शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
2
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
3
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
4
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
5
Two Wheeler Toll: आता दुचाकींनाही टोल; १५ ऑगस्टपासून 'या' मार्गांवरून जाण्यासाठी मोजावे लागणार पैसे
6
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
7
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
8
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
9
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 
10
'नमस्कार फ्रॉम स्पेस...', अंतराळातून शुभांशू शुक्लांचा नवीन Video; काय म्हणाले पाहा...
11
'या' तरुणीने रील बनवून कमावले ४१ कोटी! रोज कमावते अडीच लाख रुपये! कोण आहे 'द रिबेल किड'?
12
‘यूं ही चला चल…’ गाणे ऐकले अन्...; हवाई दलाचे वैमानिक ते अंतराळवीर अशी भरारी, असा आहे शुभांशू शुक्ला यांचा प्रवास
13
'शांत हो श्रीगुरुदत्ता' हे विनवणीपर कवन टेंबे स्वामींना का लिहिले? त्याक्षणी नेमके घडले तरी काय?
14
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
15
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
16
मुंबईत ३० व्या मजल्यावरून उडी घेत अल्पवयीन मुलीची आत्महत्या; कुटुंबीयांकडून घातपाताचा संशय
17
FASTag वापरणाऱ्यांसाठी खूशखबर! आता फक्त टोल नाही, तर पार्किंग-चार्जिंगसह 'या' कामांसाठीही वापरता येणार?
18
मित्रांसोबत इकडं जा... तिकडं जा खेळ रंगला अन् सराव कमी पडला! पृथ्वी शॉला चूक कळली, आता...
19
Video: धक्कादायक! रील बनवण्यासाठी महिलेने चक्क रेल्वे रुळांवरून चालवली कार, अखेरीस...  
20
Viral Video: धापा टाकत रुग्णालयात पोहोचला, डॉक्टरांनी विचारताच उघडली बॅग, पाहून अनेकांची बोलती बंद!

केळकर समितीने विदर्भाला झुकते माप दिल्याचा आक्षेप

By admin | Updated: January 9, 2015 00:53 IST

औरंगाबाद : ‘केळकर समितीच्या शिफारशींच्या माध्यमातून जे मिळतंय ते तरी आधी नेमकेपणाने पदरात पाडून घेऊ या’असे आवाहन आज येथे या समितीचे एक सदस्य

औरंगाबाद : ‘केळकर समितीच्या शिफारशींच्या माध्यमातून जे मिळतंय ते तरी आधी नेमकेपणाने पदरात पाडून घेऊ या’असे आवाहन आज येथे या समितीचे एक सदस्य व मराठवाड्याचे प्रसिद्ध कृषितज्ज्ञ विजयअण्णा बोराडे यांनी केले. ते डॉ. बापू- सुधाताई काळदाते प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केळकर समितीच्या अहवालावरील चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते. आ. कृ. वाघमारे प्रशालेच्या सभागृहात ही चर्चा पार पडली. त्यात पर्यावरणतज्ज्ञ प्रा. विजय दिवाण व जलतज्ज्ञ प्रा.डॉ. प्रदीप पुरंदरे यांनी आपापली मते मांडली. प्रारंभी, डॉ. बापूसाहेब काळदाते व सुधाताई काळदाते यांच्या प्रतिमेचे पूजन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर अण्णा खंदारे यांनी पाहुण्यांचे स्वागत गुलाबपुष्प देऊन केले. भाऊ शिंदे यांनी प्रास्ताविक केले. विजयअण्णा बोराडे यांनी सांगितले की, आपण तुलनाही करीत राहू व संघर्षात्मक भूमिकाही घेऊ; पण जे मिळतंय ते नेमकेपणाने पदरात पाडून घेण्याची भूमिका ठेवू या. प्रा. विजय दिवाण यांनी अहवालातील शिफारशींचा आढावा घेत केळकर समितीने मराठवाड्यापेक्षा विदर्भाला झुकते माप दिल्याचा तीव्र आक्षेप घेतला. त्यांनी सांगितले की, २०१० सालाआधीच्या काळात महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र या विभागाच्या विकासासाठी भौतिक व आर्थिक तरतुदी करीत जाण्याचा दृष्टिकोन रूढ होता. हा दृष्टिकोन ‘सर्वांसाठी एकाच मापाचा झगा शिवण्यासारखा असून, तो अपर्याप्त आणि परिणामशून्य सिद्ध झाला आहे. जुन्या दृष्टिकोनात विभागाच्या वाढीचे विविध पैलू व स्रोत, कारभारातील समस्या, विभागनिहाय धोरणे यांचा पुरेसा विचार नव्हता. म्हणून समितीने धोरणविषयक आणि कारभारविषयक सुधारणा, प्रादेशिक नियोजन आणि आर्थिक तरतुदी यांच्या विकेंद्रित संरचना आणि काही विशिष्ट सूत्रांवर आधारित तरतुदी या प्रस्तावित केल्या आहेत.अनेक आकडेवारी सादर करीत समितीने विदर्भाला झुकते माप दिल्याचा आरोप दिवाण यांनी केला. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचाही अहवालात उल्लेख नाही आणि दारिद्र्य निर्देशांक व मानव निर्देशांकही घेण्यात आलेला नाही, असे त्यांचे म्हणणे पडले. जलतज्ज्ञ प्रा. डॉ. प्रदीप पुरंदरे यांनी सांगितले की, ५७१ पानांचा व १३ प्रकरणांचा हा अहवाल असून, त्यातील सिंचनाबद्दलची आकडेवारी विश्वासार्ह नाही. अनेक शब्दांचा अर्थ चुकीचा लावण्यात आला आहे. सिंचनाचा अर्थ पाटबंधारे असा लावण्यात आला आहे. कोणकोणत्या शिफारशी समितीने केल्या आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.