शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
3
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
4
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
5
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
6
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
7
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
8
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
9
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
10
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
11
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
12
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
13
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
16
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
17
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
18
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
19
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
20
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?

नामांतर लढ्यात प्रारंभापासूनच डाव्यांचा सक्रिय सहभाग होता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 16:35 IST

सत्याग्रह, मोर्चे, लाँगमार्च यात डाव्या पक्ष संघटना सातत्याने सहभाग घेत असत.

विद्यापीठ नामांतर लढ्यात प्रारंभापासूनच भाकप, डावे पक्ष व त्यांच्या संघटनांचा सक्रिय सहभाग होता. सत्याग्रह, मोर्चे, लाँगमार्च यात डाव्या पक्ष संघटना सातत्याने सहभाग घेत असत. मी स्वत: येरवड्याच्या कारागृहात वीस दिवस होतो, असे ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते व विधिज्ञ कॉ. मनोहर टाकसाळ यांनी सांगितले. 

नामांतराच्या यंदाच्या रौप्य महोत्सवानिमित्त ते ‘लोकमत’शी बोलत होते. त्यांनी सांगितले की, लढा नामांतरासाठी होता; पण प्रत्यक्षात नामविस्तार झाला. तडजोडीने हा लढा संपला. समतेकडे एकेक पाऊल टाकणारा हा नामांतर लढा होता; परंतु मराठवाड्याच्या काही धुरिणांनी नामांतरास विरोध केला आणि त्यात मराठवाड्यात दलितांच्या घरादारांची राखरांगोळी झाली. अनेक जण शहीद झाले. खंत वाटते ती अशी की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातदेखील डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचे कृतीने जतन होत आहे, असे दिसत नाही. या विद्यापीठातही कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने शेतमजूर राबराब राबतात. त्यांचे वेतनही महिनोन्महिने मिळत नाही. 

१६ वर्षे लढा लढूनही नामविस्तार झाला. समतेचे स्वप्न स्वप्नच राहिले. कॉ. चंद्रगुप्त चौधरी यांच्या नेतृत्वाखाली भाकप व डाव्या पक्ष-संघटनांचा या लढ्यात प्रारंभापासून मोलाचा सहभाग होता. तत्कालीन पँथर नेते गंगाधर गाडे यांनी नामांतरासाठी सह्यांची मोहीम सुरू केली होती. त्यावर ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉ. व्ही.डी. देशपांडे यांची व माझी सही होती. मनमाड येथे भाकपची राज्य परिषद झाली. त्यावेळी कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठ नामांतराचा ठराव संमत केला होता.

मुंबईच्या अंधेरीत शेकडो कार्यकर्त्यांनी सत्याग्रह केला. त्यात माझ्यासमवेत कॉ. भाऊलाल टेलर, भाई शरद गव्हाणे, रतनकुमार पंडागळे, अ‍ॅड. रमेशभाई खंडागळे, साथी सुभाष लोमटे आदीही येरवडा कारागृहात होते. बाजूच्या बरॅकमध्ये प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, धुळ्याचे चौरासिया  यासारखे नेतेही होते. लक्षात राहिलेला आणखी एक प्रसंग असा की, भेंडाळा येथून पोलिसांना चकवा देऊन शेताशेतातून आम्ही लाँगमार्च काढला. पुढे छावणीजवळ कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली, या आठवणींना कॉ. टाकसाळ यांनी उजाळा दिला. 

त्यांनी आणखी सांगितले की, औरंगाबाद मतदारसंघातून त्याकाळी मी आमदारकीची निवडणूक लढवली होती. भाकपच्या तिकिटावर मी उभा होतो; पण अन्य कोणत्याही उमेदवाराने नामांतराला पाठिंबा जाहीर केला नव्हता. मात्र, मी जाहीरपणे मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मिळालेच पाहिजे, ही भूमिका घेऊन निवडणूक लढवली.

( शब्दांकन : स.सो. खंडाळकर ) 

टॅग्स :Namantar Andolanनामांतर आंदोलनDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादMarathwadaमराठवाडा