शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

‘समांतर’च्या कंपनीला शेवटचे निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 23:46 IST

समांतर जलवाहिनीचे काम करण्यासाठी महापालिका प्रशासन कंपनीला शेवटचे निमंत्रण देणार आहे. ५ जानेवारी रोजी यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून कंपनी महापालिकेच्या कोणत्याच निमंत्रणाला प्रतिसाद द्यायला तयार नाही.

ठळक मुद्दे५ जानेवारीला बैठक : कंपनी अटींवर ठाम

औरंगाबाद : समांतर जलवाहिनीचे काम करण्यासाठी महापालिका प्रशासन कंपनीला शेवटचे निमंत्रण देणार आहे. ५ जानेवारी रोजी यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून कंपनी महापालिकेच्या कोणत्याच निमंत्रणाला प्रतिसाद द्यायला तयार नाही. कंपनीतील मुख्य भागीदार बदलण्याची मुभा द्यावी या अटीवर कंपनी ठाम आहे. महापालिका ही अट कदापिही बदलू शकत नाही. त्यामुळे शेवटचा प्रयत्न मनपाकडून करण्यात येत आहे.महापौर नंदकुमार घोडेले यांनी बैठकीसाठी पुढाकार घेतला आहे. यापूर्वी दोनदा कंपनीसोबत बैठक झाली आहे. प्रत्येक बैठकीत कंपनीने भागीदार बदलण्याची मुभा द्या, महापालिकेने मालमत्ता गहाण ठेवून कर्ज घेण्याची मुभा द्यावी, जुनी थकबाकी ५० कोटी द्यावी आदी अटी टाकल्या आहेत. या गंभीर पेचात महापालिकेने राज्य शासनाच्या तीन वेगवेगळ्या विभागांकडे अभिप्राय मागविले. आजपर्यंत मनपाला उत्तर मिळाले नाही. समांतर जलवाहिनीचे पैसे मनपाकडे पडून आहेत. तरीही काहीच करू शकत नाही, अशी अवस्था निर्माण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे. त्याचा अंतिम न्याय निवाडाही होत नाही. कंपनी पुन्हा कामही करायला तयार नाही. जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत मुख्य जलवाहिनी टाकण्यासाठी स्वंतत्र निविदाही मनपा काढू शकत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार मनपाला सूचित केले होते की, कंपनीसोबत बसून अंतिम निर्णय घ्या. मनपाने आतापर्यंत चार ते पाच वेळेस प्रयत्न केले. कंपनी मनपाला सकारात्मक प्रतिसाद देण्यास तयार नाही. आता ५ जानेवारी रोजी कंपनी बैठकीला उपस्थित राहील किंवा नाही, यावर साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाwater scarcityपाणी टंचाई