शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

नामांतर लढ्यात प्रारंभापासूनच डाव्यांचा सक्रिय सहभाग होता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 16:35 IST

सत्याग्रह, मोर्चे, लाँगमार्च यात डाव्या पक्ष संघटना सातत्याने सहभाग घेत असत.

विद्यापीठ नामांतर लढ्यात प्रारंभापासूनच भाकप, डावे पक्ष व त्यांच्या संघटनांचा सक्रिय सहभाग होता. सत्याग्रह, मोर्चे, लाँगमार्च यात डाव्या पक्ष संघटना सातत्याने सहभाग घेत असत. मी स्वत: येरवड्याच्या कारागृहात वीस दिवस होतो, असे ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते व विधिज्ञ कॉ. मनोहर टाकसाळ यांनी सांगितले. 

नामांतराच्या यंदाच्या रौप्य महोत्सवानिमित्त ते ‘लोकमत’शी बोलत होते. त्यांनी सांगितले की, लढा नामांतरासाठी होता; पण प्रत्यक्षात नामविस्तार झाला. तडजोडीने हा लढा संपला. समतेकडे एकेक पाऊल टाकणारा हा नामांतर लढा होता; परंतु मराठवाड्याच्या काही धुरिणांनी नामांतरास विरोध केला आणि त्यात मराठवाड्यात दलितांच्या घरादारांची राखरांगोळी झाली. अनेक जण शहीद झाले. खंत वाटते ती अशी की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातदेखील डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचे कृतीने जतन होत आहे, असे दिसत नाही. या विद्यापीठातही कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने शेतमजूर राबराब राबतात. त्यांचे वेतनही महिनोन्महिने मिळत नाही. 

१६ वर्षे लढा लढूनही नामविस्तार झाला. समतेचे स्वप्न स्वप्नच राहिले. कॉ. चंद्रगुप्त चौधरी यांच्या नेतृत्वाखाली भाकप व डाव्या पक्ष-संघटनांचा या लढ्यात प्रारंभापासून मोलाचा सहभाग होता. तत्कालीन पँथर नेते गंगाधर गाडे यांनी नामांतरासाठी सह्यांची मोहीम सुरू केली होती. त्यावर ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉ. व्ही.डी. देशपांडे यांची व माझी सही होती. मनमाड येथे भाकपची राज्य परिषद झाली. त्यावेळी कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठ नामांतराचा ठराव संमत केला होता.

मुंबईच्या अंधेरीत शेकडो कार्यकर्त्यांनी सत्याग्रह केला. त्यात माझ्यासमवेत कॉ. भाऊलाल टेलर, भाई शरद गव्हाणे, रतनकुमार पंडागळे, अ‍ॅड. रमेशभाई खंडागळे, साथी सुभाष लोमटे आदीही येरवडा कारागृहात होते. बाजूच्या बरॅकमध्ये प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, धुळ्याचे चौरासिया  यासारखे नेतेही होते. लक्षात राहिलेला आणखी एक प्रसंग असा की, भेंडाळा येथून पोलिसांना चकवा देऊन शेताशेतातून आम्ही लाँगमार्च काढला. पुढे छावणीजवळ कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली, या आठवणींना कॉ. टाकसाळ यांनी उजाळा दिला. 

त्यांनी आणखी सांगितले की, औरंगाबाद मतदारसंघातून त्याकाळी मी आमदारकीची निवडणूक लढवली होती. भाकपच्या तिकिटावर मी उभा होतो; पण अन्य कोणत्याही उमेदवाराने नामांतराला पाठिंबा जाहीर केला नव्हता. मात्र, मी जाहीरपणे मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मिळालेच पाहिजे, ही भूमिका घेऊन निवडणूक लढवली.

( शब्दांकन : स.सो. खंडाळकर ) 

टॅग्स :Namantar Andolanनामांतर आंदोलनDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादMarathwadaमराठवाडा