शहरं
Join us  
Trending Stories
1
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
2
पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज...
3
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
4
Mumbai Crime: हाताच्या नसा कापल्या गेल्या अन्... पोलिसाच्या मृत्युचे कोडे उलगडले; पत्नी, मुलाला अटक
5
३.७ कोटी देऊन बॉयफ्रेंडच्या पत्नीसोबत केली तडजोड, पण नंतर घडलं असं काही, पैसेही गेले आणि... 
6
Gold Silver Price 24 September: नवरात्रीत सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण, आता खरेदी करावं की आणखी स्वस्त होण्याची वाट पाहावी?
7
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
8
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
9
कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
10
भलीमोठी स्क्रीन, अल्ट्रा एचडी डिस्प्ले; सोनी कंपनीच्या टीव्हीवर थेट ५० हजारांची सूट!
11
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: ५ मिनिटांत होणारे गणेश स्तोत्र म्हणा, शाश्वत कृपा-लाभ मिळवा!
12
IND vs BAN: अर्शदीप सिंगला आज संधी मिळणार? कोणाचा पत्ता कट होणार? अशी असू शकते Playing XI
13
Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे...
14
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: व्रत पूजन कसे कराल? पाहा, सोपी पद्धत, शुभ मुहूर्त अन् मान्यता
15
Asia Cup 2025: तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी
16
३ दिवस धन-महालक्ष्मी योग: ९ राशींना नवरात्र लकी, अपूर्व लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, वैभव-भरभराट!
17
GPS लोकेशनमुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते का? नेमकं कारण तरी काय? जाणून घ्या
18
मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?
19
'कोल्हापूरकरांनो आता आपली जबाबदारी...'; मराठवाड्यातील मदतीसाठी सतेज पाटलांचे आवाहन

दहा वर्षांपासून शेतरस्ता मिळेना

By admin | Updated: July 24, 2014 00:24 IST

दैठणा : परभणी तालुक्यातील आंबेटाकळी येथील दोन शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी तब्बल दहा वर्षांपासून रस्ताच मिळत नाही.

दैठणा : परभणी तालुक्यातील आंबेटाकळी येथील दोन शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी तब्बल दहा वर्षांपासून रस्ताच मिळत नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना शेतामध्ये जाता येत नसल्यामुळे कुटुंंंबावर उपासमारीची वेळ आली आहे. आंबेटाकळी येथील अशोक मधुकर बेले व बालासाहेब मधुकर बेले या दोन शेतकऱ्यांचा २००५ पासून शेतातील रस्ता बंद करण्यात आला होता. परभणीचे तहसीलदार यांच्याकडे या शेतकऱ्यांनी लेखी तक्रार केल्यानंतर गट क्रमांक ५२ व ५३ या सामूहिक धुऱ्यावरून रस्ता देण्याचा आदेश तहसीलदारांनी दिले होते. मात्र माणिक विठ्ठल बेले, मारोतराव पुरभाजी बल्लाळ यांनी या रस्त्यावरून जाण्याची मनाई केली. औरंगाबाद आयुक्तालय यांना तक्रार करण्यात आली. या तक्रारीची चौकशी करून आयुक्तालयाने तहसीलदारांना कोर्ट अ‍ॅक्ट कलम ०५ प्रमाणे गट क्रमांक ५२ व ६१ या सामायिक रस्त्याने रस्ता देण्यात यावा, असा आदेश देण्यात आला. मात्र या आदेशाची अंमलबजावणी अद्यापही झाली नाही. याबाबत दैठणा पोलिस ठाण्यात लेखी तक्रार करण्यात आली, परंतु या तक्रारीली केराची टोपली दाखविण्यात आली आहे. त्यामुळे दहा वर्षे उलटूनही या दोन शेतकऱ्यांना शेतातून जाण्यासाठी रस्ता मिळाला नाही. याचे सोयरसूतक तहसीलदार व पोलिस प्रशासनाला नसल्याचे दिसून येत आहे. अशोक मधुकर बेले यांची पाच एकर तर बालासाहेब बेले यांची ६ एकर जमीन शेतात जाता येत नसल्यामुळे पडीक राहिली आहे. त्यामुळे या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. जिल्हाधिकारी एस.पी. सिंह यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)शेतरस्त्यावरून होत आहेत भांडणे जिल्ह्यात दरवर्षी शेत रस्त्यावरून अनेकांची भांडणे होत आहेत. शासन स्तरावरून शेत जमिनीची मोजणी स्वातंत्र्यानंतर एकदाच झाली आहे. त्यामुळे शेतरस्ते अंदाजे काढण्यात आली आहेत. परंतु आता शेतीचे क्षेत्र कमी झाल्याने काही शेतकरी शेतरस्ते देण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये कसे जावे? असा गहण प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच शेतासाठी जाणाऱ्या शिवरस्त्यावर शेतकऱ्यांनी अतिक्रमणे केली आहेत. याकडे तहसीलदारांचे दुर्लक्ष होत आहे.