शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

न्यायपालिकेचा वेळ खर्ची घातल्याने चौघांना ‘भुर्दंड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 19:16 IST

‘कॉस्ट’ म्हणून पोलीस कल्याण निधीमध्ये जमा करण्याचा आदेश दिला. 

औरंगाबाद :  आधी खुलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून नंतर उभय पक्षांनी तडजोड केली. त्यानंतर ‘तो’ गुन्हा रद्द करण्यासाठी खंडपीठात धाव घेतली. अशा प्रकारे गुन्हा दाखल झाल्यापासून पोलीस आणि न्यायपालिकेचा बहुमूल्य वेळ खर्ची घातल्यामुळे औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस.एस. शिंदे आणि न्या. आर.जी. अवचट यांनी चार आरोपींना प्रत्येकी तीन हजारप्रमाणे एकूण बारा हजार रुपये ‘कॉस्ट’ म्हणून पोलीस कल्याण निधीमध्ये जमा करण्याचा आदेश दिला. 

खर्डी येथील मुरलीधर पुंजाजी मातकर (७०) यांना आरोपींनी शेताच्या वादातून मारहाण केली होती. त्यांनी यासंदर्भात खुलताबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी रामनाथ कोंडिबा मातकर याच्यासह इतर तिघांनी सदर गुन्हा रद्द व्हावा यासाठी खंडपीठात धाव घेतली. आरोपी आणि फिर्यादी यांनी आपसात तडजोड केली आहे. त्यामुळे गुन्हा रद्द करावा, अशी विनंती आरोपींनी केली. सुनावणी अंती खंडपीठाने आरोपींची गुन्हा रद्द करण्याची विनंती मान्य केली. मात्र, तपास यंत्रणा आणि न्यायपालिकेचा वेळ खर्ची घातल्यामुळे चौघा आरोपींना प्रत्येकी तीन हजार याप्रमाणे एकूण १२ हजार रुपये पोलीस कल्याण निधीसाठी दोन आठवड्यांत ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेश दिले. त्यानंतर गुन्हा रद्द करण्यात आला. सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता संदीप यशवंत महाजन यांनी बाजू मांडली.

टॅग्स :Courtन्यायालयPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी