शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
3
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
4
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
5
हॉर्लिक्स, विक्स, झंडू बाम, डायपर, टुथपेस्ट... सर्वकाही स्वस्त; दिग्गज कंपन्यांनी जारी केली नवी लिस्ट
6
"एकटं वाटलं की मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते...", रिंकूने सांगितलं कारण, म्हणाली...
7
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
8
‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
9
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
10
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
11
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले
12
यूएई सामन्याआधी केलेलं नाटक पाकिस्तानच्या अंगलट, आयसीसीनं पाठवला ईमेल!
13
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
14
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
15
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
16
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
18
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
19
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
20
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!

जायकवाडीतून पाणी सोडा, अन्यथा औरंगाबादचा पाणीपुरवठा बंद करु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 14:25 IST

पैठण ते चितेगाव या दरम्यान जलवाहिनीवर शेतकरी हल्ला करू शकतात, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ठळक मुद्दे पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांची आक्रमक भूमिका शेतात उभ्या असलेल्या फळबागा आता माना टाकायला लागल्या आहेत.

पैठण (औरंगाबाद ) : पैठण तालुक्यातील आपेगाव व हिरडपुरी बंधाऱ्यात जायकवाडी धरणातूनपाणी सोडले नाही तर २१ मे रोजी जायकवाडी धरणातून औरंगाबाद शहराला होणारा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय रविवारी पैठण येथे झालेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. बंधाऱ्यात पाणी सोडावे म्हणून पैठण तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत.

पैठण तालुक्यातील आपेगाव व हिरडपुरी बंधारे कोरडे झाले आहेत. त्यातच पैठण ते हिरडपुरीदरम्यान गोदावरी पात्र आटले आहे. यामुळे गोदावरी पात्रातून ज्या गावांनी पाणीपुरवठा योजना केल्या आहेत, अशा गावात पाण्याचा ठणठणाट आहे. पैठण तालुक्यासह शेवगाव व गेवराई तालुक्यातील अनेक गावांना गोदावरी पात्र, आपेगाव व हिरडपुरी बंधारे आटल्याने भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गोदाकाठच्या गावात पाण्याच्या भरवशावर शेतात उभ्या असलेल्या अनेक वर्षांच्या फळबागा आता माना टाकायला लागल्या आहेत. वेळेत पाणी उपलब्ध न झाल्यास शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी अस्वस्थ झाले आहेत. पाण्यासाठी शेतकऱ्यांची तगमग वाढली असून यातून शेतकरी आक्रमक झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

पाण्यासाठी अन्नदाता शेतकरी संघटना व शेतकरी संघटनेच्या वतीने १३ ते १६ मे या दरम्यान पैठण व औरंगाबाद येथे जोरदार आंदोलन केले होते; मात्र केवळ तोंडी आश्वासनावर प्रशासनाने शेतकऱ्यांची बोळवण केली होती. आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी रविवारी जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी असलेल्या जोगेश्वरी येथे शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आम्हाला पाणी नाही तर कुणालाच नाही, अशी टोकाची भूमिका घेत औरंगाबाद शहराला होणारा पाणीपुरवठा तोडण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस जयाजी सुर्यवंशी, हनुमान बेळगे, शरद गुंते, महादेव गोर्डे, वाघमोडे बाबा, शिवराज शिंदे, पवन औटे, सलीम पठाण, मकबूल पठाण, प्रशांत नरके, अशोक बनकर, दादासाहेब पवार, प्रदीप नरके, कृष्णा गहिरे व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रशासन : आंदोलनातील सक्रिय चेहरे गायबआजच्या बैठकीसाठी नेहमी आंदोलनात सक्रिय असलेले चेहरे दिसून आले नाही. प्रत्यक्षात पाणीपुरवठा तोडण्यासाठी हे चेहरे नियुक्त असून प्रशासनासमोर त्यांना आणण्यात आले नाही. पैठण ते चितेगाव या दरम्यान जलवाहिनीवर शेतकरी हल्ला करू शकतात, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीFarmerशेतकरी