शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
3
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच सारं काही २४ कॅरेट सोन्यांने बनवलेलं...
4
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
5
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
6
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
7
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
8
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
9
Hero Motors चा IPO येतोय! कंपनीचा बिझनेस पाहून तुम्हीही व्हाल थक्क! काय आहे भविष्यातील प्लॅन?
10
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
11
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता
12
मी कुठंही असो.. तो मला शोधतोच! 'त्या' चर्चेवर पहिल्यांदाच व्यक्त झाली काव्या मारन
13
‘सासरा मालीश करायला लावायचा, पती नेत्यांसोबत झोपायला पाठवायचा’, पीडितेच्या आरोपांनी खळबळ
14
ZIM vs SA Test: खतरनाक 'सुपर स्पिन'! गोलंदाजाच्या भन्नाट फिरकीने केली फलंदाजांची 'दांडी गुल' (Video)
15
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट
16
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
17
अंबानी-अदानींना टाकले मागे! नागपूरच्या कंपनीने घडवला इतिहास! 'या' अब्जाधीशाची विक्रमी कमाई!
18
खळबळजनक! सोनमपासून प्रेरणा घेऊन बायकोने काढला नवऱ्याचा काटा, बाईकला GPS अन्...
19
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
20
विधानसभेला बंडखोरी केली, अपक्ष निवडणूक लढवली, काँग्रेसकडून बड्या नेत्याचं निलंबन अखेर मागे  

लाडसावंगीच्या डाळिंबाला मुंबईत मिळाला सोन्याचा भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 18:07 IST

२५० रुपये किलोने विकली गेली डाळींब

ठळक मुद्देदुष्काळात न डगमगता शेतकऱ्यांने घेतलेले परिश्रम आले फळाला

लाडसावंगी : म्हणतात ना की ‘केल्याने होत आहे रे, आधि केलेचि पाहिजे’ या उक्तीप्रमाणे येणाऱ्या अडचणीमुळे शेतकऱ्यांनी न डगमगता मात केली तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही, हे लाडसावंगी येथील शेतकऱ्याने सिद्ध करून दाखविले. या शेतकऱ्याने दुष्काळात डाळिंबासाठी अथक परिश्रम घेतले आणि आज डाळिंबाला सोन्यासारखा भाव मिळाला आहे. 

लाडसावंगी परिसर एकेकाळी मोसंबीचे माहेरघर म्हणून ओळखले जायचे; परंतु २०१२ मध्ये दुष्काळ पडल्यामुळे परिसरातील बहुतांशी बागा वाळल्या. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर त्या तोडण्याशिवाय पर्यायच नव्हता. त्यानंतर लाडसावंगी, शेलूद, चारठा, हातमाळी, नायगव्हाण, लामकाना, पिपंळखुंटा, सय्यदपूर, औरंगपूर आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणात डाळिंबाच्या बागा उभारल्या.आता हा परिसर डाळिंब झोन म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. मोसंबीला फळे येण्यासाठी ५ वर्षांचा कालावधी लागतो, तर डाळिंबाला दीड ते दोन वर्षांतच फळे लागतात. शिवाय मोसंबीपेक्षा डाळिंबाला पाणीही कमी लागते. त्यामुळे लाडसावंगी परिसरात मोठ्या  प्रमाणात डाळिंबाच्या बागा पाहायला मिळतात. 

भर उन्हाळ्यात सगळीकडे तीव्र पाणीटंचाई असताना या परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी पाण्याचे व्यवस्थित नियोजन करून तसेच शेततळ्यातील पाण्याचा अंदाज घेऊन डाळिंबाच्या बागा जोपासल्या. आता फळे विक्रीसाठी आली असून मुंबई, नाशिक, औरंगाबाद, जालना आदी बाजारपेठांमध्ये ती दाखल होत आहेत. दरम्यान, गेल्या तीन वर्षांत डाळींबांना पहिल्यांदाच चांगला भाव मिळाल्याने लाडसावंगी परिसरातील  शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. लाडसावंगी परिसरात गेल्या तीन महिन्यांत एकही मोठा पाऊस झाला नसल्यामुळे खरिपाची मका, बाजरी, मूग, उडीद, कापूस ही पिके मात्र, शेवटच्या घटका मोजत आहेत.

दोन टप्प्यांत ४ लाख ४० हजार रुपयांचे उत्पन्न अनिल पवार या शेतकऱ्याने मुंबई येथे ३० व ३१ आॅगस्ट रोजी डाळिंब विक्रीसाठी नेले. तेव्हा त्यांच्या पाचशे ग्रॅम वजन असलेल्या डाळिंबाला तब्बल २५० रुपये किलो, दोनशे ग्रॅम वजनाच्या डाळिंबाला १५० रुपये किलो, तर डागाळलेल्या डाळिंबाला ५० रुपये किलो असा भाव मिळाला. एक एकर क्षेत्रात घेतलेल्या डाळिंबाला दोन टप्प्यांत ४ लाख ४० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले असून, अजून अर्ध्याच्या वर माल बाकी असल्याचे पवार यांनी सांगितले. 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAurangabadऔरंगाबाद