शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

खैरेंनी शहर कचरामुक्त करून दाखवावे; आमदार जाधव यांचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 18:36 IST

खैरे जिल्ह्याचे नेते असताना त्यांना एक गायरान जमीन शोधून तेथे कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारता आलेला नाही. मी ५० कि़मी. लांबवरून शहरातील कचरा नेण्यास तयार असताना पालिकेवर दबाव आणून कचऱ्याची वाहने शहरातच रोखली जातात. हा सगळा प्रकार राजकीय श्रेयासाठी सुरू असल्याचेही जाधव म्हणाले.

औरंगाबाद : शहरात पाच महिन्यांपासून साचलेला कचरा पिशोर येथील हिराजी महाराज सहकारी साखर कारखान्यालगतच्या गायरान जमिनीत टाकण्यास रविवारी सकाळी ७ वाजता सुरुवात झाल्यानंतर दुपारी ३ वाजता मनपाने कचऱ्याने भरलेली वाहने शहरातच उभी करून ठेवली. या सगळ्या प्रकारामागे खा.चंद्रकांत यांच्या दबावाचे राजकारण असल्याचा आरोप आ.हर्षवर्धन जाधव यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना केला. 

खैरे जिल्ह्याचे नेते असताना त्यांना एक गायरान जमीन शोधून तेथे कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारता आलेला नाही. मी ५० कि़मी. लांबवरून शहरातील कचरा नेण्यास तयार असताना पालिकेवर दबाव आणून कचऱ्याची वाहने शहरातच रोखली जातात. हा सगळा प्रकार राजकीय श्रेयासाठी सुरू असल्याचेही जाधव म्हणाले. आ.जाधव म्हणाले, सकाळी २५ ट्रक रिकामे झाले, तेव्हा कुणीही विरोध केला नाही; परंतु कन्नड शिवसेना तालुकाप्रमुखाने शेतकऱ्यांना भडकावण्याचा प्रयत्न केला तरीही काही उपयोग झाला नाही, असे माध्यम प्रतिनिधींकडून समजले. शिवसेनेची कचऱ्यामुळे कोंडी झालेली असताना खैरे गटाचे कन्नड शिवसेना पदाधिकारी आड येणे योग्य नाही. खैरेंना नागरिकांच्या आरोग्यापेक्षा राजकारण जवळचे वाटू लागले आहे.

शहरात रोगराईची परिस्थिती निर्माण झाली आहे. मी आताही शहरातील कचरा नेण्यास तयार आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी माझी राहील. महापौर नंदुकमार घोडेले यांनी तर माझ्या निर्णयाचे स्वागत केले; परंतु त्यांनी मनपाच्या अधिकाऱ्यांना झापले. सद्य:स्थितीमध्ये खा.खैरेंनी मनपावर दबाव आणला असेल असे वाटत आहे. कारण मनपाचे अधिकारी माझा फोनही घेत नाहीत. मनपावर राजकीय दबाव आणल्याचे स्पष्ट झाले. कचऱ्यामुळे स्फोटक परिस्थिती निर्माण झाली असून, राजकारणापेक्षा शहर स्वच्छ ठेवण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा. नागरिक कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे मॉर्निंग वॉकलादेखील जात नाहीत. माझा मुलगा आजारी पडला आहे, शहरातील अनेकांची मुले आजारी पडली असतील.

मी खैरेंना आव्हान देतोमाझे खा. खैरे यांना स्पष्ट आव्हान आहे. त्यांनी शहर कचरामुक्त करून दाखवावे. कचऱ्याच्या वाहनांना खा.खैरे यांनी संरक्षण द्यावे आणि गायरान जमिनीवर कचरा टाकून दाखवावा. जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, पोलीस आयुक्तांनी ठरविले तर एका तासात कचऱ्यासाठी जमीन मिळेल. पक्षाचे पालकमंत्री, खासदार, आमदार असताना प्रशासकीय यंत्रणेकडून एक गायरान जमीन कचऱ्यासाठी उपलब्ध होत नाही, कुणालाही कचऱ्याचा प्रश्न सुटावा, असे वाटत नाही. असा आरोप जाधव यांनी केला. पालिकेला कचरा वाहतुकीसाठी इंधनाचा खर्चदेखील देण्यास मी तयार असल्याचा दावा त्यांनी केला.

पक्षप्रमुखांकडून शाबासकीचा दावापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शाबासकी दिल्याचा दावा आ.जाधव यांनी केला. व्हॉटस्अ‍ॅपवर त्यांना एसएमएस दिल्यानंतर त्यांनी शाबास म्हणून एसएमएस पाठविल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकारांनी एसएमएस दाखविण्याची मागणी केली असता त्यांनी एसएमएस दाखविला नाही.

ह्युमजिकल आहे; कन्नडमध्ये जाऊन सरळ करीलआ. हर्षवर्धन जाधव ह्युमजिकल आहे, कन्नडमध्ये जाऊन त्यांना सरळ करील. गटबाजीच्या राजकारणाला तेच खतपाणी घालीत आहेत. महापालिकेचे पदाधिकारी, अधिकारी कचरामुक्तीसाठी प्रयत्न करीत आहेत. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर हे जागा मिळण्यात आडकाठी आणत आहेत. मनपा आयुक्त डॉ.निपुण विनायकदेखील काहीही करीत नाहीत, असा आरोप करीत या सगळ्या प्रकारामागे शिवसेनाला बदनाम करण्याचा भाजपचा डाव असून, त्यांच्यासोबत आ.जाधव मिळाल्याचे प्रत्युत्तर खा.चंद्रकांत खैरे यांनी दिले. आ.जाधव यांच्यासह त्यांना खतपाणी घालणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची ताकद मी ठेवून आहे. होर्डिंग्ज काढण्यासाठी तिन्ही सनदी अधिकारी एकत्र येतात, मग कचऱ्यासाठी जमीन मिळावी, यासाठी का एकत्र येत नाहीत, असा सवालही खा.खैरे यांनी केला. 

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नChandrakant Khaireचंद्रकांत खैरेHarshavardhan Jadhavहर्षवर्धन जाधवAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका