शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
3
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
4
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
5
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
6
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
7
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
8
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
9
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
10
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
11
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
12
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
13
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
14
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
15
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
16
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
17
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
18
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
19
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
20
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष

नव्या वाहनांच्या पासिंगसाठी होणारे ‘लक्ष्मी दर्शन’ अखेर बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:02 IST

संतोष हिरेमठ औरंगाबाद : ‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा’ म्हणणाऱ्या सरकारच्या राज्यात आरटीओ कार्यालयात मात्र ‘बहोत खाऊंगा, खाने दुंगा’चा ...

संतोष हिरेमठ

औरंगाबाद : ‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा’ म्हणणाऱ्या सरकारच्या राज्यात आरटीओ कार्यालयात मात्र ‘बहोत खाऊंगा, खाने दुंगा’चा कारभार सुरू होता. विशेषत: नव्याने नोंदणी होणाऱ्या प्रत्येक दुचाकी वाहनाच्या नोंदणीसाठी वितरकांना ३६० रुपये द्यावे लागत होते. एजंटच्या माध्यमातून महिन्याकाठी लाखो रुपयांचे ‘लक्ष्मी दर्शन’ यंत्रणेला होत होते. परंतु, आता नवीन वाहनांची वितरकाच्या स्तरावरच नोंदणी सुरू झाली आहे. परिणामी, नव्या वाहनांच्या पासिंगसाठी होणारे ‘लक्ष्मी दर्शन’ अखेर बंद झाले आहे.

औरंगाबाद आरटीओ कार्यालयाचे ऑक्टोबर २०१६ मध्ये संपूर्ण संगणीकरण झाले. राज्यातील पहिले संपूर्ण ऑनलाईन आरटीओ कार्यालय म्हणून या कार्यालयाची ओळख निर्माण झाली. नागरिकांची एजंटांकडून सुटका व्हावी, वाहनधारकांना घरबसल्या सुविधा व्हावी, कामाची गती वाढावी, अशी अपेक्षा होती; पण या सगळ्यात अनेक कामे ऑनलाईन प्रणालीबाहेरच सुरू राहिली.

नव्या वाहनांच्या नोंदणी प्रक्रियेत दुचाकीच्या प्रत्येक फाईलसाठी ३६० रुपये, तर चारचाकीच्या प्रत्येक फाईलसाठी एक हजार रुपये द्यावे लागत होते. यासंदर्भात काही वाहन वितरकांनी ‘लोकमत’कडे कैफियत मांडली. तेव्हा सप्टेंबर २०१८ मध्ये ‘लोकमत’ने यासंदर्भात वृत्त मालिका प्रकाशित करून पाठपुरावा केला. या सगळ्याची गंभीर दखल घेऊन परिवहन विभागाने हा प्रकार थांबविण्यासाठी पाऊल उचलले आणि अखेर आता थेट डीलर्सच्या माध्यमातून नव्या वाहनांची नोंदणी सुरू झाली आहे. ग्राहकांना तत्काळ वाहन नंबर मिळत आहे. वाहन नोंदणी, नंबर लवकर मिळण्यासाठी कोणतीही तडजोड करण्याची गरज राहिली नाही. त्यामुळे वाहन वितरकांतून समाधान व्यक्त होत आहे.

पूर्वीची वाहन नोंदणीची पद्धत

वाहनाच्या विक्रीनंतर वाहनवितरक आरटीओ कार्यालयाच्या पोर्टलवर नोंदणी करीत असे. यासाठी प्रत्येक डीलरला युजर आयडी, पासवर्ड दिलेला होता. ही नोंदणी झाल्यानंतर वाहन निरीक्षक प्रत्येक शोरूममध्ये वाहनांची तपासणी करीत असे. त्यानंतर वाहनांच्या फाईल आरटीओ कार्यालयात जात होत्या. फाईल मंजूर झाल्यानंतर ऑनलाईन टॅक्स भरल्यानंतर वाहनाला क्रमांक दिला जात होता.

आता अशी होते वाहन नोंदणी

राज्यात १४ जूनपासून वाहनांची नोंदणी डीलर्सकडूनच होत आहे. त्यामुळे आरटीओ कार्यालयाला वाहन अथवा कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता उरली नाही. शिवाय शोरूममध्ये वाहन निरीक्षकही वाहन पाहण्यासाठी येत नाही. नोंदणी आणि पासिंगची संपूर्ण व्यवस्था वाहन वितरकांकडेच आहे. वाहन वितरकांनी कर व शुल्क भरल्याक्षणी वाहन क्रमांक जारी होत आहे.