शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
2
“दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही, एअर स्ट्राइक करणे पर्याय असू शकत नाही”: राज ठाकरे
3
‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणजे माझ्या आईसारख्या महिलांचा सन्मान; गणबोटे कुटुंबाने मानले मोदींचे आभार 
4
युद्धापूर्वीच पाकिस्तानचे आत्मसमर्पण, संरक्षण मंत्री म्हणाले- 'आम्ही कारवाई करणार नाही'
5
Operation Sindoor : अखेर न्याय झालाच! भारताने पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला; कोणी दिलं 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव?
6
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर काय काय घडलं? जगभरातून समर्थन...
7
'अभी पिक्चर बाकी है...', ऑपरेशन सिंदूरनंतर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची सूचक पोस्ट!
8
पीएम किसानचा २०वा हप्ता कधी येणार? तुमचं नाव यादीत आहे का? मोबाईलवरुनही तपासू शकता
9
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
10
'ऑपरेशन सिंदूर' हेच नाव का ठेवले गेले? काय आहे भारतीय संस्कृतीत सिंदूरचे महत्त्व? वाचा!
11
Operation Sindoor Live Updates: "यापुढेही भारतावर हल्ल्याची शक्यता, म्हणून उत्तर देणे गरजेचे होते"
12
Operation Sindoor: कुख्यात दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबाचा खात्मा; १४ लोकांना यमसदनी धाडलं
13
आजोबा, वडील एक्स आर्मी, पतीही...! कोण आहेत 'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देणाऱ्या लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी
14
Operation Sindoor: नऊ ठिकाणं... ९० दहशतवाद्यांचा खात्मा; भारतीय लष्कराने दहशतवाद्यांचे कंबरडेच मोडले!
15
Operation Sindoor: २५ मिनिटांत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त; कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितला थरार
16
Operation Sindoor : पाकिस्तानमध्ये हल्ल्याच्या २३ मिनिटे आधीच लष्कराने ट्विट केले? समोर आली माहिती
17
‘ऑपरेशन सिंदूर’चे श्रेय तुम्ही घेऊ नका, ते फक्त भारतीय सेनेचेच; संजय राऊतांची सरकारवर टीका
18
'ऑपरेशन सिंदूर'चा परिणाम! 'या' डिफेन्स स्टॉक्सने घेतली मोठी झेप; ३ महिन्यात नफा दुप्पट
19
गृह मंत्रालय अलर्ट! निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकमधील तणाव वाढला
20
पाकिस्तानी स्टॉक मार्केटचे काय हाल ऐकाल...; रात्री भारताची मिसाईल कोसळली, दिवसा भीतीने शेअर बाजार...

एलबीटी वसुलीला प्रशासकीय ग्रहण !

By admin | Updated: November 24, 2014 00:36 IST

आशपाक पठाण , लातूर महानगरपालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत असलेल्या एलबीटी वसुलीत मनपाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मवाळ भूमिका घेतल्याने उत्पन्नाचा टक्का वाढलाच नाही

