शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
4
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
5
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
6
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
7
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
8
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
9
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
10
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
11
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
12
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
13
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
14
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
15
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
16
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
17
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
18
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
19
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”

‘समांतर’च्या हमीसाठी महापौरांचे मुख्य सचिवांना पत्र; राज्य शासनाच्या संमतीनंतरच होणार अंतिम निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 14:04 IST

वाढीव २८९ कोटी रुपयांची हमी शासनाने द्यावी या आशयाचे पत्र मंगळवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी अतिरिक्त मुख्य सचिवांकडे पाठविले.

औरंगाबाद : समांतर जलवाहिनी टाकण्यासाठी लागणाऱ्या वाढीव २८९ कोटी रुपयांची हमी शासनाने द्यावी या आशयाचे पत्र मंगळवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी अतिरिक्त मुख्य सचिवांकडे पाठविले. मनपा आयुक्तांनीही शासनाकडून हमीपत्र मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना महापौरांनी केली. जोपर्यंत शासन पैसे देण्यासाठी आश्वासित करणार नाही, तोपर्यंत ठराव मंजूर होणार नाही, अशी भूमिका पक्षाची असल्याचेही त्यांनी नमूद केले.

सोमवारी सर्वसाधारण सभेत समांतर जलवाहिनीचा ठराव मंजूर करावा, असा आग्रह भाजपने धरला होता. बहुतांश सेना नगरसेवकांनीही मूक संमती दिली होती. सायंकाळी अचानक महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिवसभराच्या चर्चेनंतर निर्णय राखून ठेवला. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच सर्वसाधारण सभेने निर्णय राखून ठेवला आहे. मंगळवारी पत्रकारांशी बोलताना महापौर नंदकुमार घोडेले यांनी समांतरप्रकरणी आपली भूमिका मांडताना नमूद केले की, राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवांकडे पत्र पाठविण्यात आले आहे.

या पत्रात शासनाने समांतरसाठी २८९ कोटी रुपयांची हमी द्यावी, असे नमूद केले आहे. समांतर जलवाहिनी प्रकल्प पुन्हा नव्याने सुरू करण्यासाठीही शासनाने आपली भूमिका मनपाला कळवावी, असे पत्रात म्हटले आहे. सर्वसाधारण सभेत माजी महापौरांनी प्रस्तावाच्या वैधतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मात्र महापौरांनी त्याचे खंडण केले. हा ठराव कायदेशीर पद्धतीने आणि वैध स्वरूपातच सर्वसाधारण सभेत आला आहे. कंपनीने भागीदार बदलण्याची मागणी केली आहे. यासंदर्भातही उपनिबंधकाचा सल्ला घेणे, कायदेशीर सल्ला घेण्याचे काम सुरू आहे. राज्य शासनावर अविश्वास दाखविण्याचा प्रश्नच येत नाही. सभेत नगरसेवकांनी मागणी केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासनाने आपली भूमिका जाहीर केल्यानंतर ४ सप्टेंबर रोजी अंतिम निर्णय जाहीर करण्यात येणारच आहे, असेही महापौरांनी सांगितले.

महापौरांनी सभागृहनेत्यांना दिली चिठ्ठीमहापौर नंदकुमार घोडेले यांनी सर्वसाधारण सभा सुरू असताना सभागृहनेता विकास जैन यांना एक चिठ्ठी दिली. ही चिठ्ठी वाचून सभागृहनेत्यांनी पक्षाची भूमिका मांडली. शासनाने २८९ कोटी रुपयांसाठी हमी द्यावी, त्यानंतरच अंतिम निर्णय घ्यावा, असे जैन यांनी सभेत नमूद केले. त्यानंतर महापौरांनीही निर्णय राखून ठेवत हमीपत्र आल्यावरच निर्णय देणार असल्याचे जाहीर केले. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाParallel Waterline Aurangabadसमांतर जलवाहिनी औरंगाबादChief Ministerमुख्यमंत्री