शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पर्यटक नसल्याचा फटका सीताफळांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 17:10 IST

यंदा मुबलक पाऊस असल्याने खुलताबाद, दौलताबाद आणि वेरूळ परिसरात सीताफळांची आवक मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र काेरोनामुळे सध्या पर्यटन बंद असल्याने पर्यटक या भागात जात नसल्याने अनेक विक्रेत्यांची सीताफळे विक्रीविनाच वाया जात आहेत.

सुनील घोडके

खुलताबाद : यंदा मुबलक पाऊस असल्याने खुलताबाद, दौलताबाद आणि वेरूळ परिसरात सीताफळांची आवक मोठ्या प्रमाणावर आहे.  मात्र काेरोनामुळे सध्या पर्यटन बंद असल्याने अनेक विक्रेत्यांची सीताफळे विक्रीविनाच वाया जात आहेत.

यामुळे सीताफळ विक्रेते त्रस्त झाले असून यंदा पहिल्यांदाच ग्राहकांच्या शोधात फिरण्याची वेळ या व्यापाऱ्यांवर आली आहे. दौलताबाद, खुलताबाद, वेरूळ परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात सीताफळाचे  उत्पन्न घेतले जाते. यंदा प्रारंभीपासूनच  चांगला पाऊस असल्याने  परिसरातील बहुसंख्य झाडे सीताफळांनी लगडलेली आहेत. परंतू सध्या या मार्गावरून भाविक, पर्यटक यांचे जाणे- येणे बंद झाल्याने शेतकऱ्यांना  सीताफळाच्या विक्रीतून पैसे काढणे अवघड झाले आहे. दरवर्षी या दिवसांत सीताफळ विक्रीतून मोठ्या प्रमाणात होणारी उलाढाल यंदा ठप्प झाल्याचे काही व्यापाऱ्यांनी सांगितले. 

टॅग्स :saleविक्रीtourismपर्यटनfruitsफळे