शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
2
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
3
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
4
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
5
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
6
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
8
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
9
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
10
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
11
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
12
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
13
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
14
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
15
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
16
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
17
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
18
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
19
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
20
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

४४ वर्षांत पहिल्यांदाच होणार जायकवाडी धरणाची दुरुस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 13:34 IST

१९७६ साली धरण झाले बांधून; १०५ टीएमसी क्षमता

ठळक मुद्देकेंद्राच्या यादीत झाला समावेश ४० कोटींचा निधी ड्रीप योजनेतून मिळणार

- विकास राऊत

औरंगाबाद :  नाथसागराची (जायकवाडी धरण) ४४ वर्षांत पहिल्यांदाच दुरुस्ती होणार असून, जागतिक बँकेच्या प्रकल्पांतर्गत केंद्र शासनाच्या यादीत धरणाचा समावेश झाला असून, ४० कोटी रुपयांचा निधी ड्रीप-२ (डॅम रिहॅबिलेशन अ‍ॅण्ड इम्प्रुव्हमेंट प्रोजेक्ट-२) या योजनेतून धरणासाठी टप्प्याटप्प्याने मिळणार आहे. या योजनेचा पहिला टप्पा झाला त्यावेळी धरणाचा समावेश झाला नव्हता. १४७ पैकी राज्यातील ३० प्रकल्पांची ड्रीप-२ मध्ये निवड झाली आहे. त्यामध्ये जायकवाडी धरणाचा समावेश करण्यात आला आहे. 

सीसीटीव्ही, दरवाजे दुरुस्ती, सुरक्षा टॉवर, संरक्षक कुंपण, सिव्हिल दुरुस्ती, वीजपुरवठा, आयबी दुरुस्तीच्या कामांसाठी ४० कोटींचा निधी केंद्र शासन जागतिक बँक प्रकल्पातून देणार आहे. सोबत संत ज्ञानेश्वर उद्यान सुशोभीकरणासाठीदेखील ३२ कोटींचा निधी मिळण्याचा आराखडा तयार करण्यात येत आहे, असे  जायकवाडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले.

१९७६ साली जायकवाडी धरण बांधून पूर्ण झाले. साधारणत: १०५ टीएमसी पाणी साठविण्याची धरणात क्षमता आहे. धरणाला ४४ वर्षे झाल्यामुळे अनेक दुरुस्त्यांची कामे करण्याची गरज आहे. या काळात सर्वाधिक वेळा दरवाजांचे आॅपरेशन होण्याचा योग २०१९ च्या पावसाळ्यात आला. धरण १०० टक्के भरल्यानंतर अंदाजे ५५ ते ६० टीएमसी पाण्याचा विसर्ग गेल्या वर्षी करण्यात आला. धरणावरील वीजनिर्मितीचे सर्व रेकॉर्ड २०१९-२०२० या काळात मोडले. गेल्या पावसाळ्यात धरणात एकूण क्षमतेच्या तुलनेत दीडपट पाणी आले. त्यातून पाण्याचा विसर्ग नियमित होत राहिला. 

दरवाजांची दुरुस्ती महत्त्वाची४४ वर्षांत धरणांवरील दरवाजांची तात्पुरती डागडुजी करण्यात आलेली आहे; परंतु आता आॅईलिंग, ग्रीसिंगसह मेकॅनिकल कामे करावी लागणार आहेत. ४ कोटी रुपयांचा निधी दरवाजांच्या दुरुस्तीवर खर्च करण्यात येणार आहे. गेल्या पावसाळ्यात जायकवाडी धरणाचे दरवाजे ४६ दिवस खुले करण्यात आले. धरणाला एकूण २७ दरवाजे असून, १ ते ९ क्रमांकाचे दरवाजे उघडलेले नव्हते. १० ते २७ क्रमांकांपर्यंतचे १६ दरवाजे उघडण्यात आले होते. धरणाच्या ‘गेट आॅपरेशन’चा रेकॉर्ड पहिल्यांदाच झाला आहे. आजवर ५ ते १० वेळा ‘गेट आॅपरेशन’चा रेकॉर्ड आहे. १०० पेक्षा अधिक वेळा ‘गेट आॅपरेशन’ मागच्या पावसाळ्यात झाले. यावर्षी चांगला पाऊस असल्याचे हवामान खात्याचे भाकीत आहे, त्यामुळे दरवाजांची किरकोळ दुरुस्ती सध्या सुरू, असल्याचे अभियंता काळे यांनी सांगितले. 

अर्ध्या मीटरने उंची वाढविणारधरणाची पाण्याच्या ‘टॉप लेव्हल’वरून अर्धा मीटर उंची वाढविण्याचे ड्रीप योजनेत म्हटले आहे. साधारणत: ५० सेंटीमीटर, ३० सेंटीमीटर आणि २० सेंटीमीटर या मापात १० कि.मी.पर्यंत धरणाचा ‘टॉप लेव्हल’ स्तर वाढविण्यात येणार आहे. सोबतच स्थापत्य अभियांत्रिकीची काही कामे आहेत. धरण सुरक्षेच्या अनुषंगाने अनेक कामांचा यामध्ये समावेश आहे. डीपीआरचे काम अंतिम टप्प्यात असून, निधीबाबत निर्णय होताच काम सुरू होणे शक्य होणार असल्याचे  काळे यांनी सांगितले. 

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबादfundsनिधी