शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

‘मेड इन औरंगाबाद’ची जपानभरारी, औरंगाबादेतील कंपनीचा जपानी बँकेशी करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 05:39 IST

औरंगाबाद : जगभरात सॉफ्टवेअर उत्पादनात दबदबा अमेरिकेचा. भारतातील दिग्गज कंपन्याही तेथूनच सॉफ्टवेअर आयात करतात.

गजानन दिवाण औरंगाबाद : जगभरात सॉफ्टवेअर उत्पादनात दबदबा अमेरिकेचा. भारतातील दिग्गज कंपन्याही तेथूनच सॉफ्टवेअर आयात करतात. हा इतिहास पुसण्याचा प्रयत्न औरंगाबादने केला असून, मराठमोळ्या तरुणांनी तयार केलेली सॉफ्टवेअर लवकरच जपानच्या बाजारात दिसणार आहेत. यासंदर्भात औरंगाबादेतील ‘फाइंड अ‍ॅबिलिटि सायन्सेस’ कंपनीने अलीकडेच सॉफ्टबँक या जपानी कंपनीशी करार केला आहे.बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या आनंद माहूरकर याने मोठ्या पगाराची नोकरी सोडून २०१० साली कंपनीची स्थापना केली. अमेरिकेतील बोस्टनमध्ये कंपनीचे मुख्यालय आहे. माहूरकर यांनी त्याचवर्षी कंपनीचे औरंगाबादेतही एक कार्यालय सुरू केले.आनंद यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण अंबाजोगाईत झाले. आई-वडील दोघेही शिक्षक. औरंगाबादेत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात मेकॅनिकल इंजिनिअरिंग केले. पुढे पुण्यात नोकरी केली. त्याचवेळी संगणकाचे ज्ञान घेतले. नंतर औरंगाबादेत नोकरी केली. कंपनीने त्यांच्यातील सॉफ्टवेअर अभियंत्याचे गुण हेरून त्यांना मुंबईला एका विशेष प्रकल्पावर पाठविले. १९९९ साली पुन्हा पुण्यात नवी नोकरी केली. त्यानंतर मुंबईतील एका कंपनीच्या माध्यमातून थेट अमेरिका गाठली. कंपनीचा व्यवसाय २५ कोटींवरुन ३५० कोटींवर नेला.आत्मविश्वास आल्यानंतर आपणच व्यवसायातून अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न का सोडवू शकत नाही, या विचारातून त्यांनी २०१० साली ‘फाइंड अ‍ॅबिलिटि सायन्सेस’ कंपनीची स्थापना केली. एकही पैशाची गुंतवणूक नाही. केवळ ‘आयडिया’ हीच त्यांची गुंतवणूक. ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ क्षेत्रात जगभरातील दिग्गजांच्या यादीत त्यांचे नाव पहिल्या काहींमध्ये घेतले जाते. हे ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ म्हणजे आपण कुठले कपडे घालायला पाहिजे, कुठली फॅशन सूट करते? तुमची पर्सनॅलिटी, तुमच्या विचारांचा अभ्यास करून कॉम्पुटरच तुम्हाला हे सांगेल. देशभरातील ४० प्रतिनिधींसमोर गुरुवार व शुक्रवारी औरंगाबादेत ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चा डेमो दाखविला जाणार आहे. लवकरच ही सॉफ्टवेअर औरंगाबादेत तयार केली जातील आणि जगभरात पुरविली जातील, अशी माहिती ‘फाइंड अ‍ॅबिलिटि सायन्सेस’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद माहूरकर यांनी ‘लोकमत’ला दिली. सॉफ्ट बँक या जपानी कंपनीने माझ्या कंपनीत ५० कोटींची गुंतवणूक केली. भारतातील कंपनीशी हे एकमेव जॉइंट व्हेंचर केले आहे. औरंगाबादेत टेक्नॉलॉजी डेव्हलप करुन ती जपानमध्ये नेऊन ते विकतील. तेथे आपण त्यांना कंपनीचा ५१ टक्के भाग दिला आहे. तेथे मार्केटची पूर्ण जबाबदारी त्यांचीच असेल, असे माहूरकर यांनी सांगितले.>औरंगाबादेतील एमआयटी, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आणि जेएनईसीच्या माध्यमातून अभियांत्रिकीच्या तरुणांना प्रशिक्षण दिले जाईल. स्किल डेव्हलपमेंट केले जाईल. याच तरुणांना पुढे आपल्या कंपनीत सामावून घेतले जाईल.- आनंद माहूरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, फाइंड अ‍ॅबिलिटि सायन्सेस

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद