शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

लिंबाचे दिवस फिरले! दर अचानक एवढे गडगडले की, शेतकरी गडबडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 15:27 IST

काही दिवसांपूर्वी लिंबाने देशभरातील नागरिकांना रडवले. लिंबाचे भाव 200-250 रुपये किलोपर्यंत झाले होते. पण, आता हळुहळू लिंबाचे भाव कमी होताना दिसत आहेत. 

औरंगाबाद: काही दिवसांपूर्वी लिंबाने देशभरातील नागरिकांना रडवले. लिंबाचे भाव 200-250 रुपये किलोपर्यंत झाले होते. पण, आता हळुहळू लिंबाचे भाव कमी होताना दिसत आहेत. औरंगाबाद शहरातील बाजार समितीमध्ये आज अचानक लिंबाचे भाव मोठ्या प्रमाणात घसरले. मार्च महिन्यात दोनशे रुपये किलो असलेला लिंबू आज अचानक 50-60 रुपये किलोवर आला आहे.

यासंदर्भात बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी माहिती दिली की, परराज्यातून लिंबाची मोठ्या प्रमाणात आवक बाजार समितीत झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील लिंबाच्या पिकाला मोठा फटका बसलाय. यासोबतच अचानकपणे वातावरणात झालेला बदल, वादळी वाऱ्यासह पडणारा पाऊस, याचा सुद्धा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

गेल्या दोन महिन्यापासून लिंबूला चांगली बाजारपेठ आणि चांगला भाव मिळाला होता यामध्ये शेतकऱ्यांना चांगली कमाई होत होती. मात्र अचानकपणे इतर राज्यातील व्यापाऱ्यांनी औरंगाबाद बाजार समितीच्या बाजारपेठेमध्ये लिंबाची मोठ्या प्रमाणात आवक केल्याने जिल्ह्यातील लिंबाचे भाव पडले आहेत. अशी प्रतिक्रिया काही व्यापारी आणि शेतकऱ्यांनी आज रोजी दिली आहे. दरम्यान, या स्वस्त आणि महाग लिबांमध्ये फरकही पाहायला मिळत आहेत. काही लिंबू अनैसर्गिक पद्धतीने पिकवलेले आहेत, तर काही नैसर्गिक आहेत. त्यानुसार, लिंबांच्या दरांमध्ये फरकही दिसून येतोय.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद