शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
4
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
5
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
6
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
7
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
8
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
9
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...
10
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
11
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
12
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
13
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
14
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
15
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
16
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
17
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
18
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
19
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  

जायकवाडीची पाणीपातळी जोत्याखाली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 00:29 IST

चिंता : धरणात केवळ २.११ टक्केच जलसाठा शिल्लक; झपाट्याने पाण्याचे बाष्पीभवन

संजय जाधवपैठण : तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने जायकवाडी जलाशयातील बाष्पीभवन प्रक्रियेत वाढ झाली आहे. सरासरी दरवर्षी बाष्पीभवन प्रक्रियेत जवळपास ११ टीएमसी पाण्याचा अपव्यय होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. बाष्पीभवनाने सर्वाधिक पाण्याची तूट होणारा जायकवाडी हा राज्यातील एकमेव प्रकल्प असून, जायकवाडीतील जलसाठा आज रोजी जोत्याखाली गेल्याने बाष्पीभवन प्रक्रियेने पाण्याची होणारी तूट चिंतेचा विषय बनला आहे.जायकवाडी धरणात आज रोजी केवळ २.११ टक्के जलसाठा शिल्लक आहे. धरणात ४५.९३९ दलघमी म्हणजेच १.६२ टीएमसी उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. धरणाची पाणीपातळी सोमवारी रात्री ८ वाजता १४९५.४७ फूट एवढी होती. १४९४.५० फुटानंतर धरणाचा मृतसाठा सुरू होतो. मृतसाठ्यामध्ये जाण्यासाठी आकडेवारीनुसार आज धरणामध्ये एक फूट पाणीपातळी शिल्लक असली तरी धरणाची पाणीपातळी आजच जोत्याखाली गेली असल्याचे दिसून आले. येत्या १० दिवसांत ‘डेडस्टॉक’मधून पाणी उचलण्याची वेळ येणार आहे. पाच वर्षांपूर्वी २०१४ मध्ये मृतसाठ्यातून (-१३ टक्के) पाणी उचलावे लागले होते. यंदा मात्र २०१४ पेक्षा भीषण परिस्थिती असून, मृतसाठ्यातून धरणावर अवलंबून असलेल्या सर्वांचे भागेल का, याचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.पाणीपुरवठ्यापेक्षा बाष्पीभवन जास्तजायकवाडी धरणातून सर्व पाणीपुरवठा योजनेसह औद्योगिक वसाहतींंना मिळून होणाऱ्या पाणीपुरवठ्यापेक्षा बाष्पीभवन प्रक्रियेने सहापट जास्त पाणी नष्ट होत आहे. जलाशयातील पाणी अशा पद्धतीने वाया जाऊ नये म्हणून बाष्पीभवन प्रक्रियेची गती मंदावण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. बाष्पीभवन प्रकियेत येथून पुढे सतत वाढ होणार हेही निश्चित आहे.