शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

कुटुंबशाहीतून नेते, कार्यकर्त्यांनी मुक्त व्हावे : प्रकाश आंबेडकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 13:12 IST

कुटुंबशाहीतून मुक्त होण्याची ही संधी

औरंगाबाद : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत कुटुंबशाही आहे. त्यामुळे या पक्षातील नेते, कार्यकर्त्यांनी बहुजन वंचित आघाडीत यावे. त्यांना योग्य सन्मान, पदे, उमेदवारीही देण्यात येईल. कुटुंबशाहीतून मुक्त होण्याची ही संधी असल्याचे मत बहुजन वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज येथे केले.

बीड बायपास रोडवरील जबिंदा लॉन येथे शुक्रवारी रात्री वंचित आघाडीचे उमेदवार आ. इम्तियाज जलील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एमआयएम पक्षप्रमुख खा. असदोद्दीन ओवेसी, आ. इम्तियाज जलील, आ. वारीस पठाण यांच्यासह स्थानिक नेते, कार्यकर्ते, नगरसेवक उपस्थित होते. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी नमूद केले की, आम्ही ४८ जागा का लढविल्या, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. ईव्हीएम मशीन जेव्हा उघडतील तेव्हा बघा... आज अंदाज लावणे कोणालाही सोपे जात नाही. ज्या उमेदवाराच्या जातीची मतेच नाहीत, त्यांनाही आम्ही उमेदवारी दिली. जात पाहून उमेदवारी देण्याचा फंडा ‘वंचित’मध्ये नाही. ‘वंचित’कडे पैसा आला कोठून, असा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय. जनता जनार्दन मत, पैसा देऊन सभांना गर्दी करीत असल्याचे त्यांनी नमूद केले. एमआयएमच्या जिल्हाध्यक्ष पदावरून काढण्यात आलेले जावेद कुरैशी यांना आज पुन्हा पक्षात स्थान देण्यात आले.

साध्वी प्रज्ञा ठाकूरवर डागली तोफखा. असदोद्दीन ओवेसी यांनी साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्या उमेदवारीवरून पंतप्रधान मोदी यांच्यावर तोफ डागली. दहशतवादाच्या विरोधात मोदी लढत असलेली लढाई नाट्य असल्याचा आरोप त्यांनी केला. शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल साध्वीने केलेल्या आरोपांचाही खरपूस समाचार  घेतला. शहीद करकरे यांना श्रद्धांजलीही वाहण्यात आली. युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर ७२ तासांची बंदी निवडणूक आयोगाने घातली होती. त्यानंतर त्यांनी आज पुन्हा बाबरच्या मुलांना मत देऊ नका, असे आवाहन केले. यावरही ओवेसींनी तोफ डागली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकर