शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

माझेच ऐकून घ्या, मी थेट दिल्लीतून आलोय; कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षांनी राज्यातले प्रश्न टाळले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 12:38 IST

दिल्लीवारी करून आलोय, त्यामुळे राज्यातील प्रश्नांबाबत शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन तासभर बोलतो, असे सांगून त्यांनी गुरुवारी पत्रकारांना टाळले

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या प्रश्नांवर वारंवार आवाज मीच उठवितो, असा दावा करणारे पटेल पत्रकारांवर घसरण्याच्या मूडमध्ये होते.

औरंगाबाद : पीककर्जापायी शेतकरी मेटाकुलीला आला असून, सावकाराच्या दारात जाण्याची त्याच्यावर वेळ आली आहे. सध्या राज्यातील पीककर्जाची स्थिती काय आहे, या प्रश्नावर राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी काहीही उत्तर दिले नाही. दिल्लीवारी करून आलोय, त्यामुळे राज्यातील प्रश्नांबाबत शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन तासभर बोलतो, असे सांगून त्यांनी गुरुवारी पत्रकारांना टाळले. 

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर वारंवार आवाज मीच उठवितो, असा दावा करणारे पटेल पत्रकारांवर घसरण्याच्या मूडमध्ये होते. ‘मी काय म्हणतो, तेच ऐकून घ्या, असा सूर त्यांनी शेवटपर्यंत लावून धरला. शेतकऱ्यांच्या पीककर्जाच्या प्रश्नावर त्यांनी शेवटपर्यंत काहीही उत्तर दिले नाही.  दिल्ली येथे शेतमालाच्या अनुषंगाने केंद्रीय मंत्र्यासोबत पाशा पटेल यांची बैठक झाली. त्या बैठकीची माहिती देण्यासाठी उस्मानपुरा येथील भाजपच्या कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. तासभर त्यांनी दिल्ली दरबाराचे गोडवे गायले. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला सचिव गटासमोर मत मांडण्याची संधी मिळाली, हे सांगताना त्यांना आपण कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष असल्याचाही विसर पडला होता.

मी आजच दिल्लीहून महाराष्ट्रात आलोय

राज्यातील पीककर्जाची  स्थिती काय आहे, असा प्रश्न पत्रकारांनी केला. त्यावर मी आजच दिल्लीहून महाराष्ट्रात आलोय. मला केवळ अमरावती येथे जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांना ताळ्यावर आणल्याची माहिती आहे. कारण ते माझे मित्र आहेत. बाकीचे काहीही विचारू नका, असे सांगून त्यांनी हात झटकले. तुमचेच किती ऐकून घ्यायचे, आम्ही काही प्रश्न विचारायचेच नाही का? असे बोलून पत्रकारही संतापले. त्यावर पटेल म्हणाले, विचारा; परंतु त्यांनी शेवटपर्यंत ३५ ते ४० वर्षांपासून शेतकरी चळवळीत कसे काम केले, हे सांगण्यावरच भर दिला. 

टॅग्स :Pasha Patelपाशा पटेलagricultureशेतीFarmerशेतकरी