शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

जायकवाडी धरण @ ६६ टक्के; चार दिवसात १० टक्के पाणीसाठा वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 19:43 IST

नांदूर मधमेश्वर बंधाऱ्याच्या मुक्त पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे पाच दिवसापासून या बंधाऱ्यातून गोदावरी पात्रात विसर्ग सुरू आहे.

ठळक मुद्देदि १४ पासून नाशिक जिल्ह्यातील धरण समुहातून सोडलेले पाणी मोठ्या क्षमतेने नाथसागरातजायकवाडी धरणात २२७५७ क्युसेक्स अशी आवक सुरू आहे

पैठण : स्थानिक पाणलोट क्षेत्रातील पावसाने यंदा आत्मनिर्भर झालेल्या जायकवाडी धरणात गेल्या चार दिवसापासून नाशिकचे पाणी दाखल होत असल्याने जायकवाडी धरणाचा जलसाठा ६६ % झाला आहे. दि १४ पासून नाशिक जिल्ह्यातील धरण समुहातून सोडलेले पाणी मोठ्या क्षमतेने नाथसागरात सामावले जात असून चार दिवसात जलसाठ्यात दहा टक्क्याने भर पडली आहे. सोमवारी धरणात २२७५७ क्युसेक्स क्षमतेने आवक सुरू  होती . दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील धरणे भरत आल्याने या धरण समुहातून लवकरच विसर्ग होईल अशी अपेक्षा जायकवाडीचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी व्यक्त केली आहे.

नांदूर मधमेश्वर बंधाऱ्याच्या मुक्त पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे पाच दिवसापासून या बंधाऱ्यातून गोदावरी पात्रात विसर्ग सुरू आहे. आज सकाळी ११०७९ क्युसेक्स क्षमतेने या बंधाऱ्यातून विसर्ग करण्यात येत होता तो सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान १४२३४ क्युसेक्स पर्यंत वाढविण्यात आला. यामुळे गोदावरी दुथडी भरून वहात आहे. दारणा धरणातून सुरू असलेला विसर्ग सायंकाळी ११५५० क्युसेक्स वरून ७६०८ क्युसेक्स पर्यंत घटविण्यात आला. जायकवाडी धरणात २२७५७ क्युसेक्स अशी आवक सुरू आहे, दरम्यान नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी पात्रात  होणाऱ्या विसर्गात वाढ झाल्याने धरणात येणारी आवक वाढणार असल्याचे धरण अभियंता बुद्धभूषण दाभाडे व संदीप राठोड यांनी सांगितले. १५२२ फूट जलक्षमता असलेल्या धरणाची पाणीपातळी  सोमवारी सायंकाळी १५१५.२२ फूट झाली होती. जायकवाडी धरणात एकूण जलसाठा. २१६९.८९६ दलघमी तर उपयुक्त जलसाठा १४३१.७९० दलघमी ईतका झाला आहे.

भंडारदरा धरणातील पाण्याची प्रतिक्षा...अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण ९६% भरले असून  भंडारदरा धरणातून ४३९९ क्युसेक्स क्षमतेने निळवंडे धरणात विसर्ग सुरू आहे. निळवंडे धरण सोमवारी सायंकाळी ८०% भरले होते , निळवंडे  ९०% भरल्यानंतर या धरणातून ओझर वेअर मध्ये विसर्ग करण्यात येईल व हे पाणी प्रवरा नदी मार्गे जायकवाडीत दाखल होईल. येत्या दोन दिवसात निळवंडेतून विसर्ग सुरू होईल अशी अपेक्षा धरण नियंत्रण कक्षातून व्यक्त करण्यात आली. प्रवरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे देवगड बंधाऱ्यातून प्रवरा नदी पात्रात सोमवारी १७६९ क्युसेक्स असा विसर्ग सुरू होता असे राजेंद्र काळे यांनी सांगितले.

नाशिक जिल्ह्यातील  धरणाची टक्केवारी.....करंजवन  ३५.३८%, वाघाड ३५.७१%,ओझरखेड ४३.०५%,पालखेड ६६.०२%,गंगापूर ८०.४५%,गौतमी ५०.७४%,कश्यपी ४०.७८%, कडवा ९२.८९%,दारणा ९०.०८%,

अहमदनगर जिल्ह्यातील धरणाची टक्केवारी.....भंडारदरा ९५.९३%निळवंडे ७८.४३%मुळा ६५.५५%.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबादRainपाऊस