शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कुटुंबशाहीतून नेते, कार्यकर्त्यांनी मुक्त व्हावे : प्रकाश आंबेडकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 13:12 IST

कुटुंबशाहीतून मुक्त होण्याची ही संधी

औरंगाबाद : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत कुटुंबशाही आहे. त्यामुळे या पक्षातील नेते, कार्यकर्त्यांनी बहुजन वंचित आघाडीत यावे. त्यांना योग्य सन्मान, पदे, उमेदवारीही देण्यात येईल. कुटुंबशाहीतून मुक्त होण्याची ही संधी असल्याचे मत बहुजन वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज येथे केले.

बीड बायपास रोडवरील जबिंदा लॉन येथे शुक्रवारी रात्री वंचित आघाडीचे उमेदवार आ. इम्तियाज जलील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एमआयएम पक्षप्रमुख खा. असदोद्दीन ओवेसी, आ. इम्तियाज जलील, आ. वारीस पठाण यांच्यासह स्थानिक नेते, कार्यकर्ते, नगरसेवक उपस्थित होते. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी नमूद केले की, आम्ही ४८ जागा का लढविल्या, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. ईव्हीएम मशीन जेव्हा उघडतील तेव्हा बघा... आज अंदाज लावणे कोणालाही सोपे जात नाही. ज्या उमेदवाराच्या जातीची मतेच नाहीत, त्यांनाही आम्ही उमेदवारी दिली. जात पाहून उमेदवारी देण्याचा फंडा ‘वंचित’मध्ये नाही. ‘वंचित’कडे पैसा आला कोठून, असा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय. जनता जनार्दन मत, पैसा देऊन सभांना गर्दी करीत असल्याचे त्यांनी नमूद केले. एमआयएमच्या जिल्हाध्यक्ष पदावरून काढण्यात आलेले जावेद कुरैशी यांना आज पुन्हा पक्षात स्थान देण्यात आले.

साध्वी प्रज्ञा ठाकूरवर डागली तोफखा. असदोद्दीन ओवेसी यांनी साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्या उमेदवारीवरून पंतप्रधान मोदी यांच्यावर तोफ डागली. दहशतवादाच्या विरोधात मोदी लढत असलेली लढाई नाट्य असल्याचा आरोप त्यांनी केला. शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल साध्वीने केलेल्या आरोपांचाही खरपूस समाचार  घेतला. शहीद करकरे यांना श्रद्धांजलीही वाहण्यात आली. युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर ७२ तासांची बंदी निवडणूक आयोगाने घातली होती. त्यानंतर त्यांनी आज पुन्हा बाबरच्या मुलांना मत देऊ नका, असे आवाहन केले. यावरही ओवेसींनी तोफ डागली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकर