शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नव्या वाहनांच्या पासिंगसाठी होणारे ‘लक्ष्मी दर्शन’ अखेर बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:02 IST

संतोष हिरेमठ औरंगाबाद : ‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा’ म्हणणाऱ्या सरकारच्या राज्यात आरटीओ कार्यालयात मात्र ‘बहोत खाऊंगा, खाने दुंगा’चा ...

संतोष हिरेमठ

औरंगाबाद : ‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा’ म्हणणाऱ्या सरकारच्या राज्यात आरटीओ कार्यालयात मात्र ‘बहोत खाऊंगा, खाने दुंगा’चा कारभार सुरू होता. विशेषत: नव्याने नोंदणी होणाऱ्या प्रत्येक दुचाकी वाहनाच्या नोंदणीसाठी वितरकांना ३६० रुपये द्यावे लागत होते. एजंटच्या माध्यमातून महिन्याकाठी लाखो रुपयांचे ‘लक्ष्मी दर्शन’ यंत्रणेला होत होते. परंतु, आता नवीन वाहनांची वितरकाच्या स्तरावरच नोंदणी सुरू झाली आहे. परिणामी, नव्या वाहनांच्या पासिंगसाठी होणारे ‘लक्ष्मी दर्शन’ अखेर बंद झाले आहे.

औरंगाबाद आरटीओ कार्यालयाचे ऑक्टोबर २०१६ मध्ये संपूर्ण संगणीकरण झाले. राज्यातील पहिले संपूर्ण ऑनलाईन आरटीओ कार्यालय म्हणून या कार्यालयाची ओळख निर्माण झाली. नागरिकांची एजंटांकडून सुटका व्हावी, वाहनधारकांना घरबसल्या सुविधा व्हावी, कामाची गती वाढावी, अशी अपेक्षा होती; पण या सगळ्यात अनेक कामे ऑनलाईन प्रणालीबाहेरच सुरू राहिली.

नव्या वाहनांच्या नोंदणी प्रक्रियेत दुचाकीच्या प्रत्येक फाईलसाठी ३६० रुपये, तर चारचाकीच्या प्रत्येक फाईलसाठी एक हजार रुपये द्यावे लागत होते. यासंदर्भात काही वाहन वितरकांनी ‘लोकमत’कडे कैफियत मांडली. तेव्हा सप्टेंबर २०१८ मध्ये ‘लोकमत’ने यासंदर्भात वृत्त मालिका प्रकाशित करून पाठपुरावा केला. या सगळ्याची गंभीर दखल घेऊन परिवहन विभागाने हा प्रकार थांबविण्यासाठी पाऊल उचलले आणि अखेर आता थेट डीलर्सच्या माध्यमातून नव्या वाहनांची नोंदणी सुरू झाली आहे. ग्राहकांना तत्काळ वाहन नंबर मिळत आहे. वाहन नोंदणी, नंबर लवकर मिळण्यासाठी कोणतीही तडजोड करण्याची गरज राहिली नाही. त्यामुळे वाहन वितरकांतून समाधान व्यक्त होत आहे.

पूर्वीची वाहन नोंदणीची पद्धत

वाहनाच्या विक्रीनंतर वाहनवितरक आरटीओ कार्यालयाच्या पोर्टलवर नोंदणी करीत असे. यासाठी प्रत्येक डीलरला युजर आयडी, पासवर्ड दिलेला होता. ही नोंदणी झाल्यानंतर वाहन निरीक्षक प्रत्येक शोरूममध्ये वाहनांची तपासणी करीत असे. त्यानंतर वाहनांच्या फाईल आरटीओ कार्यालयात जात होत्या. फाईल मंजूर झाल्यानंतर ऑनलाईन टॅक्स भरल्यानंतर वाहनाला क्रमांक दिला जात होता.

आता अशी होते वाहन नोंदणी

राज्यात १४ जूनपासून वाहनांची नोंदणी डीलर्सकडूनच होत आहे. त्यामुळे आरटीओ कार्यालयाला वाहन अथवा कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता उरली नाही. शिवाय शोरूममध्ये वाहन निरीक्षकही वाहन पाहण्यासाठी येत नाही. नोंदणी आणि पासिंगची संपूर्ण व्यवस्था वाहन वितरकांकडेच आहे. वाहन वितरकांनी कर व शुल्क भरल्याक्षणी वाहन क्रमांक जारी होत आहे.