शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
3
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
4
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
5
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
6
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
7
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
8
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
9
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
10
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
11
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
12
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
13
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
14
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
15
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
16
Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड!
17
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
18
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
19
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
20
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...

४४ वर्षांत पहिल्यांदाच होणार जायकवाडी धरणाची दुरुस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 13:34 IST

१९७६ साली धरण झाले बांधून; १०५ टीएमसी क्षमता

ठळक मुद्देकेंद्राच्या यादीत झाला समावेश ४० कोटींचा निधी ड्रीप योजनेतून मिळणार

- विकास राऊत

औरंगाबाद :  नाथसागराची (जायकवाडी धरण) ४४ वर्षांत पहिल्यांदाच दुरुस्ती होणार असून, जागतिक बँकेच्या प्रकल्पांतर्गत केंद्र शासनाच्या यादीत धरणाचा समावेश झाला असून, ४० कोटी रुपयांचा निधी ड्रीप-२ (डॅम रिहॅबिलेशन अ‍ॅण्ड इम्प्रुव्हमेंट प्रोजेक्ट-२) या योजनेतून धरणासाठी टप्प्याटप्प्याने मिळणार आहे. या योजनेचा पहिला टप्पा झाला त्यावेळी धरणाचा समावेश झाला नव्हता. १४७ पैकी राज्यातील ३० प्रकल्पांची ड्रीप-२ मध्ये निवड झाली आहे. त्यामध्ये जायकवाडी धरणाचा समावेश करण्यात आला आहे. 

सीसीटीव्ही, दरवाजे दुरुस्ती, सुरक्षा टॉवर, संरक्षक कुंपण, सिव्हिल दुरुस्ती, वीजपुरवठा, आयबी दुरुस्तीच्या कामांसाठी ४० कोटींचा निधी केंद्र शासन जागतिक बँक प्रकल्पातून देणार आहे. सोबत संत ज्ञानेश्वर उद्यान सुशोभीकरणासाठीदेखील ३२ कोटींचा निधी मिळण्याचा आराखडा तयार करण्यात येत आहे, असे  जायकवाडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले.

१९७६ साली जायकवाडी धरण बांधून पूर्ण झाले. साधारणत: १०५ टीएमसी पाणी साठविण्याची धरणात क्षमता आहे. धरणाला ४४ वर्षे झाल्यामुळे अनेक दुरुस्त्यांची कामे करण्याची गरज आहे. या काळात सर्वाधिक वेळा दरवाजांचे आॅपरेशन होण्याचा योग २०१९ च्या पावसाळ्यात आला. धरण १०० टक्के भरल्यानंतर अंदाजे ५५ ते ६० टीएमसी पाण्याचा विसर्ग गेल्या वर्षी करण्यात आला. धरणावरील वीजनिर्मितीचे सर्व रेकॉर्ड २०१९-२०२० या काळात मोडले. गेल्या पावसाळ्यात धरणात एकूण क्षमतेच्या तुलनेत दीडपट पाणी आले. त्यातून पाण्याचा विसर्ग नियमित होत राहिला. 

दरवाजांची दुरुस्ती महत्त्वाची४४ वर्षांत धरणांवरील दरवाजांची तात्पुरती डागडुजी करण्यात आलेली आहे; परंतु आता आॅईलिंग, ग्रीसिंगसह मेकॅनिकल कामे करावी लागणार आहेत. ४ कोटी रुपयांचा निधी दरवाजांच्या दुरुस्तीवर खर्च करण्यात येणार आहे. गेल्या पावसाळ्यात जायकवाडी धरणाचे दरवाजे ४६ दिवस खुले करण्यात आले. धरणाला एकूण २७ दरवाजे असून, १ ते ९ क्रमांकाचे दरवाजे उघडलेले नव्हते. १० ते २७ क्रमांकांपर्यंतचे १६ दरवाजे उघडण्यात आले होते. धरणाच्या ‘गेट आॅपरेशन’चा रेकॉर्ड पहिल्यांदाच झाला आहे. आजवर ५ ते १० वेळा ‘गेट आॅपरेशन’चा रेकॉर्ड आहे. १०० पेक्षा अधिक वेळा ‘गेट आॅपरेशन’ मागच्या पावसाळ्यात झाले. यावर्षी चांगला पाऊस असल्याचे हवामान खात्याचे भाकीत आहे, त्यामुळे दरवाजांची किरकोळ दुरुस्ती सध्या सुरू, असल्याचे अभियंता काळे यांनी सांगितले. 

अर्ध्या मीटरने उंची वाढविणारधरणाची पाण्याच्या ‘टॉप लेव्हल’वरून अर्धा मीटर उंची वाढविण्याचे ड्रीप योजनेत म्हटले आहे. साधारणत: ५० सेंटीमीटर, ३० सेंटीमीटर आणि २० सेंटीमीटर या मापात १० कि.मी.पर्यंत धरणाचा ‘टॉप लेव्हल’ स्तर वाढविण्यात येणार आहे. सोबतच स्थापत्य अभियांत्रिकीची काही कामे आहेत. धरण सुरक्षेच्या अनुषंगाने अनेक कामांचा यामध्ये समावेश आहे. डीपीआरचे काम अंतिम टप्प्यात असून, निधीबाबत निर्णय होताच काम सुरू होणे शक्य होणार असल्याचे  काळे यांनी सांगितले. 

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबादfundsनिधी