शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

चला कॅशलेस होऊया; इथे अंडा आम्लेटचे बिल ‘पेटीएम’वर अदा होते!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2016 23:36 IST

लातूर या गाड्याचे मालक चेतन चव्हाण यांनी आपल्या गाड्यावर ‘पेटीएम’चा बारकोड लावून टाकला.

निशिकान्त मायी  लातूरलातूर : औसा रोडवरील अंडा आम्लेटचा गाडा.. दररोज संध्याकाळी खवय्यांची गर्दी.. हजार-पाचशेच्या नोटाबंदीनंतरही रोकड नसल्याने ही गर्दी ओसरली नाही. उलट वाढली. कारण या गाड्याचे मालक चेतन चव्हाण यांनी आपल्या गाड्यावर ‘पेटीएम’चा बारकोड लावून टाकला. दुसऱ्या गाड्यावर जिथे रोख द्यायला खिशात दमडी नाही, अशा लोकांनीही कॅशलेस व्यवहार होतो म्हणून चौकशी करुन करुन गर्दी वाढविली ! बदल.. बदल.. म्हणतात तो आणखी काय असतो...? नाही..! पूरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतनच्यासमोर अनेक छोटे छोटे व्यवसाय करणारे गाडे आहेत. पाणीपुरी, भेळपुरी, नारळपाणी, खारेमुरे ते अंडा आम्लेट. खवय्यांची गर्दी खेचून घेणारे हे गाडे. याशिवाय क्रीडा संकुलाच्या बसस्टॉपवर बसची प्रतीक्षा करणारे अनेक प्रवासी इथे थांबतात. वाहनांची वाट पाहताना पोटातल्या भुकेला शांत करण्यासाठी हे गाडे म्हणजे फाईव्ह स्टार हॉटेलच. चेतन चव्हाण नावाचा एक गाडेवाला गेल्या आठ ते दहा वर्षांपासून या रस्त्यावर आपला गाडा लावून उभा असतो. जेमतेम शिकलेला चेतन पंतप्रधान मोदींचा चाहता नाही की विरोधक नाही. शासनाच्या निर्णयाचा आदर करताना त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅशलेस व्यवहाराचे आवाहन ऐकले अन् नोटाबंदीनंतर आपल्याकडे रोख रकमेअभावी पाठ फिरविणाऱ्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ‘पेटीएम’चे अ‍ॅप डाऊनलोड करुन घेतले अन् चमत्कार झाला. गेल्या महिनाभरापासून त्याच्या गाड्यावरील ग्राहक दुपटीने वाढला आहे. कारण एकच, लोकांकडे रोकड आणि अंडा आम्लेटच्या दुसऱ्या गाड्यावर कॅशलेसची सोय नाही. ‘चेतनच्या गाड्यावर पेटीएम आहे, अशी ग्राहकांनीच त्याची जाहिरात केली. आता लोकांकडे पैसा वाढल्यावर रोकड व्यवहारही वाढले आहेत. मात्र त्याच्याकडे पेटीएमवर पैसे जमा करणारे कमी झालेले नाहीत. त्याचा हा कॅशलेसचा व्यवहार ग्राहकांनाही सोयीचा ठरू लागला आहे. गेल्या महिनाभरात तब्बल चार ते पाच हजार रुपये या पेटीएमच्या माध्यमातून त्याच्या बँकेच्या खात्यात जमा झाल्याचे, त्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. हॉटेलधारक, पानटपरीवाले, अंडा-आम्लेटचा व्यवसाय करणारे, पाणीपुरीच्या गाड्या इतकेच नव्हे तर भाजी विक्रेते या नाणेटंचाईने हैराण झाले होते. कॅशलेस व्यवहार होत असल्याने व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले़