शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
4
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
5
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
6
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
7
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
8
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
9
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
10
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
11
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
12
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
13
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
14
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
15
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
16
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
17
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
18
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
19
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
20
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!

जायकवाडीतून पाणी सोडा, अन्यथा औरंगाबादचा पाणीपुरवठा बंद करु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 14:25 IST

पैठण ते चितेगाव या दरम्यान जलवाहिनीवर शेतकरी हल्ला करू शकतात, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ठळक मुद्दे पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांची आक्रमक भूमिका शेतात उभ्या असलेल्या फळबागा आता माना टाकायला लागल्या आहेत.

पैठण (औरंगाबाद ) : पैठण तालुक्यातील आपेगाव व हिरडपुरी बंधाऱ्यात जायकवाडी धरणातूनपाणी सोडले नाही तर २१ मे रोजी जायकवाडी धरणातून औरंगाबाद शहराला होणारा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय रविवारी पैठण येथे झालेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. बंधाऱ्यात पाणी सोडावे म्हणून पैठण तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत.

पैठण तालुक्यातील आपेगाव व हिरडपुरी बंधारे कोरडे झाले आहेत. त्यातच पैठण ते हिरडपुरीदरम्यान गोदावरी पात्र आटले आहे. यामुळे गोदावरी पात्रातून ज्या गावांनी पाणीपुरवठा योजना केल्या आहेत, अशा गावात पाण्याचा ठणठणाट आहे. पैठण तालुक्यासह शेवगाव व गेवराई तालुक्यातील अनेक गावांना गोदावरी पात्र, आपेगाव व हिरडपुरी बंधारे आटल्याने भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गोदाकाठच्या गावात पाण्याच्या भरवशावर शेतात उभ्या असलेल्या अनेक वर्षांच्या फळबागा आता माना टाकायला लागल्या आहेत. वेळेत पाणी उपलब्ध न झाल्यास शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी अस्वस्थ झाले आहेत. पाण्यासाठी शेतकऱ्यांची तगमग वाढली असून यातून शेतकरी आक्रमक झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

पाण्यासाठी अन्नदाता शेतकरी संघटना व शेतकरी संघटनेच्या वतीने १३ ते १६ मे या दरम्यान पैठण व औरंगाबाद येथे जोरदार आंदोलन केले होते; मात्र केवळ तोंडी आश्वासनावर प्रशासनाने शेतकऱ्यांची बोळवण केली होती. आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी रविवारी जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी असलेल्या जोगेश्वरी येथे शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आम्हाला पाणी नाही तर कुणालाच नाही, अशी टोकाची भूमिका घेत औरंगाबाद शहराला होणारा पाणीपुरवठा तोडण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस जयाजी सुर्यवंशी, हनुमान बेळगे, शरद गुंते, महादेव गोर्डे, वाघमोडे बाबा, शिवराज शिंदे, पवन औटे, सलीम पठाण, मकबूल पठाण, प्रशांत नरके, अशोक बनकर, दादासाहेब पवार, प्रदीप नरके, कृष्णा गहिरे व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रशासन : आंदोलनातील सक्रिय चेहरे गायबआजच्या बैठकीसाठी नेहमी आंदोलनात सक्रिय असलेले चेहरे दिसून आले नाही. प्रत्यक्षात पाणीपुरवठा तोडण्यासाठी हे चेहरे नियुक्त असून प्रशासनासमोर त्यांना आणण्यात आले नाही. पैठण ते चितेगाव या दरम्यान जलवाहिनीवर शेतकरी हल्ला करू शकतात, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीFarmerशेतकरी