शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

उशिरा होणारे उड्डाण वेळेवर झाल्याने ३० प्रवाशांचे विमान हुकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 18:39 IST

एअर इंडियाच्या चुकीमुळे झाले प्रवाशांचे हाल

ठळक मुद्देदिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांचीही गैरसोय

औरंगाबाद : एअर इंडिया विमान कंपनीमार्फत स्वातंत्र्यदिनी मुंबई- औरंगाबाद- दिल्ली, असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची कंपनीच्या चुकीमुळे चांगलीच तारांबळ उडाली आणि या सर्व धावपळीत काहीही चूक नसताना निष्कारण मुंबईहून औरंगाबादला येणाऱ्या ३० प्रवाशांचे विमान हुकले.

दि.१५ आॅगस्ट रोजी उड्डाण करणारे एएल-४४२ हे मुंबई- औरंगाबाद- दिल्ली विमान नियोजित वेळेच्या तीन तास उशिरा औरंगाबादला येईल, असे मेलच्या साहाय्याने दि.१४ आॅगस्ट रोजी प्रवाशांना कळविण्यात आले होते. त्यानुसार विमानाचे उड्डाण मुंबई येथून दु. ३.२५ ऐवजी सायं. ६.३० ला होणार होते. त्यामुळे विमानाला उशीर असल्यामुळे प्रवासी बदललेल्या वेळेनुसार मुंबई विमानतळावर आले आणि विमान चक्क नियोजित वेळेवर येऊन त्याचे औरंगाबादकडे उड्डाणही झाले असल्याची माहिती प्रवाशांना मिळाली. यामुळे काहीही चूक नसताना विमान हुकल्यामुळे प्रवाशांना मात्र ऐनवेळी प्रचंड मनस्तापाला तोंड द्यावे लागले.

कामानिमित्त मुंबई- औरंगाबाद असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी अगोदरच त्यांच्या मुंबई- औरंगाबाद प्रवासाचे तिकीट आरक्षित करून ठेवलेले होते; पण ऐनवेळी नियोजनाच्या अभावामुळे झालेला गोंधळ प्रवाशांचा तणाव वाढविणारा आणि ऐनवेळी त्यांना धावपळ करायला लावणारा ठरला.उद्योजक रवी माछर याविषयी सांगताना म्हणाले की, त्यांना एअर इंडिया कंपनीचा विमानाच्या उड्डाणाला उशीर होण्याविषयी माहिती देणारा मेल दि.१४ आॅगस्ट रोजी मिळाला. त्यामुळे ते उद्योजक मधुसूदन अग्रवाल यांच्यासह  बदललेल्या वेळेनुसार मुंबई विमानतळावर पोहोचले असता त्यांना औरंगाबादला जाणारे विमान नियोजित वेळेवर म्हणजेच दु. ३.३० वा. औरंगाबादसाठी रवाना झाल्याचे समजले. अग्रवाल हे रक्षाबंधनासाठी मुंबईहून औरंगाबादला येत होते. औरंगाबादचे काम आटोपून त्यांना त्याचदिवशी सायंकाळी दिल्लीला रवाना व्हायचे होते. मात्र, त्यांचे विमान हुकल्यावर ते चार्टर्ड प्लेनने औरंगाबादला आले आणि माछर हे अग्रवाल यांच्यासह याच विमानात औरंगाबादला आले. कंपनीच्या गलथान कारभारामुळे तब्बल ३० प्रवाशांचे विमान हुकले असल्याची बाब मुंबई विमानतळावर निदर्शनास आल्याचेही माछर यांनी सांगितले.

उद्योजक नंदकुमार कागलीवाल यांनाही या प्रसंगाला सामोरे जावे लागले. या अनुभवाविषयी सांगताना ते म्हणाले की, आम्हाला मेलवरून सूचना आल्यानुसार आम्ही उशिरा विमानतळावर पोहोचलो; पण विमान आगोदरच्याच वेळेला रवाना झालेले होते. या सर्व गोष्टीमुळे मला मुंबई ते शिर्डी असा प्रवास निरर्थक करावा लागला आणि शिर्डीहून मग मी औरंगाबादला आलो. असे केले नसते, तर एकच विमान असल्यामुळे मला दुसऱ्या दिवशीच्या विमानापर्यंत मुंबईला वाट पाहत विनाकारण ताटकळत बसावे लागले असते. 

गलथानपणाआधीच तोट्यात असलेल्या एअर इंडिया कंपनीला गलथान कारभारामुळे वेळोवेळी प्रवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. याविषयी एअर इंडियाच्या मुंबई आणि औरंगाबाद येथील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.

दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांचीही गैरसोयप्रवाशांच्या पुढील सर्वच प्रवासाचे नियोजन या प्रकारामुळे विस्कळीत झाले. या घटनेमुळे औरंगाबाद येथून दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांचीही चांगलीच गैरसोय झाली. 

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाAurangabadऔरंगाबादAurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