शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
4
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
5
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
6
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
7
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
8
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
9
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
10
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
11
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
12
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
13
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
14
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
15
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
16
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
17
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
18
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
19
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
20
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जायकवाडी @ ९८ टक्के; धरणाची चार दरवाजे उघडून २०९६ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 19:49 IST

धरणाच्या द्वार क्रं १०, २७, १८, १९ मधून २०९६ क्यूसेक व जलविद्युतकेंद्रामधून १५८९ क्यूसेक  असा एकुण ३६८५ क्यूसेक इतका विसर्ग विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरु आहे.

ठळक मुद्देजायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने पाणीसाठा वाढलासायंकाळी सात वाजता धरणाची आणखी दोन दरवाजे उघडले

पैठण : जायकवाडी धरणाच्या स्थानिक पाणलोट क्षेत्रात आज जोरदार पाऊस झाल्याने धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असल्याचे दिसून आले. जलसाठा ९८% झाल्याने  रात्री ७ वाजेच्या दरम्यान आणखी दोन दरवाजे उघडण्यात आली. दरवाजा क्रमांक १८ व १९ हे दोन दरवाजे अर्धा फूटाने वर उचलून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला. धरणाच्या द्वार क्रं १०, २७, १८, १९ मधून २०९६ क्यूसेक व जलविद्युतकेंद्रामधून १५८९ क्यूसेक  असा एकुण ३६८५ क्यूसेक इतका विसर्ग विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरु आहे.

शनिवारी दुपारी जायकवाडी धरणाचे १० व २७ क्रमांकाची दोन दरवाजे अर्धा फूटाने वर उचलून नाथसागरातून १०४८ क्युसेक्स असा विसर्ग गोदावरी पात्रात करण्यात आला. त्यानंतर धरणाच्या स्थानिक पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत जलसाठा ९८% झाला. यामुळे रात्री ७ वाजेच्या दरम्यान दरवाजा क्रमांक १८ व १९ हे दोन दरवाजे अर्धा फूटाने वर उचलून विसर्ग वाढविण्यात आला.  प्रचलन आराखड्या नुसार जलाशयातील पाणी पातळी राखण्यासाठी धरणात येणारी आवक लक्षात घेऊन धरणातून होणारा विसर्ग कमी - जास्त करण्यात येईल मात्र परिस्थिती पाहता धरणात येणारी आवक सातत्याने घटत असल्याने धरणातून फारसा विसर्ग वाढवावा लागणार नाही असे जायकवाडीचे अधिक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले.

जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याचा श्रीगणेशा आज करण्यात आला. मुख्य अभियंता दिलीप तवार, अधिक्षक अभियंता राजेंद्र काळे यांच्या हस्ते बटन दाबून धरणाचा दरवाजा क्रमांक १० व २७ अर्धा फूटाने वर उचलून गोदावरीत १०४८ क्युसेक्स विसर्ग करण्यात आला. धरणाच्या द्वार क्रं १०, २७, १८, १९ मधून २०९६ क्यूसेक व जलविद्युतकेंद्रामधून १५८९ क्यूसेक  असा एकुण ३६८५ क्यूसेक इतका विसर्ग सुरू असल्याने गोदावरी पात्र भरभरून वहाते झाले आहे.जायकवाडी धरणात ६१८१ क्युसेक्स आवक शनिवारी सुरू होती, धरणाचा जलसाठा सकाळी ६ वाजता ९७.५७% च्या पुढे सरकला होता. राज्यस्तरीय धोरणानुसार आखलेल्या जलाशय प्रचलन आराखड्या नुसार जलाशयाची पाणीपातळी पुढे सरकल्याने जायकवाडी प्रशासनाने आवक होत असलेल्या पाण्याच्या तुलनेत अर्धे पाणी धरणातून सोडण्याचा निर्णय घेतला.

