शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

दीड लाखावर शेतकऱ्यांना कर्जमाफी...!

By admin | Updated: June 26, 2017 00:39 IST

जालना :जिल्ह्यातील १ लाख ५३ हजार ९५७ शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय राज्यसरकाने घेतला आहे. जिल्ह्यातील १ लाख ५३ हजार ९५७ शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार आहे. राज्यभरातील शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक संपापुढे नमते घेत राज्य सरकारने सुरुवातीला अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय जाहीर केला. मात्र, यास सर्वस्तरातून विरोध सुरू झाल्याने सरकारने एक पाऊल मागे घेतले. खरिपासाठी तातडीची मदत म्हणून पीककर्जाचे थकबाकीदार असणाऱ्या शेतकऱ्यांना दहा हजार रुपयांची अग्रीम रक्कम देण्याचा आदेश काढण्यात आला. या आदेशातील निकषांच्या अमलबजावणीबाबत बँक अधिकाऱ्यांमध्येच संभ्रम निर्माण झाल्याने जिल्ह्यातील एकाही शेतकऱ्याला अद्याप ही मदत मिळाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, आता शासनाने सरसकट दीड लाखांपर्यंतचे पीककर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाबाबत शेतकऱ्यांमध्ये कही खुशी कही गम असे वातावरण आहे. जिल्ह्यातील थकित कर्जाचा आकडा दोन हजार कोटी रुपयांपर्यत आहे. एक लाखापर्यंतचे कर्ज असणाऱ्या कर्जदारांची संख्या एक लाख ३८ हजार आहे. तसेच मध्यम मुदतीच्या (पुनर्गठन) कर्जदारांची संख्या पंधरा हजार ९५७ आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात एक लाख व त्यापेक्षा जास्त पीककर्ज व मध्यम मुदतीचे कर्ज असलेल्या कर्जदार शेतकऱ्यांची संख्या एक लाख ९६ हजार आहे. या कर्जदारांपैकी निकषानुसार पात्र ठरणाऱ्या कर्जदारांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी आगामी काळात बँक अधिकाऱ्यांना कसरत करावी लागणार आहे. त्याचबरोबर या वर्षी एक हजार ४११ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्टही बँकांना पूर्ण करावे लागणार आहे.