दरम्यान, यंदा धरणातील जलसाठा जोत्याखाली गेल्याने काटकसरीने पाणी वापरण्याची गरज आहे. येणाऱ्या हंगामात प्रत्यक्षात पाऊस कसा राहील, हे सांगता येत नसल्याने धरणात असलेला जलसाठा भविष्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त ठरणार आहे. सध्या धरणाच्या डाव्या कालव्यातून सिंचनासाठी १२०० क्युसेक, तर उजव्या कालव्यातून ६०० क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे.पाचपट बाष्पीभवनजायकवाडी धरणातून औरंगाबाद, जालना, पाथर्डी, अंबड व विविध गावांसह औरंगाबाद, वाळूूज, पैठण, शेंद्रा आदी औद्योगिक वसाहतींसाठी दररोज एकूण ०.२८५ दलघमी एवढा पाणीपुरवठा केला जातो. आजच्या तारखेला बाष्पीभवन प्रक्रियेत याच्या पाचपट पाणी नष्ट होत आहे.राज्यात सर्वाधिक बाष्पीभवन होणारा प्रकल्पजायकवाडी जलाशयाचा पानपसारा ३५,००० हेक्टर अशा विस्तीर्ण क्षेत्रावर पसरलेला आहे. शिवाय या जलाशयाची खोली कमी आहे. यामुळे सूर्यकिरणे या जलाशयात खोलवर जातात व विस्तीर्ण क्षेत्र असल्याने या जलाशयातील बाष्पीभवनाचे प्रमाण इतर धरणांतील जलाशयाच्या मानाने जास्त होते, असे जायकवाडीचे अधीक्षक अभियंता संजय भर्गोदेव यांनी सांगितले. जायकवाडी हे नैसर्गिक बलस्थान असलेल्या जागेवरील धरण नसून ते मानवनिर्मित जागेवरील धरण असल्याने या धरणाची खोली कमी व क्षेत्र जास्त पसरलेले आहे. राज्यातील इतर धरणांची खोली जास्त व क्षेत्र कमी असल्याने तेथील जलाशयात बाष्पीभवन प्रक्रिया कमी होते, असे माजी कालवा सल्लागार विठ्ठलराव थोरात यांनी सांगितले.मार्च ते मेदरम्यान बाष्पीभवन जास्तजायकवाडी धरणातून दररोज जेवढे पाणी पिण्यासाठी व औद्योगिक वापरासाठी लागते त्याच्या पाचपट सध्या बाष्पीभवन होत आहे. मार्च ते मे दरम्यान तापमानात मोठी वाढ होऊन हे बाष्पीभवन आठपटीने वाढते. धरणातून पाण्यासाठी व औद्योगिक वापरासाठी सहा दिवस जेवढे पाणी लागते, तेवढे पाणी एका दिवसात बाष्पीभवन प्रक्रियेत निघून जात असल्याचे गेल्या काही वर्षांतील बाष्पीभवनाच्या नोंदीवरून समोर आले आहे. सरासरी १.५ दलघमी पाणी दररोज बाष्पीभवन प्रक्रियेत कमी होणार आहे, हे गृहीत धरल्यास या सरासरीनुसार मार्च ते मे या ९२ दिवसांत १३८ दलघमी (४.८७ टीएमसी) पाणी केवळ बाष्पीभवन प्रक्रियेत निघून जाणार आहे.बाष्पीभवन प्रक्रियेला प्रतिबंध करणे अवघडबाष्पीभवन प्रक्रियेची गती कमी करण्यासाठी रासायनिक केमिकल फवारण्याचा अवलंब केला जातो; परंतु जायकवाडीचा पानपसारा हा ३५ हजार हेक्टर असा विस्तीर्ण असल्याने या जलाशयात अशी उपाययोजना करणे अवघड असल्याचे अधीक्षक अभियंता संजय भर्गोदेव यांनी सांगितले.सोलार प्लेटचा वापर?जायकवाडी धरणातून बाष्पीभवन प्रक्रियेने जलाशयातील पाण्याची होणारी हानी लक्षात घेता काय करता येईल, यावर जायकवाडी प्रशासन गेल्या चार वर्षांपासून विचार करीत आहे. मराठवाडा विकास महामंडळाच्या बैठकीत जलाशयाच्या विस्तीर्ण पाणपसाºयावर तरंगत्या सोलार प्लेट टाकून बाष्पीभवन प्रक्रियेचा वेग घटवता येईल, यावर विचारविनिमय झाला होता; मात्र तरंगत्या सोलारचा प्रयोग प्रत्यक्षात शक्य नसल्याचे समोर आल्याने याबाबत काहीच निर्णय झाला नसल्याचे भगोर्देव यांनी सांगितले.चौकट...गेल्या सात दिवसांत झालेले बाष्पीभवन---------------------------------तारीख बाष्पीभवन (दलघमी)५/३/१९ - ०.९४७६/३/१९ - ०.८३२७/३/१९ - ०.८५७८/३/१९ - ०.९२४९/३/१९ - ०.८४९१०/३/१९ - ०.९१५११/३/१९ - ०.९२४

टॅग्स :Damधरणwater shortageपाणीकपात