शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

‘लाल परी’ देणार आता खेड्यांतही ‘गारेगार’ प्रवास; दीड महिन्यात ग्रामीणमध्ये एसी बस धावणार

By संतोष हिरेमठ | Updated: March 29, 2023 16:47 IST

ग्रामीण भागात एसी बससेवा देणारे महाराष्ट्र ठरेल पहिले राज्य

छत्रपती संभाजीनगर : ‘लाल परी’ म्हणजे एसटी बस आता खेड्यापाड्यांतही ‘गारेगार’ प्रवास घडविणार आहे. साधारण वर्षभरानंतर टप्प्याटप्प्यांत पाच हजार इलेक्ट्रिक बस दाखल होतील. आगामी महिनाभरात दीडशे इलेक्ट्रिक बस येतील. या इलेक्ट्रिक बस वातानुकूलित असतील. ई-बस ग्रामीण भागातही धावतील. त्यामुळे ग्रामीण भागात एसी बससेवा देणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरेल, असे एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने म्हणाले.

एसटी महामंडळाची मंगळवारी शहरात आढावा बैठक पार पडली. यावेळी चन्ने पत्रकारांशी बोलताना म्हणाले, कर्मचाऱ्यांच्या संपाच्या कालावधीत बस जागेवर उभ्या राहिल्या, तेव्हा इंजिन, टायरसंदर्भात समस्या होत्या; परंतु त्यात दुरुस्ती करण्यात आली. ७०० नव्या डिझेल बसची ऑर्डर देण्यात आली. आणखी २ हजार डिझेल बस घेण्यात येतील. बैठकीस विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर, विभागीय वाहतूक अधिकारी अमोल अहिरे, चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेचे व्यवस्थापक प्रमोद जगताप यांच्यासह विविध जिल्ह्यांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

१५० मधील २० बस पुणे मार्गावर आगामी महिनाभरात दाखल होणाऱ्या १५० इलेक्ट्रिक बसमध्ये छत्रपती संभाजीनगर विभागाला २० बस मिळतील. या बस छत्रपती संभाजीनगर- पुणे मार्गावर चालविण्यात येतील. पुणे, मुंबईसाठी शंभर बस दिल्या जातील, तर ५ हजार ई-बसमध्ये छत्रपती संभाजीनगरला १०६ बस मिळतील, असे चन्ने म्हणाले.

बॅटरीला आग लागण्याच्या घटनांमुळे खबरदारी१५० ई-बस यापूर्वीच दाखल होणार होत्या; परंतु मध्यंतरी ई-दुचाकींच्या बॅटरीला आग लागण्याच्या घटना घडल्या. त्या पार्श्वभूमीवर ई-बसच्या बॅटरीची तपासणी काटेकोरपणे केली गेली. त्यामुळे या बस रस्त्यावर येण्यास उशीर झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

महिला प्रवासी संख्येत ३० टक्के वाढराज्यात महिलांना प्रवासात ५० टक्के सवलत देण्यास सुरुवात झाली. त्यानंतर जवळपास ३० टक्क्यांनी महिला प्रवाशांच्या संख्येत वाढ झाल्याचे चन्ने यांनी सांगितले.

बस नाही म्हणून शाळा ‘बुडू’ नयेबससेवा नाही, म्हणून विद्यार्थी शाळेत जाणार नाही, असे कुठेही होणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे. त्यासाठी शालेय बस वाहतुकीवरही लक्ष केंद्रित केल्याचे चन्ने म्हणाले.

टॅग्स :state transportएसटीAurangabadऔरंगाबाद