शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नामांतर लढ्यात प्रारंभापासूनच डाव्यांचा सक्रिय सहभाग होता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 16:35 IST

सत्याग्रह, मोर्चे, लाँगमार्च यात डाव्या पक्ष संघटना सातत्याने सहभाग घेत असत.

विद्यापीठ नामांतर लढ्यात प्रारंभापासूनच भाकप, डावे पक्ष व त्यांच्या संघटनांचा सक्रिय सहभाग होता. सत्याग्रह, मोर्चे, लाँगमार्च यात डाव्या पक्ष संघटना सातत्याने सहभाग घेत असत. मी स्वत: येरवड्याच्या कारागृहात वीस दिवस होतो, असे ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते व विधिज्ञ कॉ. मनोहर टाकसाळ यांनी सांगितले. 

नामांतराच्या यंदाच्या रौप्य महोत्सवानिमित्त ते ‘लोकमत’शी बोलत होते. त्यांनी सांगितले की, लढा नामांतरासाठी होता; पण प्रत्यक्षात नामविस्तार झाला. तडजोडीने हा लढा संपला. समतेकडे एकेक पाऊल टाकणारा हा नामांतर लढा होता; परंतु मराठवाड्याच्या काही धुरिणांनी नामांतरास विरोध केला आणि त्यात मराठवाड्यात दलितांच्या घरादारांची राखरांगोळी झाली. अनेक जण शहीद झाले. खंत वाटते ती अशी की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातदेखील डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचे कृतीने जतन होत आहे, असे दिसत नाही. या विद्यापीठातही कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने शेतमजूर राबराब राबतात. त्यांचे वेतनही महिनोन्महिने मिळत नाही. 

१६ वर्षे लढा लढूनही नामविस्तार झाला. समतेचे स्वप्न स्वप्नच राहिले. कॉ. चंद्रगुप्त चौधरी यांच्या नेतृत्वाखाली भाकप व डाव्या पक्ष-संघटनांचा या लढ्यात प्रारंभापासून मोलाचा सहभाग होता. तत्कालीन पँथर नेते गंगाधर गाडे यांनी नामांतरासाठी सह्यांची मोहीम सुरू केली होती. त्यावर ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉ. व्ही.डी. देशपांडे यांची व माझी सही होती. मनमाड येथे भाकपची राज्य परिषद झाली. त्यावेळी कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठ नामांतराचा ठराव संमत केला होता.

मुंबईच्या अंधेरीत शेकडो कार्यकर्त्यांनी सत्याग्रह केला. त्यात माझ्यासमवेत कॉ. भाऊलाल टेलर, भाई शरद गव्हाणे, रतनकुमार पंडागळे, अ‍ॅड. रमेशभाई खंडागळे, साथी सुभाष लोमटे आदीही येरवडा कारागृहात होते. बाजूच्या बरॅकमध्ये प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, धुळ्याचे चौरासिया  यासारखे नेतेही होते. लक्षात राहिलेला आणखी एक प्रसंग असा की, भेंडाळा येथून पोलिसांना चकवा देऊन शेताशेतातून आम्ही लाँगमार्च काढला. पुढे छावणीजवळ कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली, या आठवणींना कॉ. टाकसाळ यांनी उजाळा दिला. 

त्यांनी आणखी सांगितले की, औरंगाबाद मतदारसंघातून त्याकाळी मी आमदारकीची निवडणूक लढवली होती. भाकपच्या तिकिटावर मी उभा होतो; पण अन्य कोणत्याही उमेदवाराने नामांतराला पाठिंबा जाहीर केला नव्हता. मात्र, मी जाहीरपणे मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मिळालेच पाहिजे, ही भूमिका घेऊन निवडणूक लढवली.

( शब्दांकन : स.सो. खंडाळकर ) 

टॅग्स :Namantar Andolanनामांतर आंदोलनDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादMarathwadaमराठवाडा