शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

रबी पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 00:03 IST

खरीप हंगामातील पिकांसाठी पीक विमा काढण्यासाठी एकीकडे शेतकºयांनी बँका, तसेच सेतू केंद्रांसमोर दिवसरात्र तळ ठोकला होता. मात्र, फुलंब्री तालुक्यातील शेतकºयांनी यंदा रबी हंगामातील पीक विमा काढण्यासाठी उदासीनता दाखविली आहे.

रऊफ शेखफुलंब्री : खरीप हंगामातील पिकांसाठी पीक विमा काढण्यासाठी एकीकडे शेतकºयांनी बँका, तसेच सेतू केंद्रांसमोर दिवसरात्र तळ ठोकला होता. मात्र, फुलंब्री तालुक्यातील शेतकºयांनी यंदा रबी हंगामातील पीक विमा काढण्यासाठी उदासीनता दाखविली आहे. येथील २२ हजार शेतकºयांपैकी केवळ १,७५० शेतकºयांनी रबी पिकांसाठी विमा काढला असून, याला कारणीभूत यावर्षीचा दुष्काळ असल्याचे बोलले जात आहे. मात्र, बळीराजाने विमा काढण्याकडे दुर्लक्ष केल्याने नुकसानही त्यांचेच होणार आहे, असे मत जाणकारांनी व्यक्त केल आहे.तालुक्यात रबी पिके घेणाºया शेतकºयांची संख्या २२ हजारांवर आहे. यावर्षी विविध कारणांमुळे खरीप व रबी पिके धोक्यात आली व त्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पन्नात घट झाल्याचे दिसून आले. काही वेळा पिकांची नासाडी झाल्याने बळीराजाला आर्थिक फटका बसला. मात्र, तरीही यावर्षी रबी पिकांच्या विम्याकडे बहुतांश शेतकºयांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे पीक विमा भरण्यासाठी मोठी रक्कम लागत नाही. मात्र, पिकांचे नुकसान झाले, तर मदतीसाठी शासनाकडे मोठी प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे शेतकºयांनी विमा न काढणेच पसंत केले.जाणकारांच्या मते तालुक्यात गत काही वर्षांपासून पर्जन्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. अशा परिस्थितीत येथील शेतकºयांनी गतवर्षी काही प्रमाणात पीकविमा काढला होता; पण त्यातून पुरेसा मोबदला मिळाला नसल्याने बळीराजा हताश झाला आहे. याच कारणामुळे त्यांनी विम्याकडे दुर्लक्ष केले. विशेष बाब म्हणजे विमा काढावा यासाठी शासनाने कृषी विभागाकडे जनजागृती करण्याची जबाबदारी दिलेली आहे. त्यांनी गावोगावी जाऊन पीक विमा संरक्षणाबाबत माहिती दिली. मात्र, त्याचा काहीही फायदा झालेला दिसून येत नाही. विम्याची रक्कम वेळेवर मिळत नाही, बँकेत चकरा माराव्या लागतात, ठरवून देलेली रक्कम मिळत नाही. त्यामुळे विमा न काढणेच पसंत केल्याचे येथील बहुतांश शेतकºयांनी सांगितले.दरम्यान, तालुक्यात रबी पिकाचे क्षेत्र २९ हजार हेक्टर असून, यातील केवळ ८८९ हेक्टर क्षेत्राचा पीक विमा उतरविण्यात आला. त्यापैकी रबी पिके घेणाºया शेतकºयांची संख्या २२ हजार एवढी आहे. मात्र, २२ हजार शेतकºयांपैकी अवघ्या १,७५० शेतकºयांनी विमा काढला आहे, तर २० हजार शेतकºयांनी पीक विमा योजनेकडे पाठ फिरविली असून, ज्या शेतकºयांनी पीक विमा काढला नाही, असे शेतकरी विम्याच्या लाभापासून वंचित राहू शकतात, हे लक्षात असूनही याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले.पीक विमा भरण्यासाठी शेतकºयाला एकूण रकमेच्या केवळ पाच टक्केच रक्कम भरावी लागते. उर्वरित रक्कम केंद्र सरकार व राज्य सरकार मिळून भरतात. त्यामुळे शेतकºयांवर फारसे ओझे पडत नाही. मात्र, असे असतानाही शेतकरी या योजनेकडे दुर्लक्ष करतात. तालुक्यातील शेतकºयांनी रबी हंगाम २०१५-२०१६ मध्ये गहू व हरभºयासाठी विमा काढला होता. मात्र, नुकसान झालेले असताना त्यांना शेतकºयांच्या बियाणांचा खर्चही निघाला नाही. याच परिस्थितीचा अनुभव शेतकºयांना २०१६-२०१७ मध्ये आला होता. त्यामुळे दरवर्षी विमा काढणाºया शेतकºयांची संख्या घटताना दिसत आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी