शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

मराठवाड्यात मिश्र खतांमध्ये भेसळ करणारे मोठे रॅकेट कार्यरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 19:12 IST

शेती, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

ठळक मुद्देविभागीय प्रशासनाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश जालना, नांदेड व औरंगाबाद जिल्ह्यांत बोगस खतविक्री प्रकरणात कारवाया करण्यात आल्या.

औरंगाबाद : मराठवाड्यात मिश्र खतांमध्ये भेसळ करून शेती आणि शेतकऱ्यांचे नुकसान करणारे मोठे रॅकेट कार्यरत आहे. त्यास प्रतिबंध करून कारवाई करण्यासाठी आता जिल्हा प्रशासनालाही सहभागी करून घेण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी जालन्यात सुमारे १ कोटी रुपयांचा बोगस खतांचा अवैध साठा पकडण्यात आला. या कारवाईमुळे अनेक खतांच्या कंपन्यांना कुलूप लागले असून, मालक मराठवाडा सोडून पसार झाले आहेत. खतांचा अवैध साठा, तसेच बनावट खत उत्पादन व विक्रीत मोठ्या महाभागांचा सहभाग आहे. विभागीय प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांना संबंधित खत कंपनीमालकांवरच थेट गुन्हे दाखल करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

बोगस खत प्रकरणात अहवाल आल्यानंतर एकेकावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. खतांमध्ये राख मिसळली जात आहे. लॅबमध्ये नमुने तपासणीसाठी पाठविले, तर लॅबही मॅनेज करण्याचा प्रकार केला जात आहे. नांदेडमध्ये खत उत्पादक कंपनीचे मालक हे राजकारणाशी निगडित आहेत. त्यामुळे गुन्हे दाखल होण्यातच अडथळे येत आहेत. खतांच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असून, यामध्ये शेती आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. प्रशासनाने आजवर १५ ते १७ कंपन्या बंद केल्या असून, सदरील खत उत्पादक पळून गेले आहेत.

जालना, नांदेड व औरंगाबाद जिल्ह्यांत बोगस खतविक्री प्रकरणात कारवाया करण्यात आल्या. औरंगाबाद जिल्ह्यात गंगापूरपाठोपाठ फुलंब्री, कन्नड आणि शेंद्रा येथे कारवाई करण्यात आली. गुजरात येथून माल भरून आणल्यानंतर स्थानिक पातळीवर प्लास्टिक बकेटमध्ये रॅपरिंग करून खतविक्री करण्याचा धंदा चव्हाट्यावर आला. खतांच्या बॅगांवर खतातील मूळ व खऱ्या घटकांचा उल्लेखही केला जात नाही. अन्नद्रव्यांचा वाटेल तितक्या प्रमाणात उल्लेख करून शेतकऱ्यांना तो माल विक्री केला जात होता. सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी बारकाईने लक्ष घालून कारवाईचे आदेश विभागीय प्रशासनाने दिले आहेत.  

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रMarathwadaमराठवाडाDivisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालय