शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

केळकर समितीने विदर्भाला झुकते माप दिल्याचा आक्षेप

By admin | Updated: January 9, 2015 00:53 IST

औरंगाबाद : ‘केळकर समितीच्या शिफारशींच्या माध्यमातून जे मिळतंय ते तरी आधी नेमकेपणाने पदरात पाडून घेऊ या’असे आवाहन आज येथे या समितीचे एक सदस्य

औरंगाबाद : ‘केळकर समितीच्या शिफारशींच्या माध्यमातून जे मिळतंय ते तरी आधी नेमकेपणाने पदरात पाडून घेऊ या’असे आवाहन आज येथे या समितीचे एक सदस्य व मराठवाड्याचे प्रसिद्ध कृषितज्ज्ञ विजयअण्णा बोराडे यांनी केले. ते डॉ. बापू- सुधाताई काळदाते प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केळकर समितीच्या अहवालावरील चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते. आ. कृ. वाघमारे प्रशालेच्या सभागृहात ही चर्चा पार पडली. त्यात पर्यावरणतज्ज्ञ प्रा. विजय दिवाण व जलतज्ज्ञ प्रा.डॉ. प्रदीप पुरंदरे यांनी आपापली मते मांडली. प्रारंभी, डॉ. बापूसाहेब काळदाते व सुधाताई काळदाते यांच्या प्रतिमेचे पूजन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर अण्णा खंदारे यांनी पाहुण्यांचे स्वागत गुलाबपुष्प देऊन केले. भाऊ शिंदे यांनी प्रास्ताविक केले. विजयअण्णा बोराडे यांनी सांगितले की, आपण तुलनाही करीत राहू व संघर्षात्मक भूमिकाही घेऊ; पण जे मिळतंय ते नेमकेपणाने पदरात पाडून घेण्याची भूमिका ठेवू या. प्रा. विजय दिवाण यांनी अहवालातील शिफारशींचा आढावा घेत केळकर समितीने मराठवाड्यापेक्षा विदर्भाला झुकते माप दिल्याचा तीव्र आक्षेप घेतला. त्यांनी सांगितले की, २०१० सालाआधीच्या काळात महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र या विभागाच्या विकासासाठी भौतिक व आर्थिक तरतुदी करीत जाण्याचा दृष्टिकोन रूढ होता. हा दृष्टिकोन ‘सर्वांसाठी एकाच मापाचा झगा शिवण्यासारखा असून, तो अपर्याप्त आणि परिणामशून्य सिद्ध झाला आहे. जुन्या दृष्टिकोनात विभागाच्या वाढीचे विविध पैलू व स्रोत, कारभारातील समस्या, विभागनिहाय धोरणे यांचा पुरेसा विचार नव्हता. म्हणून समितीने धोरणविषयक आणि कारभारविषयक सुधारणा, प्रादेशिक नियोजन आणि आर्थिक तरतुदी यांच्या विकेंद्रित संरचना आणि काही विशिष्ट सूत्रांवर आधारित तरतुदी या प्रस्तावित केल्या आहेत.अनेक आकडेवारी सादर करीत समितीने विदर्भाला झुकते माप दिल्याचा आरोप दिवाण यांनी केला. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचाही अहवालात उल्लेख नाही आणि दारिद्र्य निर्देशांक व मानव निर्देशांकही घेण्यात आलेला नाही, असे त्यांचे म्हणणे पडले. जलतज्ज्ञ प्रा. डॉ. प्रदीप पुरंदरे यांनी सांगितले की, ५७१ पानांचा व १३ प्रकरणांचा हा अहवाल असून, त्यातील सिंचनाबद्दलची आकडेवारी विश्वासार्ह नाही. अनेक शब्दांचा अर्थ चुकीचा लावण्यात आला आहे. सिंचनाचा अर्थ पाटबंधारे असा लावण्यात आला आहे. कोणकोणत्या शिफारशी समितीने केल्या आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.