शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

मजुरांचा ताण, आण तणनाशक की हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:03 IST

रघुनाथ सावळे उंडणगाव : दिवसेंदिवस मजुरांचा येत असलेल्या तुटवड्यामुळे शेतकरी आता वैतागून गेले आहेत. यामुळे नाइलाजाने तणनाशकांकडे शेतकऱ्यांचा कल ...

रघुनाथ सावळे

उंडणगाव : दिवसेंदिवस मजुरांचा येत असलेल्या तुटवड्यामुळे शेतकरी आता वैतागून गेले आहेत. यामुळे नाइलाजाने तणनाशकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढला असून, याद्वारे शेतातील गवताचा नायनाट केला जात आहे.

सध्या खरीप हंगामाची शेतीकामे भरात असून, पिकांची निंदणी, कोळपणी, फवारणी आदी कामे सुरू आहेत. मृग नक्षत्रापासून मध्यंतरी पावसाने ओढ दिली. मात्र, आता रिमझिम पाऊस पडत असल्याने पिकांची वाढ जोमदार होत आहे. त्यातच दिवसेंदिवस मजुरांचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवू लागल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. वाढीव मजुरी देऊनही मजूर मिळत नसल्याने आसपासच्या गावांमध्ये पायपीट करावी लागत आहे. त्यात काही शेतकरी जास्तीचा मोबदला देऊन मजुरांना पळवत असल्याने इतरांना अडचणी येत आहेत. यातून नाइलाजाने शेतकऱ्यांनी तणाचा नाश करण्यासाठी रासायनिक औषधांचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे उत्पन्नात फटका बसणार असला तरीही मजुरांपेक्षा कमी खर्चात काम होत असल्याने शेतकऱ्यांना समाधान मानावे लागत आहे.

चौकट

...असे वाचतात शेतकऱ्यांचे पैसे

किमान १ एकर शेती निंदणीसाठी दिवसभरात किमान पाच मजूर लागतात. मजुरांचा २०० रुपये प्रतिरोज खर्च पकडला, तर १ हजार रुपये लागतात. त्याच एकरभर शेतात तणनाशकाचा वापर केला, तर चारशे ते पाचशे रुपयांमध्ये काम उरकून जाते. यामुळे परिश्रम व वेळेचीही बचत होते. या तणनाशकांचा मोठ्या शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे.

कोट.... बाकी

फोटो कॅप्शन : उंडणगाव परिसरातील शेतात तणनाशकाची फवारणी करताना शेतकरी.

210721\20210718_152456.jpg

उंडणगाव परिसरातील शेतात तणनाशकाची फवारणी करताना शेतकरी.