पैठण ते नांदेड गोदावरी पात्रात १४ बंधारेपैठण ते नांदेड गोदावरी पात्रात १४ बंधारे असून यात आपेगाव, हिरडपुरी, शहागड, पाथरवाला, जोगलादेवी, मंगरूळ, राजा टाकळी, लोणी सावंगी, ढालेगाव, तारूगव्हाण, मुदगल, मुळी, दिग्रस, व विष्णूपुरी बंधाऱ्याचा समावेश आहे. दरम्यान जालना जिल्ह्यातील शहागड व पाथरवाला या बंधाऱ्याचे दरवाज्याचे काम सुरू असल्याने ते मोकळे आहेत. तर गंगाखेड तालुक्यातील मुळी बंधाऱ्याचे दरवाज्याचे काम सुरू असल्याने बंधारा मोकळा आहे. इतर बंधाऱ्यावरील यंत्रणेस दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत असे अधिक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले.

धरणातून सन १९७५ पासून विसर्ग..... यंदाचे २१ वे वर्ष.जायकवाडी धरणाच्या दरवाज्यांचे काम बाकी असताना १९७५ मध्ये पैठण येथून ३९८५२ क्युसेक्स विसर्ग झाल्याची नोंद आहे. १९७६ ला धरणाचे २७ दरवाजे ८" उचलून प्रथमच १५०,००० क्युसेक्स असा विसर्ग करण्यात आला. १९७५ ते १९८१ असे सलग सात वर्ष  धरणातून विसर्ग करावा लागला. १९८२ ला विसर्ग करावा लागला नाही मात्र १९८३ ला ८०१९५ क्युसेक्स क्षमतेने विसर्ग करण्यात आला. १९८४ ते १९८७ या चार वर्षात धरणात अपेक्षित जलसाठा न झाल्याने विसर्ग करावा लागला नाही. १९८८ ला नाममात्र विसर्ग करण्यात आला. पुन्हा १९८९ हे वर्ष कोरडे गेले. १९९० ला महापूर आल्याने १८७६५२ क्युसेक्स अशा मोठ्या क्षमतेने विसर्ग करावा लागला. १९९१ लाही ५९४०८ क्युसेक्स क्षमतेने विसर्ग झाला. १९९२ ते १९९७ या सहा वर्षात १९९४ ला पाणी सोडावे लागले बाकीचे वर्षे कोरडेच राहिले. यानंतर १९९८ व ९९ सलग दोन वर्ष विसर्ग झाला.

२००० नंतर धरण भरण्याचे प्रमाण घटलेसन २००० ते २०२० या २१ वर्षाच्या दरम्यान  १४ वर्ष धरणातून पाणी सोडण्याचा प्रसंग आला नाही. २००० ते २००४ व २००९ ते २०१६ असे सलग व २०१८  या दरम्यान धरणातील जलसाठा काटकसरीने वापरावा लागला. मात्र या २१ वर्षात २००५ ते २००८ या दरम्यान धरणातून मोठ्या क्षमतेने पाणी सोडावे लागले.  २०१७ ला २७८४६ क्युसेक्स व २०१९ ला ५०३०४ क्युसेक्स क्षमतेने विसर्ग केला गेला. यंदची सुरवात १०४८ क्युसेक्स क्षमतेने शनिवारी करण्यात आली.

सन १९९० व २००६ ला पैठण शहरात पूर.....१९९० ला १२ ऑक्टोबर रोजी धरणातून १८७६५२ क्युसेक्स क्षमतेने विसर्ग करण्यात आला होता. पैठण शहराखालील बंधाऱ्याचे दरवाजे वेळीच उघडण्यात अपयश आल्याने पैठण शहरात पुर आला होता. २००६ ला धरणातून ऑगस्ट महिण्यात २,५०,६९५ असा मोठा विसर्ग करण्यात आल्याने सहा दिवस अर्धे पैठण शहर पाण्याखाली होते.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबाद