शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

लातूरच्या पालकमंत्री पंकजा मुंडे ‘रस्ता चुकल्या’ !

By admin | Updated: April 6, 2016 00:21 IST

दत्ता थोरे , लातूर लातूर आणि बीड जिल्ह्यांच्या पालकमंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांचा पाकलमंत्र्यांचा पदभार घेतल्यापासून मोजून हा दहावा दौरा होता.

दत्ता थोरे , लातूरलातूर आणि बीड जिल्ह्यांच्या पालकमंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांचा पाकलमंत्र्यांचा पदभार घेतल्यापासून मोजून हा दहावा दौरा होता. त्यात महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या लातूर दौऱ्यात त्या सहभागी झाल्या खऱ्या, पण दौऱ्यातील ठिकाणांना भेटी देताना त्यांचा अचानक ‘रस्ता चुकला’. त्यांच्या या रस्ता चुकल्याची चर्चा चालू असताना एका भाजपच्याच कार्यकर्त्याने, ‘अहो त्या लातूरला आल्या, हेच मुळी रस्ता चुकून’ अशी बोलकी प्रतिक्रिया दिली. पंकजा मुंडे यांना लातूरच्या पालकमंत्री म्हणून जबाबदारी मिळाल्यानंतर खरेतर लातूरकरांमध्ये आनंदाचे भरते आले होते. कारण गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख या दोन्ही दिवंगत नेत्यांमध्ये असलेल्या मैत्रीच्या नात्याचा नेहमीच लातूरला फायदा झाला. तसा दुसऱ्या पिढीतील पंकजा मुंडे या लातूरवर तसेच प्रेम दाखवितील, अशा आशा होत्या. परंतु हा लातूरकरांचा विश्वास फोल ठरला. पालकमंत्री पद मिळाल्यापासून पंकजा मुंडे या केवळ दहा वेळाच लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या आहेत. त्यात एक प्रजासत्ताक दिन, एक हॉस्पिटल उद्घाटन, एक महाराष्ट्र दिन, एक पन्नगेश्वर कारखाना सर्वसाधारण सभा, आणि त्यानंतर तीन वेळा मुख्यमंत्री दौरे आणि एक वेळा महसूल मंत्र्यांसोबतच्या दौऱ्यात दौरे तर एक लग्नासाठीची उपस्थिती असे त्यांच्या दौऱ्याचे विवरण. त्यामुळे आजचा अचानक झालेला त्यांचा दौराही लातूरकरांसाठी चर्चेचा विषय ठरला होता. त्यात महसूलमंत्र्यांचा ताफा रेल्वे स्टेशनला पोहोचला तेव्हा त्यांचा ताफा चक्क हरंगुळच्या जलशुध्दीकरण केंद्राजवळ पोहोचला होता. तिथे थांबून त्या महसूलमंत्र्यांच्या ताफा येण्याची प्रतीक्षा करीत होत्या. तिथे त्यांना कळले की महसूलमंत्री रेल्वे स्थानकाकडे गेले आहेत तेव्हा त्यांनी आपला मोर्चाही तिकडेच वळविला. पुढे दोघांचा संयुक्त ताफा विमानतळाकडे वळला. तिथे पत्रकार परिषदेत त्यांनी शब्दही काढला नाही. विमानतळावर झालेल्या पत्रपरिषदेत पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी शब्दही काढला नाही़ पत्रकारांनी पाणीप्रश्नावर छेडले असता त्या म्हणाल्या की, पाणी संपल्यावर येण्यात काय अर्थ होता ? मी तर पाणी घेऊन आले आहे, असे उत्तर दिले. लातूर जिल्ह्यातील बहुतांश गावात टंचाईच्या झळा सुरू आहेत़