शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

बालाजी धामच्या दरबारात १६ जणांच्या लिहिल्या चिठ्ठ्या; महाराजांनी ‘माइक’ बंद करून सांगितले...

By प्रशांत तेलवाडकर | Updated: November 8, 2023 12:47 IST

भाविकांमधून बोलावले तरुणीला; सांगितले, एक जण तुझी बदनामी करतोय

छत्रपती संभाजीनगर : पं. धीरेंद्र कृष्ण शास्त्रींनी दुसऱ्या रांगेतील एका तरुणीला बोलावले... ती धर्मपीठावर येण्याआधीच तिची चिठ्ठी लिहून ठेवली होती... तिला सांगितले की, तुला एक जण बदनाम करीत आहे.’ हे ऐकून त्या तरुणीच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. एक तरुणाला बोलावून ... तुझे पहिले लग्न मोडले, आता दुसरे लग्न कोणत्या तारखेला होईल व त्याच्या भावी पत्नीचे नाव काय आहे हेही जाहीर केले.... अशा १६ जणांच्या चिठ्ठ्या महाराजांनी लिहिल्या... महाराज सर्वांच्या ‘मन की बात’ ते कशी ओळखतात हे पाहून अनेक जण भारावले.

सकल हिंदू जनजागरण समितीकडून आयोजित व केंद्रीय अर्थराज्यमंत्री डाॅ. भागवत कराड निमंत्रित पं. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या हनुमान कथेचे आयोजन करण्यात आले आहे. सिद्धी प्राप्तीचा दावा करणाऱ्या महाराजांबद्दल मोठी उत्सुकता जनमानसात आहे. त्यांच्या ‘बालाजी धाम सरकार’चा भव्य दरबार मंगळवारी भरविण्यात आला.

दरबारात चिठ्ठी लिहिण्यास सुरुवात होताच शिवम नावाच्या व्यक्तीला महाराजांनी आवाज दिला. त्याची समस्या व त्यावर उपाय लिहून दिला. नंतर पगडीधारी पिळदार मिशा असलेल्या वृद्धाची चिठ्ठी निघाली. त्यांच्या घरात मुलांमध्ये सुरू असलेला विवाद व त्यावर उपाय महाराजांनी सांगितला.

पाठीमागे गळ्यात दुपट्टा घातलेल्या तरुणाचे नाव पुकारले. तो धर्मपीठावर येताच त्याचे प्रेमप्रकरण सुरू आहे, हे सांगितले, तेव्हा तो चकित झाला. काही दाम्पत्यांना बोलावून त्यांचे दुखणे काय, हे सांगितले तर ‘माइक’ बंद करून काही जणांना खासगीत सल्ला दिला. यावेळी मंत्री अतुल सावे, आ. प्रदीप जैस्वाल, हर्षवर्धन कराड, माजी महापौर नंदकुमार घोडेले, महावीर पाटणी, शीख समाज, सिंधी समाजाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

चमत्कार, अंधश्रद्धा नव्हे सिद्धीप्राप्ती...महाराजांनी सांगितले की, हा चमत्कार, अंधश्रद्धा नाही, सनातन धर्मात अशा सिद्धी आहेत, त्या मी तपस्येतून प्राप्त केल्या आहेत.

वाल्मीकी ऋषींनी आधी ‘रामायण’ लिहून ठेवलेरावणाचा नाश करण्यासाठी श्रीराम अवतार घेईल, हे वाल्मीकी ऋषींनी आधीच ‘रामायणा’त लिहून ठेवले होते. माझ्या आजोबांचे गुरू, नंतर आजोबांनी असे दरबार भरविले होते. आता मी भरवत आहे, असे महाराजांनी सांगितले.

पुन्हा जानेवारीत दरबारमहाराजांनी सागितले की, मी पुन्हा छत्रपती संभाजीनगरात येईन. ६ ते ८ जानेवारी २०२४ ला दरबार भरणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

आज समारोपबुधवारी कथेचा शेवटचा दिवस आहे. दुपारी ३.३० वाजता हनुमान कथेला सुरुवात होऊन सायंकाळी समारोप होईल.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादbageshwar dhamबागेश्वर धाम