शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
2
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
3
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
4
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
5
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
6
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
7
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
8
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
9
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
10
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
11
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
12
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
13
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
14
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
15
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
16
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
17
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
18
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
19
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
20
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव-भीमा येथील घटना दुर्दैवी, मात्र एल्गार परिषदेमुळे नाही झाली दंगल - रामदास आठवले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 17:12 IST

प्रकाश आंबेडकरांनी पुण्यात घेतलेल्या एल्गार परिषदेमुळे कोरेगाव-भीमाची दंगल झालेली नाही. कोपर्डी येथील घटना, अ‍ॅट्रॉसिटीचा गैरवापर व वढू गावातील प्रकरणाचा परिपाक म्हणजेच कोरेगाव भीमा येथील घडलेली घटना आहे, असे मत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे व्यक्त केले. 

औरंगाबाद : प्रकाश आंबेडकरांनी पुण्यात घेतलेल्या एल्गार परिषदेमुळे कोरेगाव-भीमाची दंगल झालेली नाही. कोपर्डी येथील घटना, अ‍ॅट्रॉसिटीचा गैरवापर व वढू गावातील प्रकरणाचा परिपाक म्हणजेच कोरेगाव भीमा येथील घडलेली घटना आहे, असे मत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे व्यक्त केले. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार वर्धापन दिन समारंभास उपस्थित राहण्यासाठी रामदास आठवले हे रविवारी औरंगाबादेत आले. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, दलित-मराठा समाजामध्ये दरी निर्माण करण्याचे काही मराठा व हिंदुत्ववादी संघटनांचे मोठे षङ्यंत्र असून, या घटनेचे बोलविते धनी कोण आहेत, याचा शोध घेऊन त्यांना पोलिसांनी अटक करावी. यासंदर्भात आपण मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे. या घटनेच्या दुसर्‍या दिवशी राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली. माझाही पक्ष बंदमध्ये सहभागी होता. माझ्याही अनेक कार्यकर्त्यांना अटक झाली आहे. 

पोलिसांनी धरपकड करून दलित कार्यकर्त्यांविरुद्ध काही ठिकाणी ३०७, तर काही ठिकाणी ३९५ कलमांन्वये दरोड्याचे गुन्हे दाखल केले आहेत. हे गुन्हे मागे घ्यावेत. दगडफेक करताना जे कार्यकर्ते फुटेजमध्ये दिसत असतील त्यांच्यावरच कारवाई करावी, याबद्दलही आपण मुख्यमंत्र्यांसोबत बोललो आहे. मराठा समाजाने मात्र अतिशय संयमाची भूमिका घेतली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. दलित व मराठा समाजाने सोबत राहून गावगाडा हाकला पाहिजे. या दोन समाजात दरी निर्माण होणे, हे परवडणारे नाही. मराठा समाजाने अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होतो, अशी चुकीची भावना ठेवू नये. या कायद्याचा गैरवापर रोखण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. मराठा समाजाच्या तरुणांनीही कोणाच्या भयकाव्यात येऊ नये. 

जिग्नेश यांनी आंबेडकरवादी बनावे

जिग्नेश मेवानी यांच्यासंदर्भात आठवले म्हणाले की, जिग्नेश यांनी अगोदर आंबेडकरवादी बनावे. खरा आंबेडकरवादी कार्यकर्ता ‘लाल सलाम’ कधीच म्हणत नाहीत. नक्षलवाद्यांच्या चळवळीबद्दल बोलताना ते म्हणाले, नक्षलवाद्यांचा मोठा त्याग आहे; पण त्यांच्या चळवळीत हिंसा आहे. ते आम्हाला मान्य नाही. ते आदिवासी समाजाला न्याय मिळण्यासाठी त्यांना मुख्य प्रवाहात यावे लागेल. 

‘एक विचार-एक मंच’ तकलादूविद्यापीठ नामविस्तार वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक युवकांनी आंबेडकरी पक्ष-संघटनांच्या वेगवेगळ्या व्यासपीठाला विरोध केला आहे. एकाच व्यासपीठावर दलित नेत्यांनी यावे, असा त्यांचा आग्रह आहे. एक दिवस एका स्टेजवर येण्याने ऐक्य होणार आहे का, असा प्रश्न रामदास आठवले यांनी उपस्थित केला. ऐक्य तकलादू नसावे. यासाठी अगोदर ऐक्याचा फार्म्युला तयार करायला पाहिजे. समाजाने एकत्र यायला हवे. नेते फुटले तरी समाजाने फुटू नये. कार्यकर्ते एकत्र आले, तर नेत्यांनाही एकत्र यावेच लागेल, असे ते म्हणाले.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेAurangabadऔरंगाबादBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचार