शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

कंधारात मिरची-कांद्याचा वांदा

By admin | Updated: July 22, 2014 00:18 IST

कंधार : दरवर्षी आषाढ महिन्यात भाजीपाल्याचे भाव घसरतात, परंतु दीड महिना संपत आला तरीही पावसाचा मागमूस नाही़ मोठ्या लागवडीअभावी भाजीपाल्याचे भाव महिन्यात दुप्पट झाले आहेत़

कंधार : दरवर्षी आषाढ महिन्यात भाजीपाल्याचे भाव घसरतात, परंतु दीड महिना संपत आला तरीही पावसाचा मागमूस नाही़ मोठ्या लागवडीअभावी भाजीपाल्याचे भाव महिन्यात दुप्पट झाले आहेत़ हिरवी मिरची तिखट अन् कांदा डोळ्यात पाणी आणत असल्याचे चित्र आहे़मागील वर्षी विक्रमी पावसाची नोंद झाली़ नदी-नाले, तलावात मुबलक जलसाठा पावसाळ्यात होता़ उपलब्ध जलसाठ्याने खरीप हंगामातील कसर भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी रबी व भाजीपाल्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली़ परंतु निसर्गाच्या लहरीपणा रबीला आडवा आला़ गारपिटीने शिवारात गारांचे ढीग साचले़ त्याचा फटका जवळपास ६० गावांना बसला़ शिवारातील हिरव्या पिकाकडे पाहून आनंद व्यक्त करणाऱ्या शेतकऱ्यांना दीर्घकाळ आनंद लुटता आला नाही़ त्यापूर्वी भाजीपाला लागवड केलेल्या शेतकऱ्यांनाही अपेक्षित भाव मिळाला नाही़ सहा महिन्यांपूर्वी उपलब्ध जलसाठ्याने लागवड केलेला भाजीपाला मुबलक होता़ त्यामुळे ग्राहकांची मोठी चंगळ झाली़ परंतु शेतकऱ्यांना मात्र याचा मोठा भूर्दंड सहन करावा लागला़ आता मात्र उलटे चित्र झाले आहे़फळभाज्या व पालेभाज्यात जीवनसत्वे असल्याने नागरिक आहारात त्याचा वापर करतात़ आणि आपले आरोग्य अबाधित ठेवण्याचा सातत्याने प्रयत्न करतात़ शेतकऱ्यांना लागवड परवडली पाहिजे, आणि उत्पन्न अपेक्षित मिळाले पाहिजे़ तसेच नागरिकांनाही खरेदीचा भाव परवडून आरोग्य चांगले ठेवणे आवश्यक असते़ परंतु याचा ताळेबंद निसर्ग लहरीपणाने कमालीचा बिघडत चालला आहे़ कधी शेतकरी आर्थिक गर्तेत जात आहे़ तर कधी ग्राहकाच्या खिशाला मोठी कातर लागत आहे़आषाढ महिना भर पावसाचा असतो़ पावसाळ्यात भाजीपाला स्वस्त मिळतो, असा संकेत दरवर्षी असतो़ त्याला निसर्गाने छेद दिला असल्याचा अनुभव सर्वांना येत आहे़ आगामी काळात पावसाची हजेरी यावरच भाजीपाला उत्पादन व भाव अवलंबून आहे़ (वार्ताहर)माहुरातही भाजीपाला कडाडलाश्रीक्षेत्र माहूर : पाऊस वेळेवर न झाल्याने पावसाळी भाजीपाला अभावी भाजीपाल्यांचे दर गगनाला भिडल्याने दोन रुपये किलोने मिळणारे टमाटे १२० रुपये किलोवर गेल्याने सोमवारी माहूरच्या बाजारात शुकशुकाट तर मजुरी नसल्याने मजुरांवर उपासमारीची वेळ आली असून शेतातील बांधावर व गावातील पडीक जागेत उगवणाऱ्या तरोट्याची भाजी खाण्याची वेळ आली असून सर्वच भाजीपाला जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढल्याने नोकरदारांचे आर्थिक बजेट कोलमडले़सोमवारी माहूरच्या बाजारात पाऊस न झाल्याने अत्यल्प भाजीपाला आला होता़ त्यात घराचे आर्थिक बजट सांभाळणाऱ्या महिला वर्गाची भाजी खरेदीसाठी गर्दी तर पवित्र रमजान महिना असल्याने मुस्लिम बांधवांनीही प्रचंड गर्दी केली होती़ भाजीपाला कमी आल्याने त्यातच भाजीपाला व इतर वस्तूंचे भाव प्रचंड वाढल्याने किरकोळ विक्रीत टमाटे १२० रुपये किलो, आलू ४० रुपये किलो, हिरवी मिरची ८० रुपये, फूलकोबी १२० रुपये, अद्रक २०० रुपये, सांभार १०० रुपये, मेथीची भाजी १०० रुपये किलोप्रमाणे विक्री होत होता़ इतर भाजीपाला दुपारी १२ वाजेपर्यंत संपला़ तर सुकामेवा, टरबूज, पेंडखजूर व इतर साहित्याची प्रमाणाबाहेर दर झाल्याने ग्राहकांकडून खरेदी कमी तर दरांची चौकशीच अधिक होताना दिसल्याने व्यापारीही वैतागलेल्या अवस्थेत तर ग्राहक संतापलेल्या अवस्थेत दिसत होते़ माहूर तालुक्यात जुलै महिना संपत आला तरीही पेरणीलायक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांनी केलेली तिबार पेरणीही मातीत मिसळल्याने व कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यापासून वेतन न आल्याने मजुरांनाही रोजगार नाही़ त्यातल्या त्यात भाजीपाल्यासह जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडल्याने आर्थिक परिस्थितीत सुदृढ असलेल्या नागरिकांनाही तान सहन करावा लागत असल्याने नागरिकांतून चिंता व्यक्त आहे. (वार्ताहर)सहा महिन्यापूर्वीचे जुलै २०१४भाव मधील भावकांदा ४० रूपये किलो ८० रुपयेहिरवी मिरची ४०-६० ८० ते १०० दोडके ४० ते ५० रू़ ८० ते ९०मेथी ३० ते ४० रू़ ८० ते १०० कोथींबीर ३० ते ४० रू़ १८० ते २००वांगे २० ते ३० रु़किलो ४० ते ५०टमाटे २० ते ३० रु़कि़ ८० रू़कि़