शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

मजुरांचा ताण, आण तणनाशक की हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:03 IST

रघुनाथ सावळे उंडणगाव : दिवसेंदिवस मजुरांचा येत असलेल्या तुटवड्यामुळे शेतकरी आता वैतागून गेले आहेत. यामुळे नाइलाजाने तणनाशकांकडे शेतकऱ्यांचा कल ...

रघुनाथ सावळे

उंडणगाव : दिवसेंदिवस मजुरांचा येत असलेल्या तुटवड्यामुळे शेतकरी आता वैतागून गेले आहेत. यामुळे नाइलाजाने तणनाशकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढला असून, याद्वारे शेतातील गवताचा नायनाट केला जात आहे.

सध्या खरीप हंगामाची शेतीकामे भरात असून, पिकांची निंदणी, कोळपणी, फवारणी आदी कामे सुरू आहेत. मृग नक्षत्रापासून मध्यंतरी पावसाने ओढ दिली. मात्र, आता रिमझिम पाऊस पडत असल्याने पिकांची वाढ जोमदार होत आहे. त्यातच दिवसेंदिवस मजुरांचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवू लागल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. वाढीव मजुरी देऊनही मजूर मिळत नसल्याने आसपासच्या गावांमध्ये पायपीट करावी लागत आहे. त्यात काही शेतकरी जास्तीचा मोबदला देऊन मजुरांना पळवत असल्याने इतरांना अडचणी येत आहेत. यातून नाइलाजाने शेतकऱ्यांनी तणाचा नाश करण्यासाठी रासायनिक औषधांचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे उत्पन्नात फटका बसणार असला तरीही मजुरांपेक्षा कमी खर्चात काम होत असल्याने शेतकऱ्यांना समाधान मानावे लागत आहे.

चौकट

...असे वाचतात शेतकऱ्यांचे पैसे

किमान १ एकर शेती निंदणीसाठी दिवसभरात किमान पाच मजूर लागतात. मजुरांचा २०० रुपये प्रतिरोज खर्च पकडला, तर १ हजार रुपये लागतात. त्याच एकरभर शेतात तणनाशकाचा वापर केला, तर चारशे ते पाचशे रुपयांमध्ये काम उरकून जाते. यामुळे परिश्रम व वेळेचीही बचत होते. या तणनाशकांचा मोठ्या शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे.

कोट.... बाकी

फोटो कॅप्शन : उंडणगाव परिसरातील शेतात तणनाशकाची फवारणी करताना शेतकरी.

210721\20210718_152456.jpg

उंडणगाव परिसरातील शेतात तणनाशकाची फवारणी करताना शेतकरी.