शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

पाण्याचा बेसुमार उपसा !

By admin | Updated: April 8, 2017 00:18 IST

उस्मानाबाद :शेतीपिकासाठीही प्रकल्पातून वारेमाप पाणीउपसा सुरू आहे. परिणामी प्रकल्पसाठा झपाट्याने कमी होऊ लागला आहे.

उस्मानाबाद : सलग तीन वर्षांत दुष्काळाच्या झळा सोसल्यानंतर गतवर्षी जिल्हाभरात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. त्यामुळे लहान-मोठे आणि मध्यम प्रकल्पही तुडूंब भरले. परंतु, मागील काही महिन्यांपासून उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. असे असतानाच शेतीपिकासाठीही प्रकल्पातून वारेमाप पाणीउपसा सुरू आहे. परिणामी प्रकल्पसाठा झपाट्याने कमी होऊ लागला आहे. सद्यस्थितीत दोनशेवर प्रकल्पांमध्ये मिळून ३० ते ३२ टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. या पाण्याचा काटकसरीने वापर न केल्यास उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात भीषण टंचाईला तोंड द्यावे लागू शकते. ‘लोकमत’च्या वतीने करण्यात आलेल्या स्टिंग आॅपरेशनदरम्यान अनेक प्रकल्पांवर शेकडोंच्या घरात मोटारींद्वारे पाणीउपसा सुरू होता. काही ठिकाणी चर खोदून शेतीला पाणी दिले जात असल्याचेही समोर आले. त्यामुळे प्रशासनाने वेळीच खबरदारी घेण्याची गरज आहे.लोहारा  शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या लोहारा शिवारातील लघु पाझर तलावातून होणारा पाणीउपसा सुरूच राहिल्यास आगामी काही दिवसांत शहराला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे हा पाणीउपसा थांबवावा, असे पत्र नगर पंचायतीने पाटबंधारे विभागाला दिले आहे. परंतु, या पत्रालाही केराची टोपली दाखविल्याने येथून अद्यापही पाणीउपसा सुरूच असल्याचे चित्र आहे. उस्मानाबाद पाटबंधारे विभाग क्र. ८ लोहारा अंतर्गत चार लघुपाझर तलाव व सात साठवण तलाव येतात. यामध्ये अचलेर येथील एका लघु पाझर तलावात ४२.११ टक्के व दुसऱ्या साठवण तलावात ५६.७१ टक्के पाणीसाठा वगळता इतर तलावात दहा ते पंधरा टक्क्याच्या खाली पाणीसाठा आहे. भोसगा, जेवळी १ व जेवळी २, माळेगाव व हिप्परगा रवा साठवण तलावात झिरो टक्क्याच्या खाली पाणीसाठा आहे. लोहारा शिवारातील लघु पाझर तलाव पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने भरले होते. पण कॅनॉल लिकेज होते. त्यातून हजारो लिटर पाणी वाया जात होते. सध्याही या तलावावरून दिवस-रात्र शेतकरी पाणी उपसा करीत आहेत. त्यामुळे येथे सध्या केवळ ४.४० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. लोहारा शहराला पाणीपुरवठा करणारी विहीरही याच तलावात असून, पाणी उपसा असाच सुरु राहिल्यास येत्या काही दिवसांत शहराला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. यामुळे लोहारा नगरपंचायतीने हा पाणीउपसा बंद करावा, असे पत्र उस्मानाबाद पाटबंधारे विभाग क्र. ८ लोहारा यांना दिले आहे. परंतु, याकडेही पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केल्याने पाणी उपसा सुरुच असल्याचे शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर दिसून आले. या संदर्भात उपविभागीय अभियंता एस.एम.कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.