शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

‘समांतर’च्या कंपनीला शेवटचे निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 23:46 IST

समांतर जलवाहिनीचे काम करण्यासाठी महापालिका प्रशासन कंपनीला शेवटचे निमंत्रण देणार आहे. ५ जानेवारी रोजी यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून कंपनी महापालिकेच्या कोणत्याच निमंत्रणाला प्रतिसाद द्यायला तयार नाही.

ठळक मुद्दे५ जानेवारीला बैठक : कंपनी अटींवर ठाम

औरंगाबाद : समांतर जलवाहिनीचे काम करण्यासाठी महापालिका प्रशासन कंपनीला शेवटचे निमंत्रण देणार आहे. ५ जानेवारी रोजी यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून कंपनी महापालिकेच्या कोणत्याच निमंत्रणाला प्रतिसाद द्यायला तयार नाही. कंपनीतील मुख्य भागीदार बदलण्याची मुभा द्यावी या अटीवर कंपनी ठाम आहे. महापालिका ही अट कदापिही बदलू शकत नाही. त्यामुळे शेवटचा प्रयत्न मनपाकडून करण्यात येत आहे.महापौर नंदकुमार घोडेले यांनी बैठकीसाठी पुढाकार घेतला आहे. यापूर्वी दोनदा कंपनीसोबत बैठक झाली आहे. प्रत्येक बैठकीत कंपनीने भागीदार बदलण्याची मुभा द्या, महापालिकेने मालमत्ता गहाण ठेवून कर्ज घेण्याची मुभा द्यावी, जुनी थकबाकी ५० कोटी द्यावी आदी अटी टाकल्या आहेत. या गंभीर पेचात महापालिकेने राज्य शासनाच्या तीन वेगवेगळ्या विभागांकडे अभिप्राय मागविले. आजपर्यंत मनपाला उत्तर मिळाले नाही. समांतर जलवाहिनीचे पैसे मनपाकडे पडून आहेत. तरीही काहीच करू शकत नाही, अशी अवस्था निर्माण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे. त्याचा अंतिम न्याय निवाडाही होत नाही. कंपनी पुन्हा कामही करायला तयार नाही. जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत मुख्य जलवाहिनी टाकण्यासाठी स्वंतत्र निविदाही मनपा काढू शकत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार मनपाला सूचित केले होते की, कंपनीसोबत बसून अंतिम निर्णय घ्या. मनपाने आतापर्यंत चार ते पाच वेळेस प्रयत्न केले. कंपनी मनपाला सकारात्मक प्रतिसाद देण्यास तयार नाही. आता ५ जानेवारी रोजी कंपनी बैठकीला उपस्थित राहील किंवा नाही, यावर साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाwater scarcityपाणी टंचाई