शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
6
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
7
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
8
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
9
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
10
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
11
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
12
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
13
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
14
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
15
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
16
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
17
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
18
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
19
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
20
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला

शहरातील विविध भागात अंधाराचे साम्राज्य; तब्बल ३५०० पथदिवे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 17:46 IST

दिवे बंद पडत असल्याने स्थायी समिती सदस्यांनी संताप व्यक्त करून अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

ठळक मुद्देस्थायी समिती सदस्य संतप्त नवे ८५० एलईडी बंदकनिष्ठ अभियंतापदाची भरती रद्द करण्याची मागणी

औरंगाबाद : शहरातील विविध भागांत अंधाराचे साम्राज्य असून, तब्बल साडेतीन हजार पथदिवे बंद असल्याची माहिती गुरुवारी (दि.२८) स्थायी समितीच्या बैठकीत उघड झाली. शिवाय नव्याने बसविण्यात आलेले ८५० एलईडी दिवेही बंद असून, आठ दिवसांतच हे दिवे बंद पडत असल्याने स्थायी समिती सदस्यांनी संताप व्यक्त करून अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती राजू वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीत शहरातील बंद पथदिव्यांच्या विषयांवरून सदस्यांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा मारा केला. सत्यभामा शिंदे यांनी वॉर्डातील बंद पथदिव्यांचे काम कोण करणार, नव्याने बसविलेले एलईडी दिवेदेखील बंद आहेत. चार दिवसांपासून फोन करीत आहे, अशी तक्रार त्यांनी केली. गजानन बारवाल, स्वाती नागरे, राखी देसरडा, ऋषिकेश खैरे, नर्गिस शेख यांनीही पथदिव्यांच्या मुद्यांवरून अधिकाऱ्यांची कोंडी केली. त्यावर उपअभियंता खमर शेख म्हणाले, कॉम्पे्रसिव्ह दुरुस्तीची मुदत ही ३१ डिसेंबर २०१८ रोजी संपली आहे. त्यानंतर शहरातील पथदिवे बंद आणि सुरू करण्याचे काम हे एलईडीच्या कंत्राटदाराला देण्यात आले. दुरुस्तीची कामे करण्याची सूचना देण्यात आली. परंतु कंत्राटदाराने त्यास नकार दिला आहे. त्यामुळे देखभाल दुरुस्तीसाठी निविदा काढण्यात आली. परंतु त्यास प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे अल्प मुदतीची नव्याने निविदा काढण्यात आली आहे. मनपाने प्रभागनिहाय देखभाल दुरुस्तीसाठी ठेकेदारांची नियुक्ती केली होती. त्यांची ६ कोटींची बिले रखडलेली आहेत. बिले मिळाल्याशिवाय कामे करणार नाही, असा पवित्रा ठेकेदारांनी घेतला आहे. 

प्रशासनाने त्यांची बिले देण्याचे आश्वासन देऊन निविदा घेण्याची विनंती केली आहे. त्यामुळे ७ मार्चपासून दुरुस्तीचे काम सुरू होण्याची शक्यता आहे. शिल्पाराणी वाडकर यांनी अधिकृत होर्डिंगविषयी विचारणा केली. राखी देसरडा यांनी जालना रोडवर एलईडी स्क्रीनद्वारे दाखविण्यात येणाऱ्या आक्षेपार्ह जाहिरातींवर बंधन घालण्याची मागणी केली. ऋषिकेश खैरे यांनी आपल्या वॉर्डात मुख्य रस्त्यावर ५०  वॅटची फिटिंग बसविणे गरजेचे असताना ३० वॅटचे दिवे बसविण्यात आल्याचीही तक्रार केली.

‘एलईडी’च्या कंत्राटदाराला  नोटीसएलईडी कंपनीच्या कंत्राटदाराने आतापर्यंत २३ हजार पथदिवे लावले आहेत. त्यातील ८५० पथदिवे बंद असल्याची माहिती खमर यांनी दिली. त्यावर सभापती आणि सदस्यांनी कंत्राटदारावर काय कारवाई केली, अशा प्रश्न केला. तेव्हा खमर म्हणाले, करारात कंत्राटदारावर कारवाई क रण्याची तरतूद नाही. परंतु शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी एक वर्षानंतर कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करू शकतो, असे सांगितले. त्यानुसार सभापतींनी कंत्राटदाराला नोटीस देऊन आठ दिवसांत दुरुस्ती करण्याची सूचना करावी. दुुरुस्ती न केल्यास नोटीस देण्याची सूचना वैद्य यांनी केली. 

नोकरभरती वादातमनपाने २४ फेब्रुवारी रोजी कनिष्ठ अभियंतापदाची नोकरभरतीची प्रक्रिया राबविली. परीक्षेच्या वेळी एकाच बाकावर दोन उमेदवारांना बसविल्याने भरती चुकीच्या पद्धतीने झाल्याचा आक्षेप गजानन बारवाल यांनी बैठकीच्या प्रारंभी घेतला. प्रश्नदेखील अभियांत्रिकीच्या दृष्टीने नव्हते. त्यामुळे भरती प्रक्रिया रद्द करण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी खुलासा करताना उपायुक्त मंजूषा मुथा यांनी परीक्षा योग्य पद्धतीने घेण्यात आल्याचे सांगितले. त्यावर बारवाल यांचे समाधान झाले नाही. त्यांनी एकाच बाकावर एकत्र बसलेल्या उमेदवारांचे मोबाईलमधील छायाचित्र सभापतींना दाखविले. त्यामुळे सभापती राजू वैद्य यांनी यासंदर्भातील सदस्यांचे म्हणणे आयुक्तांना कळविण्याची सूचना केली.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाroad safetyरस्ते सुरक्षा