शहरं
Join us  
Trending Stories
1
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
2
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
3
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
4
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
5
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
6
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
7
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
8
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
9
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
10
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
11
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
12
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
13
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
14
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
15
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
16
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
17
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
18
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
19
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
20
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...

बालाजी धामच्या दरबारात १६ जणांच्या लिहिल्या चिठ्ठ्या; महाराजांनी ‘माइक’ बंद करून सांगितले...

By प्रशांत तेलवाडकर | Updated: November 8, 2023 12:47 IST

भाविकांमधून बोलावले तरुणीला; सांगितले, एक जण तुझी बदनामी करतोय

छत्रपती संभाजीनगर : पं. धीरेंद्र कृष्ण शास्त्रींनी दुसऱ्या रांगेतील एका तरुणीला बोलावले... ती धर्मपीठावर येण्याआधीच तिची चिठ्ठी लिहून ठेवली होती... तिला सांगितले की, तुला एक जण बदनाम करीत आहे.’ हे ऐकून त्या तरुणीच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. एक तरुणाला बोलावून ... तुझे पहिले लग्न मोडले, आता दुसरे लग्न कोणत्या तारखेला होईल व त्याच्या भावी पत्नीचे नाव काय आहे हेही जाहीर केले.... अशा १६ जणांच्या चिठ्ठ्या महाराजांनी लिहिल्या... महाराज सर्वांच्या ‘मन की बात’ ते कशी ओळखतात हे पाहून अनेक जण भारावले.

सकल हिंदू जनजागरण समितीकडून आयोजित व केंद्रीय अर्थराज्यमंत्री डाॅ. भागवत कराड निमंत्रित पं. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या हनुमान कथेचे आयोजन करण्यात आले आहे. सिद्धी प्राप्तीचा दावा करणाऱ्या महाराजांबद्दल मोठी उत्सुकता जनमानसात आहे. त्यांच्या ‘बालाजी धाम सरकार’चा भव्य दरबार मंगळवारी भरविण्यात आला.

दरबारात चिठ्ठी लिहिण्यास सुरुवात होताच शिवम नावाच्या व्यक्तीला महाराजांनी आवाज दिला. त्याची समस्या व त्यावर उपाय लिहून दिला. नंतर पगडीधारी पिळदार मिशा असलेल्या वृद्धाची चिठ्ठी निघाली. त्यांच्या घरात मुलांमध्ये सुरू असलेला विवाद व त्यावर उपाय महाराजांनी सांगितला.

पाठीमागे गळ्यात दुपट्टा घातलेल्या तरुणाचे नाव पुकारले. तो धर्मपीठावर येताच त्याचे प्रेमप्रकरण सुरू आहे, हे सांगितले, तेव्हा तो चकित झाला. काही दाम्पत्यांना बोलावून त्यांचे दुखणे काय, हे सांगितले तर ‘माइक’ बंद करून काही जणांना खासगीत सल्ला दिला. यावेळी मंत्री अतुल सावे, आ. प्रदीप जैस्वाल, हर्षवर्धन कराड, माजी महापौर नंदकुमार घोडेले, महावीर पाटणी, शीख समाज, सिंधी समाजाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

चमत्कार, अंधश्रद्धा नव्हे सिद्धीप्राप्ती...महाराजांनी सांगितले की, हा चमत्कार, अंधश्रद्धा नाही, सनातन धर्मात अशा सिद्धी आहेत, त्या मी तपस्येतून प्राप्त केल्या आहेत.

वाल्मीकी ऋषींनी आधी ‘रामायण’ लिहून ठेवलेरावणाचा नाश करण्यासाठी श्रीराम अवतार घेईल, हे वाल्मीकी ऋषींनी आधीच ‘रामायणा’त लिहून ठेवले होते. माझ्या आजोबांचे गुरू, नंतर आजोबांनी असे दरबार भरविले होते. आता मी भरवत आहे, असे महाराजांनी सांगितले.

पुन्हा जानेवारीत दरबारमहाराजांनी सागितले की, मी पुन्हा छत्रपती संभाजीनगरात येईन. ६ ते ८ जानेवारी २०२४ ला दरबार भरणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

आज समारोपबुधवारी कथेचा शेवटचा दिवस आहे. दुपारी ३.३० वाजता हनुमान कथेला सुरुवात होऊन सायंकाळी समारोप होईल.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादbageshwar dhamबागेश्वर धाम