शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

युवासेनेच्या मेळाव्यात शक्तिप्रदर्शनासाठी केली गर्दी; पोलीस म्हणाले, गर्दीचा अहवाल घेऊन निर्णय घेऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 13:36 IST

बीडमध्ये जास्त गर्दी करायला नको होती, त्यातून बोध घेतला असून, औरंगाबादच्या मेळाव्यात प्रमुख पदाधिकाऱ्यांना बोलाविल्याचे सरदेसाई यांनी सकाळी सांगितले होते.

ठळक मुद्देया मेळाव्यासाठी आसनव्यवस्था सोशल डिस्टन्सिंग पाळले जाईल, अशी करण्यात आली होती. पॅव्हेलियनच्या बाहेर आमदारपुत्र ऋषिकेश जैस्वाल यांच्या समर्थकांची मोठी गर्दी होती.सरदेसाई मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी येताच जंजाळ यांंनी त्यांना व्यासपीठाकडे नेले.

औरंगाबाद : युवासेनेच्या मराठवाडा पदाधिकारी संवाद मेळाव्यात शुक्रवारी शक्तिप्रदर्शनाचा अनुभव आला. युवा सेना उपसचिव राजेंद्र जंजाळ आणि कॉलेज कक्षप्रमुख ऋषिकेश जैस्वाल यांच्या समर्थकांची घोषणाबाजी चर्चेचा विषय ठरली. दरम्यान, गर्दीमुळे कोरोना संसर्ग (Corona Virus ) नियमांचे उल्लंघन झाल्याने याबाबत अहवाल घेऊन कारवाईचा निर्णय होईल, असे जवाहरनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष पाटील यांनी सांगितले.

शहानूरमियाँ दर्गा येथील श्रीहरी पॅव्हेलियन येथे शुक्रवारी युवासेना सचिव वरुण सरदेसाई ( Varun Sardesai ) यांच्या उपस्थितीत संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी आसनव्यवस्था सोशल डिस्टन्सिंग पाळले जाईल, अशी करण्यात आली होती. परंतु, पॅव्हेलियनच्या बाहेर आमदारपुत्र ऋषिकेश जैस्वाल यांच्या समर्थकांची मोठी गर्दी होती. ‘ऋषिकेश अंगार है, बाकी सब भंगार है’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. त्यातच मेळाव्या ठिकाणी जैस्वाल यांनी क्रेनवर मोठे होर्डिंग्ज लावले होते. शहरातील इतर ठिकाणच्या होर्डिंग्जवर त्यांचे छायाचित्र नसल्यामुळे त्यांनी तेथे होर्डिंग्ज लावल्याची चर्चा होती. दरम्यान, सरदेसाई मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी येताच जंजाळ यांंनी त्यांना व्यासपीठाकडे नेले. त्यावेळी त्यांच्या समर्थकांनी मोठा गराडा सरदेसाई यांना घातला. तोपर्यंत जैस्वाल व त्यांचे समर्थक पॅव्हेलियनच्या बाहेरच होते.

जंजाळ व इतर पुढे गेल्यानंतर घोषणाबाजी करीत जैस्वाल व त्यांच्या समर्थकांनी आत प्रवेश केला. तेथे एकच गर्दी झाली. सोशल, फिजिकल डिस्टन्सिंगही पाळले गेले नाही. बीडमध्ये जास्त गर्दी करायला नको होती, त्यातून बोध घेतला असून, औरंगाबादच्या मेळाव्यात प्रमुख पदाधिकाऱ्यांना बोलाविल्याचे सरदेसाई यांनी सकाळी सांगितले होते. मात्र, सायंकाळी त्यांना गर्दीचा सामना करावाच लागला. दरम्यान, मेळाव्याला सरदेसाई यांच्यासह रोहयो मंत्री संदीपान भूमरे ( Sandipan Bhumare ) , माजी खा. चंद्रकांत खैरे ( Chandrakant Khaire ) यांनी मेळाव्यात मार्गदर्शन केले. यावेळी नंदकुमार घोडले, त्र्यंबक तुपे, आदींची उपस्थिती होती. मेळाव्याचे प्रास्ताविक जंजाळ यांनी केले. ऋषिकेश खैरे यांनी मनोगत व्यक्त केले.

खैरेंमुळे जिल्ह्याची वाताहत तर जलील यांचे काम उत्तम ; भाजपच्या आमदाराकडून एमआयएम खासदारांचे कौतुक

आ. शिरसाट, आ. दानवे, सरदेसाई काय म्हणालेआ. शिरसाट म्हणाले, जिल्हाप्रमुख आ. दानवे यांच्यापेक्षा जंजाळ यांचे छायाचित्र सध्या माध्यमांतून वारंवार दिसते आहे. त्यांचा हा टोला मेळाव्यास्थळी चर्चेत होता. दर दोन महिन्यांनी युवासेनेचे मेळावे घेण्याची सूचना त्यांनी केली. जिल्हाप्रमुख आ. अंबादास दानवे म्हणाले, युवासेनेत शिकलेले, सुशिक्षित तरुण आले पाहिजेत. जेणेकरून चांगले संघटन होईल. ११५ वॉर्डांमध्ये युवासेनेचे चांगले संघटन झाले पाहिजे. दानवे यांच्या सूचनेचा धागा पकडून सरदेसाई यांनी जंजाळ, खैर यांच्यावर निशाणा साधला. ८ ते १० वर्षांपासून युवासेनेचे काम पाहत आहात. आता ११५ वॉर्डांत संघटनासाठी संवाद दौरा आयोजित करा. मुंबई, ठाण्यात चांगले संघटन होऊ शकते, मग येथेही संघटना चांगल्या पद्धतीने वाढविण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. फर्स्ट व्होटरची पहिली पसंती युवासेनाच असावी, ते म्हणाले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादShiv SenaशिवसेनाChandrakant Khaireचंद्रकांत खैरेraosaheb danveरावसाहेब दानवे