शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

लाडसावंगीच्या डाळिंबाला मुंबईत मिळाला सोन्याचा भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 18:07 IST

२५० रुपये किलोने विकली गेली डाळींब

ठळक मुद्देदुष्काळात न डगमगता शेतकऱ्यांने घेतलेले परिश्रम आले फळाला

लाडसावंगी : म्हणतात ना की ‘केल्याने होत आहे रे, आधि केलेचि पाहिजे’ या उक्तीप्रमाणे येणाऱ्या अडचणीमुळे शेतकऱ्यांनी न डगमगता मात केली तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही, हे लाडसावंगी येथील शेतकऱ्याने सिद्ध करून दाखविले. या शेतकऱ्याने दुष्काळात डाळिंबासाठी अथक परिश्रम घेतले आणि आज डाळिंबाला सोन्यासारखा भाव मिळाला आहे. 

लाडसावंगी परिसर एकेकाळी मोसंबीचे माहेरघर म्हणून ओळखले जायचे; परंतु २०१२ मध्ये दुष्काळ पडल्यामुळे परिसरातील बहुतांशी बागा वाळल्या. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर त्या तोडण्याशिवाय पर्यायच नव्हता. त्यानंतर लाडसावंगी, शेलूद, चारठा, हातमाळी, नायगव्हाण, लामकाना, पिपंळखुंटा, सय्यदपूर, औरंगपूर आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणात डाळिंबाच्या बागा उभारल्या.आता हा परिसर डाळिंब झोन म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. मोसंबीला फळे येण्यासाठी ५ वर्षांचा कालावधी लागतो, तर डाळिंबाला दीड ते दोन वर्षांतच फळे लागतात. शिवाय मोसंबीपेक्षा डाळिंबाला पाणीही कमी लागते. त्यामुळे लाडसावंगी परिसरात मोठ्या  प्रमाणात डाळिंबाच्या बागा पाहायला मिळतात. 

भर उन्हाळ्यात सगळीकडे तीव्र पाणीटंचाई असताना या परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी पाण्याचे व्यवस्थित नियोजन करून तसेच शेततळ्यातील पाण्याचा अंदाज घेऊन डाळिंबाच्या बागा जोपासल्या. आता फळे विक्रीसाठी आली असून मुंबई, नाशिक, औरंगाबाद, जालना आदी बाजारपेठांमध्ये ती दाखल होत आहेत. दरम्यान, गेल्या तीन वर्षांत डाळींबांना पहिल्यांदाच चांगला भाव मिळाल्याने लाडसावंगी परिसरातील  शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. लाडसावंगी परिसरात गेल्या तीन महिन्यांत एकही मोठा पाऊस झाला नसल्यामुळे खरिपाची मका, बाजरी, मूग, उडीद, कापूस ही पिके मात्र, शेवटच्या घटका मोजत आहेत.

दोन टप्प्यांत ४ लाख ४० हजार रुपयांचे उत्पन्न अनिल पवार या शेतकऱ्याने मुंबई येथे ३० व ३१ आॅगस्ट रोजी डाळिंब विक्रीसाठी नेले. तेव्हा त्यांच्या पाचशे ग्रॅम वजन असलेल्या डाळिंबाला तब्बल २५० रुपये किलो, दोनशे ग्रॅम वजनाच्या डाळिंबाला १५० रुपये किलो, तर डागाळलेल्या डाळिंबाला ५० रुपये किलो असा भाव मिळाला. एक एकर क्षेत्रात घेतलेल्या डाळिंबाला दोन टप्प्यांत ४ लाख ४० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले असून, अजून अर्ध्याच्या वर माल बाकी असल्याचे पवार यांनी सांगितले. 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAurangabadऔरंगाबाद