शहरं
Join us  
Trending Stories
1
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
2
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
4
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
5
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
6
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
7
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
8
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
9
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
10
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
11
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
12
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
13
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
14
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
15
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
16
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
17
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
18
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
19
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
20
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...

Kargil Victory Day: एका हातात रायफल, दुसऱ्या हातात ‘डाॅक्टर बॅग’ अन् वरून गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 16:10 IST

कारगिल युद्धात मेडिकल असिस्टंट म्हणून कामगिरी; माजी सैनिक अशोक हंगे यांनी सांगितला विजयी अनुभव

छत्रपती संभाजीनगर : रक्त गोठवणारे उणे तापमान, त्यात २२ हजार फूट उंचीवरील टायगर हिल काबीज करून तेथून खालच्या काकसरा आणि दराज या गावात असलेल्या आपल्या सैनिकांच्या दिशेने गोळीबाराचा मारा करणारे पाकिस्तानी सैनिक, अशा परिस्थितीचा मुकाबला करीत भारतीय सैनिक पुढे सरकत होते. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत एका हातात रायफल आणि दुसऱ्या हातात ‘डाॅक्टर बॅग’ घेऊन मीही पुढे सरकत होतो. भारतीय सैनिकांवर उपचाराची जबाबदारी पार पाडताना मीही रायफल चालवली. तब्बल ६० दिवस लढा दिल्यानंतर कारगिल विजय साकारला, अशा शब्दांत कारगिल युद्धात मेडिकल असिस्टंट म्हणून कामगिरी बजावणारे माजी सैनिक अशोक संभाजी हंगे यांनी अनुभवन कथन केले.

दरवर्षी २६ जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. हा दिवस १९९९ मध्ये कारगिल युद्धात भारतीय सैनिकांच्या विजय आणि त्यांच्या बलिदानाला सन्मान देण्यासाठी साजरा केला जातो. कारगिल युद्ध हे भारत आणि पाकिस्तान यांच्यात जम्मू आणि काश्मीरमधील कारगिल येथे होते. या युद्धात भारतीय सैन्याने उंच पर्वतीय प्रदेशांमध्ये कठोर परिस्थितींचा सामना करत शत्रूच्या ठिकाणांना नष्ट केले आणि विजय मिळवला. या युद्धात अनेक वीर जवानांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. कारगिल युद्धात मेडिकल असिस्टंट (आर्मी मेडिकल कोर) म्हणून जखमी सैनिकांवर प्रथमोपचार करण्याची सेवा केलेले माजी सैनिक अशोक संभाजी हंगे यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी त्यावेळच्या परिस्थितीला उजाळा दिला. कारगिल योद्धा असलेले हांगे यांना अनेक ‘मेडल्स’, ‘महाराष्ट्र भूषण’, ‘मराठवाडा भूषण’सह अनेक पुरस्काराने सन्मानित केले आहे. मूळ लातूर येथील रहिवासी असलेले हंगे २००५ पासून पडेगाव येथे राहतात.

जखमी सैनिकाला पाठीवरून न्यावे लागतअशोग हंगे म्हणाले, चारही बाजूंनी बर्फाचे डोंगर. त्यातून जाणारा नागमोडी रस्ता. तेथूनही एकच माणूस चालू शकेल अशी स्थिती. एखादा सैनिक जखमी झाला तर त्याला पाठीवर दराज किंवा काकसरा भागातील तळापर्यंत पोहोचावे लागते. अनेकदा रात्रीच्या वेळी हे काम चालायचे. पाकिस्तानी सैनिकांकडून होणाऱ्या गोळीबाराने दगडांचे तुकडेही सैनिकांच्या शरीरातील अवयवांमध्ये घुसायचे. अशा जखमी सैनिकाला ‘इमो ब्लाईज’ (अवयवाला हलू न देता) अवस्थेत पाठीवर न्यावे लागत असे. रक्तस्राव थांबविण्यासाठी प्रयत्न करावा लागत असे. ‘डाॅक्टर बॅग’मधील वैद्यकीय साहित्यांच्या मदतीने अनेकांवर प्राथमिक उपचार केले. प्रदीर्घ सेवेनंतर २००५ मध्ये सेवानिवृत्त झालो. आता माजी सैनिकांच्या प्रश्नांसाठी काम करतो. माझा मुलगा भारतीय तटरक्षक दलात असिस्टंट कमांडरपदी नियुक्त झाला आहे.

टॅग्स :Kargil Vijay Diwasकारगिल विजय दिनAurangabadऔरंगाबादIndian Armyभारतीय जवान