शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "रवींद्र वायकर यांचा विजय खरा नाही, विजयी करणारा फोन पोलीस स्टेशनमधून बदलण्याचा प्रयत्न"
2
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
3
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
4
अनंत अंबानी-राधिक मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या
5
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
6
'फादर्स डे' निमित्त जिनिलीयाने लिहिलेली पोस्ट वाचून रितेश देशमुख म्हणाला - 'बायको तुझ्याशिवाय...'
7
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
8
नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू
9
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
10
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
11
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
12
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
13
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
14
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?
15
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
16
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
17
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
18
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
19
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
20
वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण

कंधारात मिरची-कांद्याचा वांदा

By admin | Published: July 21, 2014 11:38 PM

कंधार : दरवर्षी आषाढ महिन्यात भाजीपाल्याचे भाव घसरतात, परंतु दीड महिना संपत आला तरीही पावसाचा मागमूस नाही़ मोठ्या लागवडीअभावी भाजीपाल्याचे भाव महिन्यात दुप्पट झाले आहेत़

कंधार : दरवर्षी आषाढ महिन्यात भाजीपाल्याचे भाव घसरतात, परंतु दीड महिना संपत आला तरीही पावसाचा मागमूस नाही़ मोठ्या लागवडीअभावी भाजीपाल्याचे भाव महिन्यात दुप्पट झाले आहेत़ हिरवी मिरची तिखट अन् कांदा डोळ्यात पाणी आणत असल्याचे चित्र आहे़मागील वर्षी विक्रमी पावसाची नोंद झाली़ नदी-नाले, तलावात मुबलक जलसाठा पावसाळ्यात होता़ उपलब्ध जलसाठ्याने खरीप हंगामातील कसर भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी रबी व भाजीपाल्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली़ परंतु निसर्गाच्या लहरीपणा रबीला आडवा आला़ गारपिटीने शिवारात गारांचे ढीग साचले़ त्याचा फटका जवळपास ६० गावांना बसला़ शिवारातील हिरव्या पिकाकडे पाहून आनंद व्यक्त करणाऱ्या शेतकऱ्यांना दीर्घकाळ आनंद लुटता आला नाही़ त्यापूर्वी भाजीपाला लागवड केलेल्या शेतकऱ्यांनाही अपेक्षित भाव मिळाला नाही़ सहा महिन्यांपूर्वी उपलब्ध जलसाठ्याने लागवड केलेला भाजीपाला मुबलक होता़ त्यामुळे ग्राहकांची मोठी चंगळ झाली़ परंतु शेतकऱ्यांना मात्र याचा मोठा भूर्दंड सहन करावा लागला़ आता मात्र उलटे चित्र झाले आहे़फळभाज्या व पालेभाज्यात जीवनसत्वे असल्याने नागरिक आहारात त्याचा वापर करतात़ आणि आपले आरोग्य अबाधित ठेवण्याचा सातत्याने प्रयत्न करतात़ शेतकऱ्यांना लागवड परवडली पाहिजे, आणि उत्पन्न अपेक्षित मिळाले पाहिजे़ तसेच नागरिकांनाही खरेदीचा भाव परवडून आरोग्य चांगले ठेवणे आवश्यक असते़ परंतु याचा ताळेबंद निसर्ग लहरीपणाने कमालीचा बिघडत चालला आहे़ कधी शेतकरी आर्थिक गर्तेत जात आहे़ तर कधी ग्राहकाच्या खिशाला मोठी कातर लागत आहे़आषाढ महिना भर पावसाचा असतो़ पावसाळ्यात भाजीपाला स्वस्त मिळतो, असा संकेत दरवर्षी असतो़ त्याला निसर्गाने छेद दिला असल्याचा अनुभव सर्वांना येत आहे़ आगामी काळात पावसाची हजेरी यावरच भाजीपाला उत्पादन व भाव अवलंबून आहे़ (वार्ताहर)माहुरातही भाजीपाला कडाडलाश्रीक्षेत्र माहूर : पाऊस वेळेवर न झाल्याने पावसाळी भाजीपाला अभावी भाजीपाल्यांचे दर गगनाला भिडल्याने दोन रुपये किलोने मिळणारे टमाटे १२० रुपये किलोवर गेल्याने सोमवारी माहूरच्या बाजारात शुकशुकाट तर मजुरी नसल्याने मजुरांवर उपासमारीची वेळ आली असून शेतातील बांधावर व गावातील पडीक जागेत उगवणाऱ्या तरोट्याची भाजी खाण्याची वेळ आली असून सर्वच भाजीपाला जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढल्याने नोकरदारांचे आर्थिक बजेट कोलमडले़सोमवारी माहूरच्या बाजारात पाऊस न झाल्याने अत्यल्प भाजीपाला आला होता़ त्यात घराचे आर्थिक बजट सांभाळणाऱ्या महिला वर्गाची भाजी खरेदीसाठी गर्दी तर पवित्र रमजान महिना असल्याने मुस्लिम बांधवांनीही प्रचंड गर्दी केली होती़ भाजीपाला कमी आल्याने त्यातच भाजीपाला व इतर वस्तूंचे भाव प्रचंड वाढल्याने किरकोळ विक्रीत टमाटे १२० रुपये किलो, आलू ४० रुपये किलो, हिरवी मिरची ८० रुपये, फूलकोबी १२० रुपये, अद्रक २०० रुपये, सांभार १०० रुपये, मेथीची भाजी १०० रुपये किलोप्रमाणे विक्री होत होता़ इतर भाजीपाला दुपारी १२ वाजेपर्यंत संपला़ तर सुकामेवा, टरबूज, पेंडखजूर व इतर साहित्याची प्रमाणाबाहेर दर झाल्याने ग्राहकांकडून खरेदी कमी तर दरांची चौकशीच अधिक होताना दिसल्याने व्यापारीही वैतागलेल्या अवस्थेत तर ग्राहक संतापलेल्या अवस्थेत दिसत होते़ माहूर तालुक्यात जुलै महिना संपत आला तरीही पेरणीलायक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांनी केलेली तिबार पेरणीही मातीत मिसळल्याने व कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यापासून वेतन न आल्याने मजुरांनाही रोजगार नाही़ त्यातल्या त्यात भाजीपाल्यासह जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडल्याने आर्थिक परिस्थितीत सुदृढ असलेल्या नागरिकांनाही तान सहन करावा लागत असल्याने नागरिकांतून चिंता व्यक्त आहे. (वार्ताहर)सहा महिन्यापूर्वीचे जुलै २०१४भाव मधील भावकांदा ४० रूपये किलो ८० रुपयेहिरवी मिरची ४०-६० ८० ते १०० दोडके ४० ते ५० रू़ ८० ते ९०मेथी ३० ते ४० रू़ ८० ते १०० कोथींबीर ३० ते ४० रू़ १८० ते २००वांगे २० ते ३० रु़किलो ४० ते ५०टमाटे २० ते ३० रु़कि़ ८० रू़कि़