शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

पोलीस ठाण्यापेक्षा कोंडवाडा बरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 10:53 IST

गुन्हेगारी परिसर म्हणून ओळख असलेल्या पेठबीड पोलीस ठाण्याच्या इमारतीची सध्या दुरवस्था झाली आहे.

ठळक मुद्देपेठ बीडमधील स्थिती : २४ वर्षांपासून पडक्या इमारतीतून चालतो कारभार; असुविधांमुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्रास

- सोमनाथ खताळबीड : गुन्हेगारी परिसर म्हणून ओळख असलेल्या पेठबीड पोलीस ठाण्याच्या इमारतीची सध्या दुरवस्था झाली आहे. तब्बल २४ वर्षांपासून ठाण्याचा कारभार पडक्या इमारतीतून चालत आहे. तर येथील अधिकारी, कर्मचाºयांना कसल्याच सुविधा मिळत नसल्याने त्यांचे मानसिकता खचत असून संताप व्यक्त होत आहे. सोमवारी ‘लोकमत’ने स्पॉट पंचनामा केला असता येथील ‘ठाण्यापेक्षा कोंडवाडा बरा’, अशीच परिस्थिती दिसून आली. ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ च्या अनुपालनासाठी या अवस्थेतून ठाण्याला मुक्ती कधी मिळणार असा सवाल केला जात आहे.

नगर पालिकेच्या मालकीच्या इमारतीत १९९३ साली पोलीस ठाणे सुरू झाले. पूर्वी येथे शाळा होती, असे सांगण्यात आले. सध्या ही इमारत धोकादायक बनली आहे. भिंती पडल्या असून, पत्रेही तुटले आहेत. खिडक्या, दरवाजे मोडले आहेत. फरशा नसल्याने सर्वत्र माती आहे. अशा ठिकाणीच येथील अधिकारी, कर्मचा-यांना कामकाज करण्याची वेळ आलेली आहे. अशा वातावरणात काम करताना अधिकारी, कर्मचा-यांची मानसिकता बिघडत आहे. त्यामुळे येथे येणा-या नागरिकांवर चिडचिड झाल्याचे प्रकार पहावयास मिळतात. येथील कारभार चांगला असला तरी इमारत व इतर समस्या गंभीर असल्याने याकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदलत चालला आहे. आहे ते ठाणे सुसज्ज करावे, अन्यथा इतरत्र जागा उपलब्ध करून नवीन ठाणे तयार करावे, अशी मागणी सर्वसामान्यांमधून होत आहे.

ठाणे अन् घरांचीही तीच परिस्थितीजनतेच्या सुरक्षेसाठी रात्रंदिवस बंदोबस्तासाठी रस्त्यावर उभा असणा-या पोलिसांनाच आज असुविधांचा सामना करावा लागत आहे.अनेकांना राहण्यासाठी योग्य घरे नाहीत तर कामे करण्यासाठी ठाण्याला इमारती नाहीत. हाच धागा पकडून बीडमधील पेठबीड पोलीस ठाण्याची सोमवारी पाहणी केली. या पाहणीमध्ये अनेक समस्या आढळून आल्या. त्यावर ‘लोकमत’ने प्रकाश टाकत परिस्थिती मांडली आहे.

गृह विभागाचे दुर्लक्षपोलीस अधिकारी, कर्मचा-यांच्या निवासस्थानाच्या प्रश्नांसह जिल्ह्यातील दुरवस्था झालेल्या ठाण्यांच्या इमारतीसाठी लोकमतने वारंवार आवाज उठविलेला आहे. सर्व समस्या समजावून घेत त्या प्रशासनाच्या निदर्शनास आणल्या. परंतु गृह विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. याचा फटका पोलिसांना सहन करावा लागत असून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

लोकप्रतिनिधींकडूनही कानाडोळाकायदा व सुव्यस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये म्हणून काळजी घेणाºयांच्या प्रश्नांकडे खासदार, आमदारांसह इतर लोकप्रतिनिधींकडून कानाडोळा होत आहे. त्यांच्या दुर्लक्षामुळेच आज जिल्ह्यातील ठाण्यांच्या इमारतींची दुरवस्था झाल्याचे दिसते. आता तरी लोकप्रतिनिधिंनी आवाज उठवून पोलीस अधिकारी, कर्मचा-यांचे प्रश्न मार्गी लावावेत, अशी मागणी होत आहे.

पेठबीड हद्दीत सर्वाधिक गुन्हेगारीइतर पोलीस ठाण्यांच्या तुलनेत पेठबीड पोलीस ठाणे हद्दीत गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात आहे. हद्दपार, एमपीडीए, चोरटे, लुटारू, गुटखा माफिया, रॉकेल माफिया यासारखे गुन्हेगार याच भागात आहेत. तसेच या भागात नेहमीच विविध कारणांवरून जास्त वाद होतात. त्यामुळे तक्रारदारांची ठाण्यात नियमित वर्दळ असते. सर्वाधिक गुन्हेगारी असलेल्या या ठाण्यालाच हक्काची आणि सुसज्ज इमारत नसल्याने अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

दोन महिन्यांपूर्वीच नव्या इमारतीचा प्रस्ताव पाठविलाबार्शी नाका परिसरातील तेलगाव रोडवर पेठबीड ठाण्यासाठी दोन एकर जागेत नवीन इमारत प्रस्तावित करण्यात आली आहे.यासंदर्भात दोन महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठांकडे प्रस्तावही पाठविल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.परंतु काही लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या म्हणण्यानुसार हे ठाणे दूर अंतरावर जाणार आहे. या ठिकाणी नवीन इमारत उभारावी.वास्तविक पाहता या वादामुळेच या ठाण्याला हक्काची इमारत मिळत नसल्याचे सांगण्यात येते.

टॅग्स :BeedबीडPolice Stationपोलीस ठाणेCrime Newsगुन्हेगारी