शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
3
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
4
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
5
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
7
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
8
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
9
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
10
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
11
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
12
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
13
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
14
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
15
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह
16
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
17
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
18
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले
19
भारतीय सैन्यानं कसं मोडलं दहशतवाद्यांचं कंबरडं? 'ऑपरेशन सिंदूर'चा पहिला व्हिडीओ समोर! बघाच
20
ऑपरेशन सिंदूरला बाजाराचाही कडक सॅल्यूट! टाटासह डिफेन्स स्टॉक्स रॉकेट, 'हे' शेअर्स मात्र आपटले

पाण्याचा बेसुमार उपसा !

By admin | Updated: April 8, 2017 00:18 IST

उस्मानाबाद :शेतीपिकासाठीही प्रकल्पातून वारेमाप पाणीउपसा सुरू आहे. परिणामी प्रकल्पसाठा झपाट्याने कमी होऊ लागला आहे.

उस्मानाबाद : सलग तीन वर्षांत दुष्काळाच्या झळा सोसल्यानंतर गतवर्षी जिल्हाभरात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. त्यामुळे लहान-मोठे आणि मध्यम प्रकल्पही तुडूंब भरले. परंतु, मागील काही महिन्यांपासून उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. असे असतानाच शेतीपिकासाठीही प्रकल्पातून वारेमाप पाणीउपसा सुरू आहे. परिणामी प्रकल्पसाठा झपाट्याने कमी होऊ लागला आहे. सद्यस्थितीत दोनशेवर प्रकल्पांमध्ये मिळून ३० ते ३२ टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. या पाण्याचा काटकसरीने वापर न केल्यास उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात भीषण टंचाईला तोंड द्यावे लागू शकते. ‘लोकमत’च्या वतीने करण्यात आलेल्या स्टिंग आॅपरेशनदरम्यान अनेक प्रकल्पांवर शेकडोंच्या घरात मोटारींद्वारे पाणीउपसा सुरू होता. काही ठिकाणी चर खोदून शेतीला पाणी दिले जात असल्याचेही समोर आले. त्यामुळे प्रशासनाने वेळीच खबरदारी घेण्याची गरज आहे.लोहारा  शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या लोहारा शिवारातील लघु पाझर तलावातून होणारा पाणीउपसा सुरूच राहिल्यास आगामी काही दिवसांत शहराला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे हा पाणीउपसा थांबवावा, असे पत्र नगर पंचायतीने पाटबंधारे विभागाला दिले आहे. परंतु, या पत्रालाही केराची टोपली दाखविल्याने येथून अद्यापही पाणीउपसा सुरूच असल्याचे चित्र आहे. उस्मानाबाद पाटबंधारे विभाग क्र. ८ लोहारा अंतर्गत चार लघुपाझर तलाव व सात साठवण तलाव येतात. यामध्ये अचलेर येथील एका लघु पाझर तलावात ४२.११ टक्के व दुसऱ्या साठवण तलावात ५६.७१ टक्के पाणीसाठा वगळता इतर तलावात दहा ते पंधरा टक्क्याच्या खाली पाणीसाठा आहे. भोसगा, जेवळी १ व जेवळी २, माळेगाव व हिप्परगा रवा साठवण तलावात झिरो टक्क्याच्या खाली पाणीसाठा आहे. लोहारा शिवारातील लघु पाझर तलाव पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने भरले होते. पण कॅनॉल लिकेज होते. त्यातून हजारो लिटर पाणी वाया जात होते. सध्याही या तलावावरून दिवस-रात्र शेतकरी पाणी उपसा करीत आहेत. त्यामुळे येथे सध्या केवळ ४.४० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. लोहारा शहराला पाणीपुरवठा करणारी विहीरही याच तलावात असून, पाणी उपसा असाच सुरु राहिल्यास येत्या काही दिवसांत शहराला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. यामुळे लोहारा नगरपंचायतीने हा पाणीउपसा बंद करावा, असे पत्र उस्मानाबाद पाटबंधारे विभाग क्र. ८ लोहारा यांना दिले आहे. परंतु, याकडेही पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केल्याने पाणी उपसा सुरुच असल्याचे शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर दिसून आले. या संदर्भात उपविभागीय अभियंता एस.एम.कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.