शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

राज्यात ४८ रेल्वेमार्ग सर्वेक्षणातच, केवळ ३ मार्गांचे अहवाल तयार करणे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 19:16 IST

या रेल्वे मार्गांचे सर्वेक्षण होणार कधी आणि प्रत्यक्ष त्यावरून रेल्वे धावणार कधी, असा प्रश्न यामुळे उपस्थित होतो.

ठळक मुद्देमराठवाड्यातील रेल्वेचे प्रश्न वर्षानुवर्षे कागदावरच आहेत. मराठवाड्यातील रेल्वेची अवस्था वर्षांनुवर्षे ‘जैसे थे’च आहे.

औरंगाबाद : राज्यात पाच, दहा नव्हे तर तब्बल ४८ रेल्वेमार्ग सर्वेक्षणातच अडकले आहेत. यातील केवळ ३ मार्गांच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले असून, त्यांचे अहवाल तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. औरंगाबाद - नगर या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी मध्य रेल्वेचे पथक सोमवारी औरंगाबादेत दाखल झाले, यावेळी ही माहिती समोर आली.

मराठवाड्यातील रेल्वेचे प्रश्न वर्षानुवर्षे कागदावरच आहेत. त्यात अनेक रेल्वे मार्गांचाही समावेश आहे. मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात तब्बल ४८ रेल्वेमार्ग सर्वेक्षणाच्या फेऱ्यात अडकले आहेत. या रेल्वे मार्गांचे सर्वेक्षण होणार कधी आणि प्रत्यक्ष त्यावरून रेल्वे धावणार कधी, असा प्रश्न यामुळे उपस्थित होतो. मध्य रेल्वेचे डेप्युटी चीफ ऑपरेशन मॅनेजर (सर्व्हे) सुरेशचंद्र जैन आणि अन्य अधिकारी औरंगाबाद - नगर या मार्गाच्या सर्वेक्षणासाठी सोमवारी औरंगाबादेत दाखल झाले. त्यावेळी त्यांनी राज्यातील ४८ रेल्वे मार्गांचे सर्वेक्षण आपल्याकडे असल्याचे सांगितले. यात लातूर - कलबुर्गी, जालना - खामगाव आणि भुसावळ - पाचोरा - जामनेर - बोदवड या मार्गांचे अहवाल सध्या तयार केले जात असल्याचेही जैन यांनी सांगितले.

सर्वेक्षणाच्या जंजाळातच रेल्वेरोटेगाव - कोपरगाव रेल्वेमार्ग, औरंगाबाद - दौलताबाद - चाळीसगाव मार्ग, सोलापूर - तुळजापूर - उस्मानाबाद - बीड - गेवराई व्हाया पैठण - औरंगाबाद - जळगावसह अन्य मार्ग वर्षानुवर्षे कागदावरच आहेत. रेल्वेच्या मागण्यांना रेल्वे बोर्डाकडून एकतर केराची टोपली दाखवली जाते अन्यथा तुटपुंज्या निधीवर बोळवण केली जाते. परिणामी, सर्वेक्षणाच्या जंजाळातच मराठवाड्याची रेल्वे अडकली आहे. त्यामुळे मराठवाड्यातील रेल्वेची अवस्था वर्षांनुवर्षे ‘जैसे थे’च आहे.

टॅग्स :railwayरेल्वेMarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबाद