शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

जायकवाडी धरणाची दरवाजे केली बंद, 40.32 दलघमी पाण्याचा झाला गोदापात्रात विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 19:11 IST

जायकवाडी धरणात येणारी आवक नगण्य झाल्याने धरणातून होणारा विसर्ग आज दुपारी ३.३० वा पूर्णपणे बंद करण्यात आला. जायकवाडीत येणारी आवक गेल्या १२ तासापासून सारखी घटत असल्याने धरण प्रशासनाने शुक्रवारी रात्रीपासून धरणाच्या विसर्गात कपात करण्यास प्रारंभ केला होता. मात्र दुपारच्या सत्रात धरणात येणारी आवक जवळपास बंद झाल्याने तातडीने धरणातून होणारा विसर्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला व धरणाचे दरवाजे ३ ते ३.३० वाजेपर्यंत बंद करण्यात आले.

ठळक मुद्देगेल्या तीन दिवसात धरणातून ४०.३२ दलघमी (१.४२ टिएमसी) पाणी धरणातून सोडण्यात आले दु. ३ ते ३.३० दरम्यान सर्व दरवाजे बंद करण्यात आले.९८.०७% जलसाठा कायम ठेवणार.

पैठण (औरंगाबाद), दि. 23 : जायकवाडी धरणात येणारी आवक नगण्य झाल्याने धरणातून होणारा विसर्ग आज दुपारी ३.३० वा पूर्णपणे बंद करण्यात आला. जायकवाडीत येणारी आवक गेल्या १२ तासापासून सारखी घटत असल्याने धरण प्रशासनाने शुक्रवारी रात्रीपासून धरणाच्या विसर्गात कपात करण्यास प्रारंभ केला होता. मात्र दुपारच्या सत्रात धरणात येणारी आवक जवळपास बंद झाल्याने तातडीने धरणातून होणारा विसर्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला व धरणाचे दरवाजे ३ ते ३.३० वाजेपर्यंत बंद करण्यात आले. दरम्यान गेल्या तीन दिवसात धरणातून ४०.३२ दलघमी (१.४२ टिएमसी) पाणी धरणातून सोडण्यात आले आहे.

जायकवाडी धरणातून १८ दरवाजातून सुरू असलेला १५ हजार क्युसेक्स चा विसर्ग शुक्रवारी रात्री  ८ वा ५००० क्युसेक्स ने घटवून १०,००० क्युसेक्स पर्यंत घटविण्यात आला.दरम्यान आवक पुन्हा घटल्याने शनिवारी दुपारी १२.३० च्या दरम्यान १८ दरवाज्या पैकी १० दरवाजे पूर्ण बंद करून आणखी ५००० हजार क्युसेक्स क्षमतेने विसर्ग घटविण्यात आला. ३ वाजेच्या सुमारास धरणात येणारी आवक नगण्य होत धरणाची पाणीपातळी घटण्यास प्रारंभ झाला. जायकवाडी प्रशासनाच्या ही बाब लक्षात येताच धरण अभियंता अशोक चव्हाण यांनी या बाबत कार्यकारी अभियंता सी आर बनसोडे यांच्याशी चर्चा करून जायकवाडी धरणातून होणारा विसर्ग बंद करण्याचे आदेश यंत्रणेस दिले. दु. ३ ते ३.३० दरम्यान सर्व दरवाजे बंद करण्यात आले.

९८.०७% जलसाठा कायम ठेवणार.आज जायकवाडी धरणाचा जलसाठा ९८.०७% झाला आहे. १ ऑक्टोबर २०१७ पर्यंत ९८.०७% जलसाठा ठेवण्यात येणार असून त्या नंतर १००% जलसाठा धरणात राखता येणार आहे. असे धरण अभियंता अशोक चव्हाण यांनी सांगितले.

स्थानिक पाणलोट क्षेत्रावर करडी नजर.नाशिक विभागातून येणाऱ्या पाण्याचे अंतर जास्त असल्याने या पाण्याचे अनुमान काढता येतात व त्या दृष्टीने पाणी सोडण्याचे व पूर नियंत्रित करण्याचे नियोजन करता येते  परंतू जायकवाडी धरणाच्या एकूण पाणलोट क्षेत्रापैकी अहमदनगर व औरंगाबाद जिल्ह्यात ३०% पाणलोट क्षेत्र येते. या पाणलोट क्षेत्रात झालेला पाऊस काही तासातच जायकवाडी धरणात जमा होतो. यात प्रामुख्याने खाम, नारंगी, ढोर, नाणी व शिवणा नदीद्वारे गतीने

पाणी धरणात दाखल होते. या ३०% पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाली व जायकवाडी धरण पूर्ण जलसंचय पातळीजवळ असले तर तातडीने धरणातून विसर्ग करण्याचा निर्णय घ्यावा लागतो. गुरुवारी सुध्दा या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने धरणात काही तासात आवक जमा होण्यास प्रारंभ झाला व तातडीने धरणातून पाणी सोडावे लागले होते. या धरणाच्या स्थानिक पाणलोट क्षेत्रात तात्पुरती सरिता मापण केंद्रे उभारण्यात आली असून या भागातून येणाऱ्या पाण्यावर २४ तास करडी नजर ठेवण्यात येणार आहे. या मुळे या क्षेत्रात अतिवृष्टी झाली तरी नियोजन करूनच नियंत्रित विसर्ग करण्यात येईल असे कार्यकारी अभियंता सी आर बनसोडे यांनी सांगितले. 

पाऊस उघडलाजायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रात सर्वत्र पाऊस उघडला असून आता जायकवाडी धरणात आवक येण्याची शक्यता धुसर बनली आहे. यामुळे विसर्ग बंद करून धरणाच्या डाव्या कालव्यातून ९०० तर उजव्या कालव्यातून ५०० क्युसेक्स विसर्ग करण्यात येत आहे.