शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

एनएच २११ भूसंपादन प्रकरणात विभागीय चौकशी करण्याचे पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 19:08 IST

Aurangabad News आयुक्त केंद्रेकेर यांनी अहवालाच्या निष्कर्षाअंती या प्रकरणात विभागीय चौकशी करण्याची गरज असल्याचा अभिप्राय नोंदविणारे पत्र शासनाला पाठविले होते.

ठळक मुद्देतत्कालीन एसडीएम हदगल यांच्यासह यंत्रणेवर संशयचौकशीअंती अनेक महत्त्वपूर्ण बाबी समोर येण्याची शक्यता

औरंगाबाद : सोलापूर ते धुळे या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ साठी जिल्ह्यातील ८ गावांतील १३ गटांतील भूसंपादन प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याच्या संशयप्रकरणी शासनाने तत्कालीन उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल यांची विभागीय चौकशी करण्याचे पत्र विभागीय प्रशासनाला दिल्याची माहिती उच्चस्तरीय सूत्रांनी दिली. हदगल यांच्यासह भूसंपादन प्रक्रियेत असलेली सर्व यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात आली असून, आगामी काळात चौकशीअंती अनेक महत्त्वपूर्ण बाबी समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

ज्यांच्या जमिनी एनएच २११ साठी संपादित झाल्या त्यांच्यासह लोकप्रतिनिधींनी केलेल्या तक्रारीवरून विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी एक चौकशी समिती गठीत केली होती. त्या चौकशी समितीमध्ये अप्पर आयुक्त डॉ. विजयकुमार फड, तत्कालीन उपायुक्त वर्षा ठाकूर, उपायुक्त पुरुषोत्तम पाटोदेकर यांचा समावेश होता. सदरील समितीने गेल्या महिन्यात तक्रारींच्या अनुषंगाने पूर्ण शहानिशा करीत अहवाल विभागीय आयुक्तांना दिला होता. आयुक्त केंद्रेकेर यांनी अहवालाच्या निष्कर्षाअंती या प्रकरणात विभागीय चौकशी करण्याची गरज असल्याचा अभिप्राय नोंदविणारे पत्र शासनाला पाठविले होते. त्या अनुषंगाने शासनाने या प्रकरणात हदगल यांची विभागीय चौकशी करण्यास परवानगी दिली आहे. या चौकशीत हदगल यांचे म्हणणेदेखील ऐकले जाईल. तसेच नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडियाचे (एनएचएआय) म्हणणे ऐकले  जाईल. 

चौकशी समितीचा ठपकात्रिसदस्यीय चौकशी समितीने या प्रकरणाची चौकशी करताना १९ जमीनमालकांना दिलेल्या मावेजाबाबत माहिती संकलित केली. त्या भूसंपादनात ४१ कोटी रुपयांचा जास्तीचा मोबदला दिल्याचा निष्कर्ष नोंदविला. तिथे ५ कोटींच्या आसपास  रक्कम देणे अपेक्षित होते, असे समितीचे मत आहे. आठ गावांतील १३ गटांमधील जमिनी हायवेलगत दाखवून प्रतिचौरस मीटरमध्ये नगररचना विभागाने निर्धारित केलेला दर वाढवून जास्तीची रक्कम दिल्याचा चौकशी समितीचा निष्कर्ष आहे. याव्यतिरिक्त समितीने आणखी काही मुद्दे मांडले आहेत. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDivisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालयfraudधोकेबाजी