शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
2
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
3
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
4
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
5
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक
6
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
7
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
8
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
9
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
10
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
11
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
12
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
13
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
14
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
15
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
16
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
17
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
18
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
19
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
20
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…

जिल्ह्यात ‘भाग्यश्री’ कन्यांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 12:08 AM

मुलगा-मुलगी यांच्यातील समानतेबद्दल कितीही प्रबोधन झाले, तरी मुलगा हाच वंशाचा दिवा आणि मुलगी ही परक्याचे धन, हा समाजमनात रुजलेला गैरसमज काही केल्या कमी होताना दिसत नाही. याचाच परिणाम म्हणून की काय, गेल्या दीड वर्षाचा काळ लोटला; पण ‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीच्या जन्मावर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करणारे जिल्ह्यातील एकही दाम्पत्य समोर आले नाही.

विजय सरवदे ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मुलगा-मुलगी यांच्यातील समानतेबद्दल कितीही प्रबोधन झाले, तरी मुलगा हाच वंशाचा दिवा आणि मुलगी ही परक्याचे धन, हा समाजमनात रुजलेला गैरसमज काही केल्या कमी होताना दिसत नाही. याचाच परिणाम म्हणून की काय, गेल्या दीड वर्षाचा काळ लोटला; पण ‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीच्या जन्मावर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करणारे जिल्ह्यातील एकही दाम्पत्य समोर आले नाही.मुलींचा जन्मदर वाढविणे, स्त्रीभ्रूणहत्या रोखणे, लिंग भेदभाव न करणे, मुलींचे शिक्षण व आरोग्याचा दर्जा वाढविण्यास प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजना राबविली जाते. ही योजना तशी १ एप्रिल २०१६ पासूनच सुरू झाली.सुरुवातीला दारिद्र्यरेषेखालील तसेच एक लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असणारी कुटुंबेच या योजनेसाठी पात्र होती. अलीकडे १ आॅगस्ट २०१७ पासून या योजनेचे स्वरूप बदलले. आता ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न साडेसात लाखांपर्यंत आहे, अशा कुटुंबांनाही या योजनेचा लाभ घेता येतो; पण एका मुलीनंतर किंवा दोन मुलींवर आई किंवा वडिलांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणारे दाम्पत्यच या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. नेमकी हीच अट योजनेसाठी मारक ठरली आहे.एकीकडे, काही दाम्पत्य मुलीच्या जन्माचे स्वागत करतात; पण मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्याचे प्रकर्षाने टाळतात. जग २१ व्या शतकाच्या उंबरठ्यावर उभे आहे.आपला देश जागतिक महासत्ता बनण्याचे स्वप्न बघत आहे; पण आजही समाजामध्ये १६ व्या शतकातील चालीरीती, रूढी-परंपरा घट्ट चिटकून आहेत. लग्न झाल्यावर आज ना उद्या मुलगी निघून जाईल. मग उतार वयात आपली काठी कोण होईल, ही मानसिकता समाजामध्ये आजही कायम आहे.काय आहेत योजनेचे फायदे‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेंतर्गत कुटुंबांना पहिल्या मुलीच्या जन्माच्या स्वागतासाठी ५ हजार रुपये, दुसरीही मुलगीच झाली, तर तिच्याही स्वागतासाठी अडीच हजार रुपये दिले जातात. त्यानंतर मुलगी व आई या दोघींच्या संयुक्त बँक खात्यात एका मुलीसाठी १ लाख रुपये, दोन्ही मुली असतील, तर दोघींच्या नावे प्रत्येकी एक-एक लाख रुपयांची ठेव ठेवली जाते. मुलीचे वय १८ वर्षांचे झाल्यास सदरील रक्कम बँकेतून काढता येईल. मात्र, तोपर्यंत मुलगी अविवाहित असायला हवी.मुलींवर समाधानी असणाºया कुटुंबांची वानवायासंदर्भात जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय कदम म्हणाले की, या योजनेसाठी एक किंवा दोन मुली असणाºया दाम्पत्यांनी अर्ज केले; पण प्राप्त अर्जांपैकी एकाही कुटुंबाने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केलेली नाही. त्यामुळे प्राप्त अर्ज अवैध ठरले आहेत.योजना सुरू झाल्यापासून जिल्ह्यात एकही लाभार्थी पात्र ठरलेला नाही. मुलगा जन्माला येईल, या आशेवर या कुटुंबांनी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया टाळलेली असावी, असा कयास काढला जात आहे.