शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

संशोधन करण्यासाठी पायाभूत विज्ञानाचे ज्ञान महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 21:49 IST

संशोधनाचा विकास होणे आणि पारदर्शीपणा येणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्थापत्य विभागातील प्रा. डॉ. डी. जी. रेगूलवार यांनी केले.

औरंगाबाद : संशोधन ही विकासाची अत्यंत महत्त्वाची पायरी आहे. संशोधनानेच वेगवेगळ्या समस्यांवर समाधान शोधणे आणि त्याचे समूळ निराकरण करणे शक्य होते. त्यामुळे संशोधनाचा विकास होणे आणि पारदर्शीपणा येणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्थापत्य विभागातील प्रा. डॉ. डी. जी. रेगूलवार यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि एमआयटी महाविद्यालयातर्फे ‘संशोधन पद्धती आणि विश्लेषणात्मक तंत्र’ यावर दोनदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. डॉ. डी. जी. रेगूलवार यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. ते म्हणाले, संशोधन कार्य करण्यासाठी योग्य आणि उपयुक्त शोधनिबंध विषय निवड जितकी महत्त्वाची आहे, तितकेच महत्त्व संशोधनाला असते. त्यामुळे संशोधन विषय निवडताना अतिशय काळजी घ्यावी लागते, असेही डॉ. रेगूलवार यांनी सांगितले.

द्वितीय सत्रात प्राचार्य डॉ. नीलेश पाटील म्हणाले, संशोधकांना वैज्ञानिक दृष्टिकोन सर्वांगीण विकासासाठी अत्यंत उपयुक्त आहे. संशोधनाच्या कक्षा रुंदावत असताना संशोधनाचा दर्जा उंचावला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दुसऱ्या दिवशी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. मजहर फारुकी यांनी मार्गदर्शन केले. डॉ. उत्तम काळवणे यांनीही प्रात्यक्षिके सादर करून मार्गदर्शन केले. तसेच डॉ. एस. एस. जामकर यांनी बौद्धिक संपदेचा अधिकार आणि पेटंट यावर विद्यार्थ्यांना सांगितले. शेवटच्या सत्रात डॉ. सुहेल हाश्मी यानी लिखित स्वरुपात संशोधन कार्य करण्यासाठीची माहिती सांगितली. प्रास्ताविक स्थापत्य विभागप्रमुख डॉ. मनीष दीक्षित यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. अर्चना पाठक आणि प्रा. अलका वेव्हाळ यांनी केले. कार्यशाळेच्या संयोजक डॉ. माधुरी मांगूळकर यांनी आभार व्यक्त केले.

कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी डॉ. उत्तम काळवणे, प्रा. वासुदेव उपाध्ये आणि प्रा. सुनील पाटील, प्रा. एस. जी. कादरी, प्रा. अजय रत्नपारखी, प्रा. राम चाटोरीकर, प्रा. अभिषेक जैस्वाल, प्रा. उमेश साळुंखे, प्रा. योगेश शेरमाळे, प्रा. सुजित माने, प्रा. पूजा सूर्यवंशी, प्रा. सय्यद फहाद आदींनी प्रयत्न केले.

 

टॅग्स :Educationशिक्षणAurangabadऔरंगाबाद