शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

पुण्यात अपहृत तरुणीने केली स्वत:च सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 17:14 IST

या अपहरणकर्त्याच्या तावडीतून त्या तरुणीने स्वत:च सुटका करुन घेत पुण्यात पोलीस ठाणे गाठल्याने पुढील अनर्थ टळला.

वाळूज महानगर : कंपनीत कामासाठी जाणाऱ्या २१ वर्षीय तरुणीचे रांजणगावातून चौघांनी अपहरण करुन पुण्यात डांबून ठेवले होते. या अपहरणकर्त्याच्या तावडीतून त्या तरुणीने स्वत:च सुटका करुन घेत पुण्यात पोलीस ठाणे गाठल्याने पुढील अनर्थ टळला.

रांजणगाव शेणपुंजी येथील वास्तव्यास असणारी शितल (नाव बदलले आहे) ही ७ सप्टेंबरला सकाळी ६ वाजता कंपनीत जाण्यासाठी घराबाहेर पडली. गावातील रिक्षा स्टॅण्डवर एका रिक्षामध्ये मास्क लावलेले चार प्रवासी बसलेले होते. यावेळी या प्रवाशांना अगोदर पंढरपूरला सोडुन देऊ व त्यानंतर तुला कंपनीत सोडतो, असे सांगून तिला चालकाने रिक्षात बसवले.

काही वेळातच एकाने तिच्या तोंडावर हाताने काहीतरी मारल्यामुळे ती बेशुद्ध झाली. दुपारी १.३० वाजेच्या सुमारात ती शुद्धीवर आली. एका रुममध्ये असल्याचे तिला कळले. विशेष म्हणजे या रुममध्ये ते चौघेही होते. सचिन ताडेवाडच्या सांगण्यावरुन तुला पुण्याला आणल्याचे चौघांनी सांगितले. सचिनने यासाठी २० हजार रुपये दिल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास तीनजण जेवणाचा डबा आण्यासाठी रुमबाहेर पडले. तर एकजण तेथेच होता. काही वेळाने तोही निघुन गेला. कुणीही नसल्याची संधी साधून तिने तिच्याजवळील मोबाईलवरुन मारुती जंगीलवाड या नातेवाईकाशी संपर्क साधला. परिसरातील कुणाची मदत घेण्याचा सल्ला दिला. यानंतर खिडकीतून तिला एक मुलगी दिसली.

तिला मदतीसाठी बोलावले. त्या मुलीने दरवाजा उघडल्यानंतर शितल रुममधून बाहेर पडली. तिने हाडपसर पोलीस ठाणे गाठत आपबीती सांगितली. हाडपसर पोलिसांनी एमआयडीसी वाळूज पोलिसांना माहिती दिली. एमआयडीसी वाळूज पोलिसांनी पुण्यातून रविवारी (दि.८) रात्री शितलला सोबत घेतले.

टॅग्स :WalujवाळूजKidnappingअपहरण