शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आयुष्य सरले,ना मिळाला निवारा...

By admin | Updated: July 19, 2014 00:45 IST

भारत दाढेल, नांदेड आयुष्य सरले, ना मिळाला निवारा़़़ ना पाहिले न स्वप्न कधी, झोपडीचाच सहारा़़़़ काबाडकष्ट करणाऱ्यांचे स्वप्न तरी काय असते़़़

भारत दाढेल, नांदेडआयुष्य सरले, ना मिळाला निवारा़़़ ना पाहिले न स्वप्न कधी, झोपडीचाच सहारा़़़़काबाडकष्ट करणाऱ्यांचे स्वप्न तरी काय असते़़़ एखादे घऱ मग हे घर उभे करण्यासाठी आयुष्यभर त्याला कष्टच करावे लागते़ परंतु बीएसयुपी योजनेच्या माध्यमातून गोरगरिबांना त्यांना त्यांचे हक्काचे घर मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे़ शुक्रवारी सांगवी भागातील गौतमनगरातील लाभार्थ्यांना बहुमजली इमारतीत घरकुले वाटप करण्यात आले़ त्यांना चिठ्ठ्या काढून प्लॅटचे नंबर देण्यात आले़ यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता़ सांगवी येथील गौतमनगर भागात उभारण्यात आलेल्या बहुमजली इमारतीत बीएसयुपीच्या २८८ लाभार्थ्यांना यापूर्वीच घरांचे हस्तांतरण करण्यात आले आहे़ झोपडपट्टी निर्मूलन करून बीएसयुपीची उत्कृष्ट वसाहत निर्माण करण्याचे काम करणाऱ्या महापालिकेने आज २४ लाभार्थ्यांना घरकुलांचा ताबा दिला़ महापालिका इमारतीत स्थायी समिती सभापती उमेश पवळे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना घरकुलाचे नंबर देण्यात आले़ पावसाळा सुरू असल्याने या भागातील लाभार्थ्यांना वेळेवर घरे देण्याचा प्रयत्न बीएसयुपी विभागाचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे यांच्या पथकाने केला़ मात्र त्यात अडचणी येत होत्या़ उर्वरित लाभार्थ्यांची संख्या अधिक होती़ तर बहुमजली इमारतीत पूर्ण झालेल्या घरकुलांची संख्या २४ होती़ ४८ घरांची कामे सुरू आहेत़ त्यामुळे कोणत्या लाभार्थ्यांना घरे द्यायचे, हा प्रश्न होता़ अखेर या लाभार्थ्यांच्या चिठ्ठ्या टाकून लहान मुलांच्या हस्ते काढण्यात आल्या़ ज्यांना प्लॅटचे नंबर मिळत होते़ त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता़ सभापती पवळे, नगरसेवक अशोक उमरेकर, कार्यकारी अभियंता अंधारे, उपअभियंता प्रकाश कांबळे, वैजनाथ दुनघव, उपअभियंता विश्वनाथ स्वामी, आरसुडे, बंडू उत्तरवार यांनी परिश्रम घेतले़ दोन एकर जागेचा प्रस्ताव रखडलागौतमनगर येथे आणखी घरकुल उभारण्यासाठी लागणारी अतिरिक्त दोन एकर जागा शासनाकडून मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत़ या जागेचा प्रस्ताव महापालिकेने यापूर्वीच दिला असून तो विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे़योजनेचा कालावधी मार्च २०१५ रोजी संपणार आहे़ त्यामुळे ही जागा मिळाल्यास या भागातील लाभार्थ्यांना तातडीने घरकुले देण्याबाबत नियोजन केले आहे़ मात्र या जागेसंदर्भात अद्याप कोणताच निर्णय होत नसल्याने घरकुलांची कामे रेंगाळली आहेत़