शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

युवासेनेच्या मेळाव्यात शक्तिप्रदर्शनासाठी केली गर्दी; पोलीस म्हणाले, गर्दीचा अहवाल घेऊन निर्णय घेऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 13:36 IST

बीडमध्ये जास्त गर्दी करायला नको होती, त्यातून बोध घेतला असून, औरंगाबादच्या मेळाव्यात प्रमुख पदाधिकाऱ्यांना बोलाविल्याचे सरदेसाई यांनी सकाळी सांगितले होते.

ठळक मुद्देया मेळाव्यासाठी आसनव्यवस्था सोशल डिस्टन्सिंग पाळले जाईल, अशी करण्यात आली होती. पॅव्हेलियनच्या बाहेर आमदारपुत्र ऋषिकेश जैस्वाल यांच्या समर्थकांची मोठी गर्दी होती.सरदेसाई मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी येताच जंजाळ यांंनी त्यांना व्यासपीठाकडे नेले.

औरंगाबाद : युवासेनेच्या मराठवाडा पदाधिकारी संवाद मेळाव्यात शुक्रवारी शक्तिप्रदर्शनाचा अनुभव आला. युवा सेना उपसचिव राजेंद्र जंजाळ आणि कॉलेज कक्षप्रमुख ऋषिकेश जैस्वाल यांच्या समर्थकांची घोषणाबाजी चर्चेचा विषय ठरली. दरम्यान, गर्दीमुळे कोरोना संसर्ग (Corona Virus ) नियमांचे उल्लंघन झाल्याने याबाबत अहवाल घेऊन कारवाईचा निर्णय होईल, असे जवाहरनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष पाटील यांनी सांगितले.

शहानूरमियाँ दर्गा येथील श्रीहरी पॅव्हेलियन येथे शुक्रवारी युवासेना सचिव वरुण सरदेसाई ( Varun Sardesai ) यांच्या उपस्थितीत संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी आसनव्यवस्था सोशल डिस्टन्सिंग पाळले जाईल, अशी करण्यात आली होती. परंतु, पॅव्हेलियनच्या बाहेर आमदारपुत्र ऋषिकेश जैस्वाल यांच्या समर्थकांची मोठी गर्दी होती. ‘ऋषिकेश अंगार है, बाकी सब भंगार है’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. त्यातच मेळाव्या ठिकाणी जैस्वाल यांनी क्रेनवर मोठे होर्डिंग्ज लावले होते. शहरातील इतर ठिकाणच्या होर्डिंग्जवर त्यांचे छायाचित्र नसल्यामुळे त्यांनी तेथे होर्डिंग्ज लावल्याची चर्चा होती. दरम्यान, सरदेसाई मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी येताच जंजाळ यांंनी त्यांना व्यासपीठाकडे नेले. त्यावेळी त्यांच्या समर्थकांनी मोठा गराडा सरदेसाई यांना घातला. तोपर्यंत जैस्वाल व त्यांचे समर्थक पॅव्हेलियनच्या बाहेरच होते.

जंजाळ व इतर पुढे गेल्यानंतर घोषणाबाजी करीत जैस्वाल व त्यांच्या समर्थकांनी आत प्रवेश केला. तेथे एकच गर्दी झाली. सोशल, फिजिकल डिस्टन्सिंगही पाळले गेले नाही. बीडमध्ये जास्त गर्दी करायला नको होती, त्यातून बोध घेतला असून, औरंगाबादच्या मेळाव्यात प्रमुख पदाधिकाऱ्यांना बोलाविल्याचे सरदेसाई यांनी सकाळी सांगितले होते. मात्र, सायंकाळी त्यांना गर्दीचा सामना करावाच लागला. दरम्यान, मेळाव्याला सरदेसाई यांच्यासह रोहयो मंत्री संदीपान भूमरे ( Sandipan Bhumare ) , माजी खा. चंद्रकांत खैरे ( Chandrakant Khaire ) यांनी मेळाव्यात मार्गदर्शन केले. यावेळी नंदकुमार घोडले, त्र्यंबक तुपे, आदींची उपस्थिती होती. मेळाव्याचे प्रास्ताविक जंजाळ यांनी केले. ऋषिकेश खैरे यांनी मनोगत व्यक्त केले.

खैरेंमुळे जिल्ह्याची वाताहत तर जलील यांचे काम उत्तम ; भाजपच्या आमदाराकडून एमआयएम खासदारांचे कौतुक

आ. शिरसाट, आ. दानवे, सरदेसाई काय म्हणालेआ. शिरसाट म्हणाले, जिल्हाप्रमुख आ. दानवे यांच्यापेक्षा जंजाळ यांचे छायाचित्र सध्या माध्यमांतून वारंवार दिसते आहे. त्यांचा हा टोला मेळाव्यास्थळी चर्चेत होता. दर दोन महिन्यांनी युवासेनेचे मेळावे घेण्याची सूचना त्यांनी केली. जिल्हाप्रमुख आ. अंबादास दानवे म्हणाले, युवासेनेत शिकलेले, सुशिक्षित तरुण आले पाहिजेत. जेणेकरून चांगले संघटन होईल. ११५ वॉर्डांमध्ये युवासेनेचे चांगले संघटन झाले पाहिजे. दानवे यांच्या सूचनेचा धागा पकडून सरदेसाई यांनी जंजाळ, खैर यांच्यावर निशाणा साधला. ८ ते १० वर्षांपासून युवासेनेचे काम पाहत आहात. आता ११५ वॉर्डांत संघटनासाठी संवाद दौरा आयोजित करा. मुंबई, ठाण्यात चांगले संघटन होऊ शकते, मग येथेही संघटना चांगल्या पद्धतीने वाढविण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. फर्स्ट व्होटरची पहिली पसंती युवासेनाच असावी, ते म्हणाले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादShiv SenaशिवसेनाChandrakant Khaireचंद्रकांत खैरेraosaheb danveरावसाहेब दानवे