शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
5
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
6
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
7
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
8
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
9
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
10
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
11
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
12
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
13
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
14
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
15
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
16
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
17
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
18
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
19
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
20
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषणातूनच समृद्ध होईल उद्याची भाषा...!

By admin | Updated: February 3, 2015 01:00 IST

वैविध्यपूर्ण भारतातील नामशेष होऊ पाहणाऱ्या जवळपास सातशे भाषांच्या सर्वेक्षणाचे बहुमोल काम भाषाभ्यासक-संशोधक डॉ. गणेश देवी यांनी पूर्णत्वाला नेले आहे.

वैविध्यपूर्ण भारतातील नामशेष होऊ पाहणाऱ्या जवळपास सातशे भाषांच्या सर्वेक्षणाचे बहुमोल काम भाषाभ्यासक-संशोधक डॉ. गणेश देवी यांनी पूर्णत्वाला नेले आहे. बोलींच्या अक्षरधनासह लोकसंस्कृतीचा भव्य पटच त्यातून उलगडला आहे. आजवर बहुतांशी दुर्लक्षित असलेल्या या क्षेत्रासह आदिवासी विकास, पुरातत्व संशोधन यातही महत्त्वाचे योगदान देणाऱ्या डॉ. देवी यांच्याशी ‘लोकमत’ ने साधलेला संवाद...नव्या पिढीत सोशल मीडियामधून रूढ होऊ पाहणाऱ्या लघुरुपांमुळे मराठी कलुषित होते आहे का?मला असे वाटत नाही. यातून भाषा बिघडणार नाही तर ती समृद्ध होईल. जी भाषा अधिकाधिक प्रदूषित होते तेवढा तिचा पैस वाढतो, ती सुदृढ होते. भाषा ही सांस्कृतिक संस्था आहे. त्यामुळे तिच्या शुद्धाशुद्धतेची चिंता बाळगण्याचे काही कारण नाही. दलित साहित्य सुरुवातीला समोर आले, तेव्हा त्या लेखनाची भाषा मराठीला हानी पोहोचवेल अशी वक्तव्ये केली गेली. मात्र, असे न होता या साहित्याने मराठीला अधिक संपन्न केले. आदिवासी जनसमूहांसोबत तुम्ही बरेच मोठे काम केले आहे. आदिवासी अकादमीद्वारे त्यांच्यातील प्रतिभा शोधत तुम्ही ती जगासमोर आणली. याबाबत काही सांगा....आदिवासींसाठी माझ्या मनात करुणा नाही, तर आदर आहे. आदिवासींबाबत मी नेहमी म्हणतो,‘दे नो दॅट दे बिलाँग टू द अर्थ; अँड नॉट द अर्थ बिलाँग्ज टू देम!’ आपल्यासारखे त्यांचे देव मानवनिर्मित नाहीत. निसर्गाला, पृथ्वीला ते देव मानतात. त्यामुळे जे काही काम त्यांच्यासाठी झाले आहे, ते त्यांनीच केले. मी केवळ साक्षीभावाने त्यांच्यासोबत होतो. तेच या प्रक्रियेत मला शिकवतात. त्यातून आदिवासी महिलांचे बचत गट, आरोग्य विमा, धान्य बँका, पाटबंधारे, अशी कामे उभी राहिली. बाराशे गावांतील लोक स्वयंपूर्ण झाले. त्यातूनच भटके फोटोग्राफर ही कल्पना आकाराला येते आहे. कारण छायाचित्रकार हा भटक्या असतोच. त्यातच मुळात भटक्या असणाऱ्या या लोकांच्या हाती कॅमेरा दिला तर काय होईल? त्यांच्या नजरेतूनच त्यांचे विलक्षण जग अनुभवता येईल ना!आज इंग्रजीच्या तडाख्यामुळे अनेक भाषा लोप पावत आहेत का? मग मराठी, कोकणी अशा प्रादेशिक भाषांचे भवितव्य काय? इंग्रजी ही ‘लँग्वेज किलर’आहे. आॅस्टे्रलिया, न्यूझीलंड अशा अनेक देशांतील प्रादेशिक भाषा इंग्रजीच्या अतिक्रमणामुळे नष्ट झाल्या आहेत. मात्र, आपल्या देशात असे झाले नाही. कारण भारतीय माणूस हा जन्मत:च सांस्कृतिक व ऐतिहासिकदृष्ट्या बहुभाषिक आहे. दुसरे असे की, आपल्या अनुवादविषयक संवेदना जागृत आहेत. ज्ञानेश्वरी, तुळसीरामायण हे अनुवादच आहेत. आपण ते वर्षानुवर्षे परंपरेतून जपले आहेत. त्यामुळे भारतात तरी प्रादेशिक भाषांना धोका कमीच आहे. आपण स्वत: मराठीला अभिजात दर्जा मिळण्यासाठी स्थापन केलेल्या समितीवर आहात. हा दर्जा मिळण्याबाबत आपली भूमिका काय आहे?मराठी ही जोडणारी, प्राचीन भाषा आहे. मराठीला अभिजात दर्जा मिळावा असा माझा आग्रह असून, केंद्र सरकारने तो दिला तर तो निश्चित नवनिर्मितीसाठी पोषक असेल. हा दर्जा देण्याची प्रक्रिया प्रत्येक भाषेसाठी वेगवेगळी आहे. महाराष्ट्र राज्य भाषेबाबत सहिष्णु आहे. इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक जिवंत बोलीभाषा महाराष्ट्रात आहेत. त्यांची एकूण संख्या ५२ आहे. बोलीभाषा लुप्त होण्याचे प्रमाण मात्र, गुजरातमध्ये महाराष्ट्राहून अधिक आहे. केवळ मराठीची नव्हे तर या इतरही भाषांची आग्रही जोपासना व्हायला हवी. ४भाषा या अमर असतात. आज भाषाप्रेमींना व संस्कृती रक्षकांना अशी भीती वाटते की, नव्या सांस्कृतिक अतिक्रमणामुळे आपल्या भाषा नष्ट होत आहेत. पण टीव्ही व इंटरनेटच्या युगाचा आपल्या भाषांवर काहीच परिणाम होणार नाही.