शहरं
Join us  
Trending Stories
1
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
2
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
3
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
4
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
6
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
7
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
8
हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
9
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
10
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
11
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
12
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
13
"बिहारमध्ये जो 'गेम' झालाय, तो..."; विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अखिलेश यादव यांचा टोला
14
Mumbai: बीकॉम विद्यार्थ्याची जबरदस्तीने लिंग बदल शस्त्रक्रिया; ट्रान्सजेंडर टोळीकडून ब्लॅकमेलिंग आणि खंडणी!
15
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
16
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
17
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
18
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
19
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
20
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बीड बायपासच्या रुंदीकरणात राजकीय इच्छाशक्तीचा अभाव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 19:32 IST

राष्ट्रीय  महामार्ग प्राधिकरणाला बीड बायपास रस्त्याचे रुंदीकरण राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे रखडले आहे.

- विकास राऊत 

औरंगाबाद : राष्ट्रीय  महामार्ग प्राधिकरणाला बीड बायपास रस्त्याचे रुंदीकरण राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे रखडले आहे. मृत्यूचा सापळा बनलेल्या रस्त्याच्या रुंदीकरणात अडचणी येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. रुंदीकरण करायचे असेल, तर प्राधिकरणाने हा रस्ता शासनाकडून पत्रव्यवहाराने वर्ग करून घ्यावा.  रस्त्याच्या ‘बीओटी’ कराराचे काय करायचे, कंत्राटदाराशी काय वाटाघाटी करायच्या त्याचा निर्णय शासनस्तरावर होईल, अशी माहितीही सूत्रांकडून मिळाली. 

औरंगाबाद ते जालना रोडच्या रुंदीकरणात महानुभाव आश्रम चौक ते झाल्टा फाट्यापर्यंत १४ कि़मी. बीड बायपासचा समावेश २०१० मध्ये करण्यात आला. बीओटीवर तो रस्ता विकसित करण्यात आला. जर बीओटीतून हे १४ कि़मी. अंतर वगळले, तर रस्त्याची देखभाल व दुरुस्ती करणाऱ्या कंत्राटदाराची काहीही अडचण राहणार नाही. कॅशटोलच्या रकमेमध्ये सरकारने काही दर कमी केला तरच अडचण येईल; परंतु टोलचा दर जर कमी केलाच नाही आणि एचएआयने तो रस्ता बांधकाम विभागाकडून हस्तांतरित करून घेतला तर त्याचे काम गतीने होऊ शकेल; परंतु राष्ट्रीय महामार्गाचे काम सातारा-देवळाई चौकातून ४ कि़मी. अंतरावर आहे. त्यामुळे बीड बायपासवर एनएचएआयने गुंतवणूक का? करावी, असा मतप्रवाह सुरू झालेला आहे. त्यामुळे बीओटीच्या  कराराचा मुद्दा समोर आणला जात असल्याचे बोलले जात आहे. 

मुख्य अभियंता म्हणाले...शासनाकडे बीओटीच्या करारावर उपाय काढण्याबाबत पर्याय आहेत. त्या रस्त्याचा टोल औरंगाबाद-जालना या चौपदरीकरणातून वसूल केला जातो. तो दर जर शासनाने कायम ठेवला, तर काहीही फरक पडणार नाही. उलट कंत्राटदाराला ७ वर्षांसाठी जी देखभाल व दुरुस्ती करायची आहे, ती त्याला करावी लागणार नाही, असे मत बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता खं. तु.पाटील यांनी व्यक्त केले. 

तज्ज्ञ अभियंत्यांचे मत असे...

बीओटी करार आणि ४०० कोटींची टोल रक्कम हा सगळा दिशाभूल करणारा प्रकार असल्याचे मत तज्ज्ञ अभियंता पी.डी.कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, बीओटीतून बीड बायपास वगळला तरी काहीही फरक पडणार नाही. वाहतूक आणि टोल वसुलीवर काहीही परिणाम होणार नाही. कंत्राटदाराला ४०० कोटी देण्याची बाब कुठून समोर आली आहे, हे कळण्यास मार्ग नाही. तो रस्ता एनएचएआयकडे हस्तांतरित केल्यास कुठलाही करारभंग होईल, असे वाटत नाही. बायपास सध्या अपघाती मार्ग झालेला आहे. याबाबत शासनाने तातडीने निर्णय घ्यावा.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादroad safetyरस्ते सुरक्षाPoliticsराजकारणAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका