शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

Aurangabad Violence : लच्छू पहिलवानच दंगलीस कारणीभूत- इम्तियाज जलील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 01:08 IST

शहरात घडविण्यात आलेली ही दंगल पूर्वनियोजितच होती. यामागे मास्टरमाइंड लच्छू पहिलवानच असून, त्याला राजकीय आश्रय देण्यात येत असल्याने पोलीस कारवाई करायला तयार नाहीत. दंगलीत कोणत्या व्यक्तीने कोणती भूमिका बजावली, हे आम्ही सांगण्यापेक्षा पुरावेच बरेच काही सांगत आहेत. दंगलीशी संबंधित विविध व्हिडिओ, फोटो आणि पुरावे जमा करण्याचे काम आम्ही करीत आहोत. पोलिसांनी कारवाई न केल्यास आम्ही न्यायालयीन लढाई लढण्यात तयार आहोत, असे मत आ. इम्तियाज जलील यांनी व्यक्त केले.

औरंगाबाद : शहरात घडविण्यात आलेली ही दंगल पूर्वनियोजितच होती. यामागे मास्टरमाइंड लच्छू पहिलवानच असून, त्याला राजकीय आश्रय देण्यात येत असल्याने पोलीस कारवाई करायला तयार नाहीत. दंगलीत कोणत्या व्यक्तीने कोणती भूमिका बजावली, हे आम्ही सांगण्यापेक्षा पुरावेच बरेच काही सांगत आहेत. दंगलीशी संबंधित विविध व्हिडिओ, फोटो आणि पुरावे जमा करण्याचे काम आम्ही करीत आहोत. पोलिसांनी कारवाई न केल्यास आम्ही न्यायालयीन लढाई लढण्यात तयार आहोत, असे मत आ. इम्तियाज जलील यांनी व्यक्त केले.

दंगलीच्या पार्श्वभूमीवर आ. जलील यांनी एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी ते पुढे म्हणाले की, ‘चोरी तो चोरी उपरसे सीनाजोरी,’ अशी भूमिका शिवसेनेची दिसून येत आहे. शहरातील दंगल हिंदू विरुद्ध मुस्लिम अशी असती तर संपूर्ण शहर पेटले असते. एकाच भागात जाळपोळ, गोळीबार का? हे सर्व घडवून आणणारा व्यक्ती कोण? हे सर्वांना माहीत आहे. त्याला राजकीय आश्रय देणारेच आज पोलीस आयुक्तांकडे न्यायाची मागणी करीत आहेत. दंगलीत समाजकंटकांसोबत अनेक पोलीसही सहभागी झाले आहेत. त्याचे व्हिडिओच प्राप्त झाले आहेत.

मिटमिट्यात पोलिसांनी ज्या पद्धतीने अमानुषता दाखविली त्याचेच दर्शन जुन्या शहरात पाहायला मिळाले. दोषी पोलिसांवरही त्वरित कारवाई झाली पाहिजे. पोलिसांसमक्ष खाजगी रिव्हॉल्व्हरने गोळीबार करणारा नगरसेवक कोण? हे शोधून काढण्याचे कामही पोलिसांचे आहे. पोलिसांनी तीन तरुणांना हत्यारांसह ताब्यात घेतले. त्याला सोडविणारे राजकीय नेते कोण, याचाही व्हिडिओ आम्ही मिळविला आहे. शहागंज चमनमधील दुकाने हटविण्याची मागणी कोणी केली, फळविक्रेत्यांना कोणी मारहाण केली होती, व्यापाऱ्यांना हफ्ता कोणी मागितला होता, हे सर्व पोलिसांनाही माहीत आहे. वेळीच कारवाई करावी ही आमची अपेक्षा आहे. पक्षातर्फे जळालेली दुकाने पुन्हा बांधून देण्याचे काम करण्यात येणार असल्याचे आ. इम्तियाज जलील यांनी सांगितली.

मुख्यमंत्र्यांना पुरावे देणारशहरातील दंगलीचे सर्व पुरावे आम्ही मुख्यमंत्र्यांना सादर करणार आहोत. दंगलीत मरण पावलेला हारीस कादरीच्या काकाला पोलिसांनी घरात घुसून अमानुष मारहाण केली. मंत्र्यांना फिरण्यासाठी हेलिकॉप्टर आणि सहायक पोलीस आयुक्तांना मुंबईला हलविण्यासाठी शासन एअर अ‍ॅम्ब्युलन्स देत नाही. उद्या शहरात काही झाल्यास पोलीस अधिकारी पुढे कशाला जातील, शासनासाठी या सर्व बाबी लज्जास्पद आहेत. मिटमिट्याच्या दंगलीची चौकशी करणार होते मुख्यमंत्री; झाली का? मग या दंगलीचीही होईल कशावरून? शहर वाऱ्यावर सोडून पोलीस सुटीवर कसे जाऊ शकतात. रावसाहेब दानवे, खैैरे आणि स्थानिक आमदारांना आपल्या सोयीचा पोलीस आयुक्त हवा आहे. या वादात आयुक्तपद रिकामे असल्याचा आरोपही जलील यांनी केला. 

टॅग्स :communityसमाजSocialसामाजिकAurangabad Violenceऔरंगाबाद हिंसाचारPoliticsराजकारण