आशपाक पठाण , लातूरमहानगरपालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत असलेल्या एलबीटी वसुलीत मनपाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मवाळ भूमिका घेतल्याने उत्पन्नाचा टक्का वाढलाच नाही. राज्य शासनाने नोव्हेंबर २०१२ साली लातूर महापालिकेला एलबीटी लागू केली. जानेवारी २०१३ पासून लातूरच्या व्यापाऱ्यांनी एलबीटीचा भरणा सुरू केला. ग्राहकांच्या खिश्यातून वसूल होत असलेला हा कर भरण्यासाठी अनेक व्यावसायिकांनी विरोध केला. शहर विकासासाठी मिळणाऱ्या महसुलातून अनेक कामे होतील, अशी आस्था अधिकारी व कर्मचाऱ्यांना होती. मात्र एलबीटीची अंमलबजावणी रितसरपणे झाली नसल्याने लातुरात एलबीटीचा भरणा अत्यंत तुटपुंजा आहे.नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत एलबीटी रद्द करावी, या मागणीसाठी व्यापाऱ्यांनी शासनाकडे हट्ट धरला होता. भाजपाचे सरकार आल्यावर एलबीटी रद्द केली जाईल, अशी घोषणा करीत सत्तेवर आलेल्या शासनाने आता एलबीटीशिवाय पर्याय नसल्याचा सूर आवळल्याने व्यापाऱ्यांनी सरकारवर नाराजी दर्शविली आहे. लातूर शहर महानगरपालिकेत जवळपास ३ हजार १०० व्यावसायिकांनी एलबीटीसाठी नोंदणी केलेली आहे. व्यापाऱ्यांचा विरोध व शासनाच्या मवाळ धोरणामुळे मनपाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वसुलीसाठी ढिलाई दिली. परिणामी, एकूण व्यावसायिकांपैकी केवळ दीडशे जणांनीच मनपाला एलबीटीचा कर भरणा केला आहे. लातूर महापालिका प्रशासनाने व्यापाऱ्यांची सोय व्हावी, यासाठी गांधी चौकात स्वतंत्र एलबीटी कार्यालय सुरू केले. कार्यालय सुरू झाल्यावर काही दिवस या ठिकाणी व्यावसायिकांची नोंदणी व करभरणा सुरू होता. व्यापारी महासंघाचा विरोध वाढला. राज्यस्तरावर एलबीटीचा निर्णय होत नसल्याने मनपाचे कर्मचारीही थंडावले. इकडे अर्थसंकल्पात शेकडो कोटी एलबीटी वसुलीची तरतूद करणाऱ्या मनपाची अवस्था केविलवाणी झाली आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याइतपतही उत्पन्न नसल्याने प्रशासन गांगारुन गेले होते. जानेवारी २०१३ पासून ते १५ नोव्हेंबर २०१४ पर्यंत जवळपास २२ कोटी रुपये एलबीटीच्या माध्यमातून मनपाला मिळाल्याची माहिती प्रशासनाने दिली. लातूर शहरातील देशी दारूची दुकाने, बिअरबार चालक हे संबंधित कंपन्यांकडून एलबीटी वजा करतात. ग्राहकांकडूनही बारमध्ये एलबीटीचा कर लावण्यात येतो. ग्राहकांच्या खिश्यातून घेण्यात येणारा हा कर मनपाकडे ते व्यावसायिक भरत नाहीत. पेट्रोलपंप, मोबाईल कंपन्या, गॅस कंपन्या यांच्यासह अन्य बोटावर मोजण्याइतक्या कंपन्याच एलबीटीचा भरणा करतात. त्यातून आजपर्यंत २२ कोटी मनपाला मिळाले आहेत. मासिक कर भरणाऱ्या व्यावसायिकांची संख्या केवळ शंभर ते दीडशेच्या जवळपास असल्याचे मनपाकडून सांगण्यात आले. गांधी चौकात सुरू करण्यात आलेले एलबीटीचे स्वतंत्र कार्यालय गेल्या काही महिन्यांपासून कुलूपबंद आहे. राज्य शासनाकडून कठोर भूमिका घेण्यात येत नसल्याने मनपानेही मवाळ भूमिका घेतली. त्यामुळे नोंदणीकृत व्यावसायिकांची वसुली रखडली. शिवाय, नवीन नोंदणीही करण्यात आली नाही. गाजावाजा करून सुरू झालेले कार्यालय आता सुरू झाल्याचा दावा मनपातील एका अधिकाऱ्याने केला आहे. निवडणूक काळात एलबीटी कार्यालय काही दिवस बंद होते. एलबीटी वसुली कायदेशीरपणे केली जाईल. कायद्याप्रमाणे काही व्यापाऱ्यांना आता नोटिसा काढण्यात आल्या आहेत. नोंदणीकृत व्यापाऱ्यांचा सॉफ्टवेअरमध्ये डाटा भरणा झाला आहे. सध्या तरी विभाग प्रमुख म्हणून ओमप्रकाश मुतंगे काम पाहत आहेत. सहाय्यक आयुक्त वसुधा फड यांच्याकडे हा विभाग असल्याचे मनपा आयुक्त सुधाकर तेलंग यांनी सांगितले. व्यापाऱ्यांना ंआता एलबीटी भरावीच लागेल, असे ते म्हणाले.नांदेड मनपात एलबीटी वसुली मोहीम राबविण्यात मोलाची भूमिका बजावलेल्या एका अधिकाऱ्याची लातूर मनपात बदली झाली. नवीन अधिकारी एलबीटीच्या अभ्यासू आहेत. याचा चांगला फायदा होईल म्हणून आयुक्तांनी त्यांच्याकडे एलबीटीची जबाबदारी कागदोपत्री सोपविली. मात्र अद्याप त्या अधिकाऱ्याला इथल्या एलबीटी विषयाची कसलीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे अभ्यासू अधिकारीही गप्पच आहेत.