शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Kargil Victory Day: एका हातात रायफल, दुसऱ्या हातात ‘डाॅक्टर बॅग’ अन् वरून गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 16:10 IST

कारगिल युद्धात मेडिकल असिस्टंट म्हणून कामगिरी; माजी सैनिक अशोक हंगे यांनी सांगितला विजयी अनुभव

छत्रपती संभाजीनगर : रक्त गोठवणारे उणे तापमान, त्यात २२ हजार फूट उंचीवरील टायगर हिल काबीज करून तेथून खालच्या काकसरा आणि दराज या गावात असलेल्या आपल्या सैनिकांच्या दिशेने गोळीबाराचा मारा करणारे पाकिस्तानी सैनिक, अशा परिस्थितीचा मुकाबला करीत भारतीय सैनिक पुढे सरकत होते. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत एका हातात रायफल आणि दुसऱ्या हातात ‘डाॅक्टर बॅग’ घेऊन मीही पुढे सरकत होतो. भारतीय सैनिकांवर उपचाराची जबाबदारी पार पाडताना मीही रायफल चालवली. तब्बल ६० दिवस लढा दिल्यानंतर कारगिल विजय साकारला, अशा शब्दांत कारगिल युद्धात मेडिकल असिस्टंट म्हणून कामगिरी बजावणारे माजी सैनिक अशोक संभाजी हंगे यांनी अनुभवन कथन केले.

दरवर्षी २६ जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. हा दिवस १९९९ मध्ये कारगिल युद्धात भारतीय सैनिकांच्या विजय आणि त्यांच्या बलिदानाला सन्मान देण्यासाठी साजरा केला जातो. कारगिल युद्ध हे भारत आणि पाकिस्तान यांच्यात जम्मू आणि काश्मीरमधील कारगिल येथे होते. या युद्धात भारतीय सैन्याने उंच पर्वतीय प्रदेशांमध्ये कठोर परिस्थितींचा सामना करत शत्रूच्या ठिकाणांना नष्ट केले आणि विजय मिळवला. या युद्धात अनेक वीर जवानांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. कारगिल युद्धात मेडिकल असिस्टंट (आर्मी मेडिकल कोर) म्हणून जखमी सैनिकांवर प्रथमोपचार करण्याची सेवा केलेले माजी सैनिक अशोक संभाजी हंगे यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी त्यावेळच्या परिस्थितीला उजाळा दिला. कारगिल योद्धा असलेले हांगे यांना अनेक ‘मेडल्स’, ‘महाराष्ट्र भूषण’, ‘मराठवाडा भूषण’सह अनेक पुरस्काराने सन्मानित केले आहे. मूळ लातूर येथील रहिवासी असलेले हंगे २००५ पासून पडेगाव येथे राहतात.

जखमी सैनिकाला पाठीवरून न्यावे लागतअशोग हंगे म्हणाले, चारही बाजूंनी बर्फाचे डोंगर. त्यातून जाणारा नागमोडी रस्ता. तेथूनही एकच माणूस चालू शकेल अशी स्थिती. एखादा सैनिक जखमी झाला तर त्याला पाठीवर दराज किंवा काकसरा भागातील तळापर्यंत पोहोचावे लागते. अनेकदा रात्रीच्या वेळी हे काम चालायचे. पाकिस्तानी सैनिकांकडून होणाऱ्या गोळीबाराने दगडांचे तुकडेही सैनिकांच्या शरीरातील अवयवांमध्ये घुसायचे. अशा जखमी सैनिकाला ‘इमो ब्लाईज’ (अवयवाला हलू न देता) अवस्थेत पाठीवर न्यावे लागत असे. रक्तस्राव थांबविण्यासाठी प्रयत्न करावा लागत असे. ‘डाॅक्टर बॅग’मधील वैद्यकीय साहित्यांच्या मदतीने अनेकांवर प्राथमिक उपचार केले. प्रदीर्घ सेवेनंतर २००५ मध्ये सेवानिवृत्त झालो. आता माजी सैनिकांच्या प्रश्नांसाठी काम करतो. माझा मुलगा भारतीय तटरक्षक दलात असिस्टंट कमांडरपदी नियुक्त झाला आहे.

टॅग्स :Kargil Vijay Diwasकारगिल विजय दिनAurangabadऔरंगाबादIndian Armyभारतीय जवान