शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जगप्रसिद्ध कलेच्या कुशीत वसलेय शिवछत्रपती घडविणारे कलातीर्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2022 19:10 IST

 खुलताबादपासून थंड हवेचे ठिकाण म्हैसमाळकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन किलोमीटर अंतरावर अवतरलेय हे कलातीर्थ. 

- राम शिनगारे

औरंगाबाद : जगप्रसिद्ध शिल्प वेरूळ लेणीच्या कुशीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महादेव, गौतम बुद्धांसह थोरामोठ्यांची शेकडो शिल्पे एक कलासक्त दाम्पत्य मागील अनेक वर्षांपासून घडविते आहे. त्यांच्या मुशीतून तयार झालेली शिल्पे औरंगाबादपासून दिल्लीपर्यंतच्या भारतीयांना प्रेरणा देत आहेत. नरेंद्रसिंग साळुंके आणि स्वाती साळुंके असे या कलाप्रेमी दाम्पत्याचे नाव.

खुलताबादपासून थंड हवेचे ठिकाण म्हैसमाळकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन किलोमीटर अंतरावर अवतरलेय हे कलातीर्थ. ना कोणताही नामफलक ना ओळख पटावी अशी खूणगाठ. अशा ठिकाणी शतकुंडा आर्ट ॲण्ड मेटल फाउंड्री उभी आहे. साळुंके दाम्पत्य तेथेच निवास करते. कोणत्याही प्रकारच्या मशनरी न वापरता महाकाय असे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह थोरांचे शिल्प ते लिलया साकारतात. कला संचालनालयाची मान्यता असल्याशिवाय महापुरुषांचे शिल्प ते बनवित नाहीत. या दाम्पत्याने कलेच्या क्षेत्रातील उच्चशिक्षण घेतले असून, त्यांची मोठी मुलगी मुंबईतील नामांकित जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये कलेचेच शिक्षण घेत आहे.

असे बनवितात शिल्पछत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह इतर शिल्पे तयार करण्यापूर्वी प्रारंभी मातीकाम (क्ले) करून शिल्प बनविले जाते. त्याचे मॉडेल फायबरमध्ये रूपांतरीत होते. त्यानंतर मेणाची कॉपी मोल्ड भाजून मेटल टाकले जाते. त्यानंतर ब्रान्झ मेंटलचे शिल्प घासून-पुसून आकर्षकपणे तयार केले जाते. एका शिल्पासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी लागतो. निसर्गाच्या सान्निध्यात ध्यानस्थ होऊन शिल्प बनविण्याचा आविष्कार अहोरात्र सुरू आहे.

विद्यापीठातील शिल्पाचे काम अंतिम टप्प्यातडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यात येणार आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. बुलडाणा येथील छत्रपतींच्या शिल्पाचे काम सुरू आहे. याशिवाय या दाम्पत्याने पैठण, गंगापूर, छत्रपती स्मारक, रायगड आणि लातूर जिल्ह्यात छत्रपतींची २६ शिल्पे तयार करून दिली आहेत. गंगापूर नगरपालिकेतर्फे बसविण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याही शिल्पाचे काम सुरू आहे. औरंगाबाद, नाशिक विमानतळ, औरंगाबादेतील कॅन्सर हॉस्पिटल, तापडिया, संत तुकाराम, बाळासाहेब ठाकरे स्मारक, समृद्धी महामार्ग, दिल्लीतील विविध म्युरल्स, कलाकुसर आदी कामे या दाम्पत्याने केली आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज