शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडी @ ९८ टक्के; धरणाची चार दरवाजे उघडून २०९६ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 19:49 IST

धरणाच्या द्वार क्रं १०, २७, १८, १९ मधून २०९६ क्यूसेक व जलविद्युतकेंद्रामधून १५८९ क्यूसेक  असा एकुण ३६८५ क्यूसेक इतका विसर्ग विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरु आहे.

ठळक मुद्देजायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने पाणीसाठा वाढलासायंकाळी सात वाजता धरणाची आणखी दोन दरवाजे उघडले

पैठण : जायकवाडी धरणाच्या स्थानिक पाणलोट क्षेत्रात आज जोरदार पाऊस झाल्याने धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असल्याचे दिसून आले. जलसाठा ९८% झाल्याने  रात्री ७ वाजेच्या दरम्यान आणखी दोन दरवाजे उघडण्यात आली. दरवाजा क्रमांक १८ व १९ हे दोन दरवाजे अर्धा फूटाने वर उचलून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला. धरणाच्या द्वार क्रं १०, २७, १८, १९ मधून २०९६ क्यूसेक व जलविद्युतकेंद्रामधून १५८९ क्यूसेक  असा एकुण ३६८५ क्यूसेक इतका विसर्ग विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरु आहे.

शनिवारी दुपारी जायकवाडी धरणाचे १० व २७ क्रमांकाची दोन दरवाजे अर्धा फूटाने वर उचलून नाथसागरातून १०४८ क्युसेक्स असा विसर्ग गोदावरी पात्रात करण्यात आला. त्यानंतर धरणाच्या स्थानिक पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत जलसाठा ९८% झाला. यामुळे रात्री ७ वाजेच्या दरम्यान दरवाजा क्रमांक १८ व १९ हे दोन दरवाजे अर्धा फूटाने वर उचलून विसर्ग वाढविण्यात आला.  प्रचलन आराखड्या नुसार जलाशयातील पाणी पातळी राखण्यासाठी धरणात येणारी आवक लक्षात घेऊन धरणातून होणारा विसर्ग कमी - जास्त करण्यात येईल मात्र परिस्थिती पाहता धरणात येणारी आवक सातत्याने घटत असल्याने धरणातून फारसा विसर्ग वाढवावा लागणार नाही असे जायकवाडीचे अधिक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले.

जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याचा श्रीगणेशा आज करण्यात आला. मुख्य अभियंता दिलीप तवार, अधिक्षक अभियंता राजेंद्र काळे यांच्या हस्ते बटन दाबून धरणाचा दरवाजा क्रमांक १० व २७ अर्धा फूटाने वर उचलून गोदावरीत १०४८ क्युसेक्स विसर्ग करण्यात आला. धरणाच्या द्वार क्रं १०, २७, १८, १९ मधून २०९६ क्यूसेक व जलविद्युतकेंद्रामधून १५८९ क्यूसेक  असा एकुण ३६८५ क्यूसेक इतका विसर्ग सुरू असल्याने गोदावरी पात्र भरभरून वहाते झाले आहे.जायकवाडी धरणात ६१८१ क्युसेक्स आवक शनिवारी सुरू होती, धरणाचा जलसाठा सकाळी ६ वाजता ९७.५७% च्या पुढे सरकला होता. राज्यस्तरीय धोरणानुसार आखलेल्या जलाशय प्रचलन आराखड्या नुसार जलाशयाची पाणीपातळी पुढे सरकल्याने जायकवाडी प्रशासनाने आवक होत असलेल्या पाण्याच्या तुलनेत अर्धे पाणी धरणातून सोडण्याचा निर्णय घेतला.

पैठण ते नांदेड गोदावरी पात्रात १४ बंधारेपैठण ते नांदेड गोदावरी पात्रात १४ बंधारे असून यात आपेगाव, हिरडपुरी, शहागड, पाथरवाला, जोगलादेवी, मंगरूळ, राजा टाकळी, लोणी सावंगी, ढालेगाव, तारूगव्हाण, मुदगल, मुळी, दिग्रस, व विष्णूपुरी बंधाऱ्याचा समावेश आहे. दरम्यान जालना जिल्ह्यातील शहागड व पाथरवाला या बंधाऱ्याचे दरवाज्याचे काम सुरू असल्याने ते मोकळे आहेत. तर गंगाखेड तालुक्यातील मुळी बंधाऱ्याचे दरवाज्याचे काम सुरू असल्याने बंधारा मोकळा आहे. इतर बंधाऱ्यावरील यंत्रणेस दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत असे अधिक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले.

धरणातून सन १९७५ पासून विसर्ग..... यंदाचे २१ वे वर्ष.जायकवाडी धरणाच्या दरवाज्यांचे काम बाकी असताना १९७५ मध्ये पैठण येथून ३९८५२ क्युसेक्स विसर्ग झाल्याची नोंद आहे. १९७६ ला धरणाचे २७ दरवाजे ८" उचलून प्रथमच १५०,००० क्युसेक्स असा विसर्ग करण्यात आला. १९७५ ते १९८१ असे सलग सात वर्ष  धरणातून विसर्ग करावा लागला. १९८२ ला विसर्ग करावा लागला नाही मात्र १९८३ ला ८०१९५ क्युसेक्स क्षमतेने विसर्ग करण्यात आला. १९८४ ते १९८७ या चार वर्षात धरणात अपेक्षित जलसाठा न झाल्याने विसर्ग करावा लागला नाही. १९८८ ला नाममात्र विसर्ग करण्यात आला. पुन्हा १९८९ हे वर्ष कोरडे गेले. १९९० ला महापूर आल्याने १८७६५२ क्युसेक्स अशा मोठ्या क्षमतेने विसर्ग करावा लागला. १९९१ लाही ५९४०८ क्युसेक्स क्षमतेने विसर्ग झाला. १९९२ ते १९९७ या सहा वर्षात १९९४ ला पाणी सोडावे लागले बाकीचे वर्षे कोरडेच राहिले. यानंतर १९९८ व ९९ सलग दोन वर्ष विसर्ग झाला.

२००० नंतर धरण भरण्याचे प्रमाण घटलेसन २००० ते २०२० या २१ वर्षाच्या दरम्यान  १४ वर्ष धरणातून पाणी सोडण्याचा प्रसंग आला नाही. २००० ते २००४ व २००९ ते २०१६ असे सलग व २०१८  या दरम्यान धरणातील जलसाठा काटकसरीने वापरावा लागला. मात्र या २१ वर्षात २००५ ते २००८ या दरम्यान धरणातून मोठ्या क्षमतेने पाणी सोडावे लागले.  २०१७ ला २७८४६ क्युसेक्स व २०१९ ला ५०३०४ क्युसेक्स क्षमतेने विसर्ग केला गेला. यंदची सुरवात १०४८ क्युसेक्स क्षमतेने शनिवारी करण्यात आली.

सन १९९० व २००६ ला पैठण शहरात पूर.....१९९० ला १२ ऑक्टोबर रोजी धरणातून १८७६५२ क्युसेक्स क्षमतेने विसर्ग करण्यात आला होता. पैठण शहराखालील बंधाऱ्याचे दरवाजे वेळीच उघडण्यात अपयश आल्याने पैठण शहरात पुर आला होता. २००६ ला धरणातून ऑगस्ट महिण्यात २,५०,६९५ असा मोठा विसर्ग करण्यात आल्याने सहा दिवस अर्धे पैठण शहर पाण्याखाली होते.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबाद