नका, असे सांगून त्यांनी हात झटकले. तुमचेच किती ऐकून घ्यायचे, आम्ही काही प्रश्न विचारायचेच नाही का? असे बोलून पत्रकारही संतापले. त्यावर पटेल म्हणाले, विचारा; परंतु त्यांनी शेवटपर्यंत ३५ ते ४० वर्षांपासून शेतकरी चळवळीत कसे काम केले, हे सांगण्यावरच भर दिला. 

टॅग्स :Pasha Patelपाशा पटेलagricultureशेतीFarmerशेतकरी