शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
2
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
3
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
4
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
5
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
6
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
7
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
8
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर
9
रशियाकडून पाकिस्तानला फायटर जेट इंजिनचा पुरवठा? काँग्रेसच्या दाव्यावर भाजपचा पलटवार...
10
आधार अपडेटसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, देशभरातील 6 कोटी मुलांना होणार फायदा
11
गुडन्यूज! ५८व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा झाला अरबाज खान, पत्नी शूराने दिला गोंडस बाळाला जन्म
12
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
13
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
14
पेट्रोलची चिंता मिटली! 2026 मध्ये येणार मारुतीची पहिली फ्लेक्स-फ्युएल कार, जाणून घ्या डिटेल्स...
15
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण
16
Viral Video: दोघे भिडले, लाथा-बुक्क्या मारत एकमेकांवर तुटून पडले; मेट्रोतील राडा व्हायरल
17
Napal Landslide: निसर्ग कोपला! नेपाळमध्ये ढगफुटी, भूस्खलनामुळे २२ जणांचा मृत्यू, विमानतळं महामार्ग बंद
18
केजरीवालांनी खासदार होणं टाळलं! उद्योगपती राजिंदर गुप्तांना राज्यसभेचे तिकीट, गुप्तांबद्दल जाणून घ्या
19
विषारी 'Coldrif' कफ सिरपने घेतला 14 बालकांचा जीव; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तपास सुरू
20
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."

Aurangabad Violence : लच्छू पहिलवानच दंगलीस कारणीभूत- इम्तियाज जलील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 01:08 IST

शहरात घडविण्यात आलेली ही दंगल पूर्वनियोजितच होती. यामागे मास्टरमाइंड लच्छू पहिलवानच असून, त्याला राजकीय आश्रय देण्यात येत असल्याने पोलीस कारवाई करायला तयार नाहीत. दंगलीत कोणत्या व्यक्तीने कोणती भूमिका बजावली, हे आम्ही सांगण्यापेक्षा पुरावेच बरेच काही सांगत आहेत. दंगलीशी संबंधित विविध व्हिडिओ, फोटो आणि पुरावे जमा करण्याचे काम आम्ही करीत आहोत. पोलिसांनी कारवाई न केल्यास आम्ही न्यायालयीन लढाई लढण्यात तयार आहोत, असे मत आ. इम्तियाज जलील यांनी व्यक्त केले.

औरंगाबाद : शहरात घडविण्यात आलेली ही दंगल पूर्वनियोजितच होती. यामागे मास्टरमाइंड लच्छू पहिलवानच असून, त्याला राजकीय आश्रय देण्यात येत असल्याने पोलीस कारवाई करायला तयार नाहीत. दंगलीत कोणत्या व्यक्तीने कोणती भूमिका बजावली, हे आम्ही सांगण्यापेक्षा पुरावेच बरेच काही सांगत आहेत. दंगलीशी संबंधित विविध व्हिडिओ, फोटो आणि पुरावे जमा करण्याचे काम आम्ही करीत आहोत. पोलिसांनी कारवाई न केल्यास आम्ही न्यायालयीन लढाई लढण्यात तयार आहोत, असे मत आ. इम्तियाज जलील यांनी व्यक्त केले.

दंगलीच्या पार्श्वभूमीवर आ. जलील यांनी एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी ते पुढे म्हणाले की, ‘चोरी तो चोरी उपरसे सीनाजोरी,’ अशी भूमिका शिवसेनेची दिसून येत आहे. शहरातील दंगल हिंदू विरुद्ध मुस्लिम अशी असती तर संपूर्ण शहर पेटले असते. एकाच भागात जाळपोळ, गोळीबार का? हे सर्व घडवून आणणारा व्यक्ती कोण? हे सर्वांना माहीत आहे. त्याला राजकीय आश्रय देणारेच आज पोलीस आयुक्तांकडे न्यायाची मागणी करीत आहेत. दंगलीत समाजकंटकांसोबत अनेक पोलीसही सहभागी झाले आहेत. त्याचे व्हिडिओच प्राप्त झाले आहेत.

मिटमिट्यात पोलिसांनी ज्या पद्धतीने अमानुषता दाखविली त्याचेच दर्शन जुन्या शहरात पाहायला मिळाले. दोषी पोलिसांवरही त्वरित कारवाई झाली पाहिजे. पोलिसांसमक्ष खाजगी रिव्हॉल्व्हरने गोळीबार करणारा नगरसेवक कोण? हे शोधून काढण्याचे कामही पोलिसांचे आहे. पोलिसांनी तीन तरुणांना हत्यारांसह ताब्यात घेतले. त्याला सोडविणारे राजकीय नेते कोण, याचाही व्हिडिओ आम्ही मिळविला आहे. शहागंज चमनमधील दुकाने हटविण्याची मागणी कोणी केली, फळविक्रेत्यांना कोणी मारहाण केली होती, व्यापाऱ्यांना हफ्ता कोणी मागितला होता, हे सर्व पोलिसांनाही माहीत आहे. वेळीच कारवाई करावी ही आमची अपेक्षा आहे. पक्षातर्फे जळालेली दुकाने पुन्हा बांधून देण्याचे काम करण्यात येणार असल्याचे आ. इम्तियाज जलील यांनी सांगितली.

मुख्यमंत्र्यांना पुरावे देणारशहरातील दंगलीचे सर्व पुरावे आम्ही मुख्यमंत्र्यांना सादर करणार आहोत. दंगलीत मरण पावलेला हारीस कादरीच्या काकाला पोलिसांनी घरात घुसून अमानुष मारहाण केली. मंत्र्यांना फिरण्यासाठी हेलिकॉप्टर आणि सहायक पोलीस आयुक्तांना मुंबईला हलविण्यासाठी शासन एअर अ‍ॅम्ब्युलन्स देत नाही. उद्या शहरात काही झाल्यास पोलीस अधिकारी पुढे कशाला जातील, शासनासाठी या सर्व बाबी लज्जास्पद आहेत. मिटमिट्याच्या दंगलीची चौकशी करणार होते मुख्यमंत्री; झाली का? मग या दंगलीचीही होईल कशावरून? शहर वाऱ्यावर सोडून पोलीस सुटीवर कसे जाऊ शकतात. रावसाहेब दानवे, खैैरे आणि स्थानिक आमदारांना आपल्या सोयीचा पोलीस आयुक्त हवा आहे. या वादात आयुक्तपद रिकामे असल्याचा आरोपही जलील यांनी केला. 

टॅग्स :communityसमाजSocialसामाजिकAurangabad Violenceऔरंगाबाद हिंसाचारPoliticsराजकारण