शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
2
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
3
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
4
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
5
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
6
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
7
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
8
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
9
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
10
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
11
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
12
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
13
कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
14
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."
15
मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल
16
चिकनच्या किमतीपेक्षा अंडी झाली महाग, भाज्यांचे दरही गगनाला; बांगलादेशात सगळाच गोंधळ
17
'दृश्यम'पद्धतीने हत्या! प्रेयसीच्या भावाचा मृतदेह पुरला; प्लॅनमध्ये पडला 'मिठा'चा खडा आणि...
18
Mumbai Local: मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’ मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेमार्गावर वाहतुकीत बदल
19
भारताला तुझा अभिमान आहे... पंतप्रधान मोदींनी केलं नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरीचं कौतुक
20
Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल

दीड लाखावर शेतकऱ्यांना कर्जमाफी...!

By admin | Updated: June 26, 2017 00:39 IST

जालना :जिल्ह्यातील १ लाख ५३ हजार ९५७ शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय राज्यसरकाने घेतला आहे. जिल्ह्यातील १ लाख ५३ हजार ९५७ शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार आहे. राज्यभरातील शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक संपापुढे नमते घेत राज्य सरकारने सुरुवातीला अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय जाहीर केला. मात्र, यास सर्वस्तरातून विरोध सुरू झाल्याने सरकारने एक पाऊल मागे घेतले. खरिपासाठी तातडीची मदत म्हणून पीककर्जाचे थकबाकीदार असणाऱ्या शेतकऱ्यांना दहा हजार रुपयांची अग्रीम रक्कम देण्याचा आदेश काढण्यात आला. या आदेशातील निकषांच्या अमलबजावणीबाबत बँक अधिकाऱ्यांमध्येच संभ्रम निर्माण झाल्याने जिल्ह्यातील एकाही शेतकऱ्याला अद्याप ही मदत मिळाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, आता शासनाने सरसकट दीड लाखांपर्यंतचे पीककर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाबाबत शेतकऱ्यांमध्ये कही खुशी कही गम असे वातावरण आहे. जिल्ह्यातील थकित कर्जाचा आकडा दोन हजार कोटी रुपयांपर्यत आहे. एक लाखापर्यंतचे कर्ज असणाऱ्या कर्जदारांची संख्या एक लाख ३८ हजार आहे. तसेच मध्यम मुदतीच्या (पुनर्गठन) कर्जदारांची संख्या पंधरा हजार ९५७ आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात एक लाख व त्यापेक्षा जास्त पीककर्ज व मध्यम मुदतीचे कर्ज असलेल्या कर्जदार शेतकऱ्यांची संख्या एक लाख ९६ हजार आहे. या कर्जदारांपैकी निकषानुसार पात्र ठरणाऱ्या कर्जदारांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी आगामी काळात बँक अधिकाऱ्यांना कसरत करावी लागणार आहे. त्याचबरोबर या वर्षी एक हजार ४११ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्टही बँकांना पूर्ण करावे लागणार आहे.