शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

जिल्ह्यात फुलले कमळ...!

By admin | Updated: October 20, 2014 00:31 IST

संतोष धारासूरकर ,जालना गेल्या विधानसभा निवडणुकीत पूर्णत: सफाया झालेल्या भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीत भोकरदन, परतूर या दोन मतदार संघात पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांचा तर बदनापुरात एकेकाळच्या मित्र

संतोष धारासूरकर ,जालना

गेल्या विधानसभा निवडणुकीत पूर्णत: सफाया झालेल्या भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीत भोकरदन, परतूर या दोन मतदार संघात पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांचा तर बदनापुरात एकेकाळच्या मित्र पक्षाचा पराभव करीत पाचपैकी तीन जागा पटकावून संपूर्ण जिल्ह्यात कमळ फुलविले आहे. या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा वर्चस्व सिद्ध करणार का हा उत्कंठतेचा विषय होता. राज्यातील काँग्रेसजनां विरोधातील वातावरणात ओळखून या जिल्ह्यातील सत्तारुढ गटांतील दोन्ही पक्षांच्या मात्तबरांनी सर्व शक्तीनिशी निवडणुका लढविल्या. त्यात राजेश टोपे अपवाद अन्य कैलास गोरंट्याल, सुरेश जेथलिया व चंद्रकांत दानवे या तिघा सत्तारुढ गटाच्या मात्तबरांनां सपशेल पराभावाचा सामना करावा लागला. या उलट भाजपाने परतूर व भोकरदन या दोन्हीही जागा पुन्हा खेचून आणल्या. पाठोपाठ बदनापूरचीही जागा पटकावून विरोधकांबरोबर मित्र पक्षांना चकित केले आहे. केंद्रिय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासाठी भोकरदनची निवडणूक प्रतिष्ठेचीच होती. चिरंजीव संतोष दानवे यांच्यासाठी त्यांनी सर्व शक्ती पणास लावली. त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी चंद्रकांत दानवे (राष्ट्रवादी) यांच्यासह शिवसेनेचे रमेश गव्हाड यांचे आव्हान होते. परंतु दानवे कुटुंबियांनी जिवाचे रान करीत दोघा प्रतिस्पर्ध्यांना लोळविले. त्याद्वारे सलग तीनवेळा झालेल्या पराभावाचा वचपा काढला. परतूरमधून भाजपाचे जिल्हाध्यक्ष बबनराव लोणीकर यांनी पारंपरिक प्रतिस्पर्धी तथा काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविणाऱ्या सुरेश जेथलिया यांचा पराभव केला. त्याद्वारे गेल्या निवडणुकीतील पराभावाचा वचपा काढला. येथून मनेसचे बाबासाहेब आकात, शिवसेनेचे सोमनाथ साखरे, राष्ट्रवादीेचे प्रा. राजेश सरकटे यांचा सफाया झाला. अपक्ष निवास चव्हाण यांनीही लक्षणीय मते मिळवून सर्वांना चकित केले.